शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

ग्रामपंचायतीला ठोकले टाळे

By admin | Updated: October 8, 2016 01:02 IST

तरुणांना नोकरी देत नसल्याच्या निषेधार्थ उपसरपंच , सदस्य व तरुणांनी उर्से ग्रामपंचायतीला शुक्रवारी टाळे ठोकले.

उर्से : ग्रामपंचायत हद्दीतील कंपन्यांमध्ये गावातील तरुणांना नोकरी देत नसल्याच्या निषेधार्थ उपसरपंच , सदस्य व तरुणांनी उर्से ग्रामपंचायतीला शुक्रवारी टाळे ठोकले. कंपन्यांच्या विरोधात मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशारा तरुणांनी दिला असून, जोपर्यंत मुलांना कामावर घेत नाही, तोपर्यंत ग्रामपंचायत बंद ठेवण्यात येणार आहे. दोन दिवसांत बैठक घेऊन याबाबत चर्चा करणार असल्याचे कंपनी व्यवस्थापनांकडून सांगण्यात आले.अनेक दिवसांपासून गावातील बेरोजगार मुले फिनोलेक्स व फिनिक्स या कंपनीत कामावर घ्यावे, यासाठी ग्रामपंचायतीकडे मागणी करीत होते. याची दखल घेऊन ग्रामपंचायतीने फिनिक्स या कंपनीकडे ५ व ६ आॅगस्ट रोजी पत्रव्यवहार केला होता. मात्र, दोन महिने होऊनही कंपनीने कोणतीही दखल घेतली नसल्याने तरुण संतप्त झाले आहेत. बेरोजगारी आणि ग्रामपंचायतीचा पाठपुरावा कमी पडतोय का? याचा राग मनात धरून तरुणांनी सकाळी साडेनऊ वाजता ग्रामपंचायतीला टाळे ठोकले. जोपर्यंत गावातील मुले कामाला घेत नाही, तोपर्यंत ग्रामपंचायत कार्यालय बंद ठेवण्यात येईल, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. कार्यालयाला टाळे ठोकल्यामुळे ग्रामपंचायत कामगार आणि ग्रामसेवकांना बाहेरच उभे राहावे लागले. सरपंच ऊर्मिला धामणकर, उपसरपंच उत्तम पोटवडे, ग्रामपंचायत सदस्य भरत कारके, सुलतान मुलाणी, अमर शिंदे, चंद्रकात धामणकर, अविनाश कारके, माजी सरपंच दिगंबर राऊत , भास्कर ठाकूर, सतीश कारके, तंटामुक्त अध्यक्ष प्रल्हाद पिसाळ, राजू पठाण , गुलाब धामणकर, जालिंधर धामणकर, भाऊ ठाकूर, गुरुदास दौंड, सचिन ठाकूर, अविनाश शिंदे, किरण राऊत, समीर शिंदे, आकाश धामणकर, विजय कारके, लालू दौंड, देविदास सावंत, रमेश गायकवाड, बंडू धामणकर व गावातील तरुणांनी ग्रामपंचायतीला टाळे ठोकले. (वार्ताहर)>तळेगावात बैठक : ग्रामस्थांशी चर्चा करणार ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठोकल्यानंतर तळेगाव पोलीस स्टेशन येथे कंपनीचे अधिकारी, पोलीस निरक्षक वसंत बाबर व ग्रामस्थ यांच्यात बैठक झाली. या वेळी दोन दिवसांत बैठक ग्रामपंचायतीबरोबर घेऊन चर्चा करू, असे कंपन्यांच्या वतीने सांगण्यात आले. ग्रामपंचायतीमार्फतच तरुणांना कामाला घ्यावे, अशी भूमिका तरुणांनी घेतली आहे. याबाबत उपसरपंच पोटवडे म्हणाले, कंपनी कुठल्याही प्रकारची दाद देत नसल्याने आम्हाला टाळे ठोकावे लागले. कंपनीने लवकरात लवकर मुलांना कामावर घ्यावे, अशी आमची मागणी आहे.