शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील बड्या दहीहंडीतून गोविंदांची माघार

By admin | Updated: August 31, 2015 01:39 IST

मुंबईतील दहीहंडीवर फारसे निर्बंध नाहीत. ‘गोविंदांची पंढरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहरात मात्र पोलीस वेगवेगळे नियम दाखवून हा उत्सव बंद करण्यासाठीच प्रयत्न करीत

ठाणे : मुंबईतील दहीहंडीवर फारसे निर्बंध नाहीत. ‘गोविंदांची पंढरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहरात मात्र पोलीस वेगवेगळे नियम दाखवून हा उत्सव बंद करण्यासाठीच प्रयत्न करीत असल्याचा गंभीर आरोप ठाणे जिल्हा दहीहंडी उत्सव समन्वय समितीने केला आहे. या हुकूमशाही प्रवृत्तीविरोधात बंड करून येथील कोणत्याही बड्या दहीहंडी उत्सवात सहभागी न होण्याचा निर्णय रविवारी बैठकीत समितीने जाहीर केला. त्याऐवजी आपापल्या विभागांतील दहीहंड्या हे गोविंदा फोडणार आहेत. दहीहंडीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच अनेक नियमांच्या बंधनामुळे तो यंदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्यामुळे तो कशा प्रकारे साजरा करावा? किंवा तो साजराच करायचा की नाही? अशा संभ्रमात ठाणे आणि मुंबईतील गोविंदा मंडळे आहेत.याच पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा दहीहंडी उत्सव समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणे, नवी मुंबई, डोंबिवलीसह वसई परिसरातील गोविंदा मंडळांची ठाण्यातील चंदनवाडीतील सभागृहात बैठक घेतली. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत समितीचे अध्यक्ष बाळा पडेलकर यांनी हा निर्णय जाहीर केला.मुंबईत दहीहंडीचा सण निर्विघ्न साजरा व्हावा, यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत. मात्र ठाण्यात स्टेज, मंडप आणि डीजेबाबत वेगवेगळे नियम दाखवून ठाणे शहर आणि ग्रामीण पोलीस दहीहंडी उत्सवाच्या आयोजकांवर निर्बंध लादत असल्याचा आरोप पडेलकर आणि उपाध्यक्ष सुरेंद्र पांचाळ यांनी केला. गोविंदा पथकात १२ वर्षांखालील मुले नसावीत, असा आदेश न्यायालयाने दिले आहेत, त्याबाबतही पोलिसांत एकवाक्यता नाही. तसेच थरांबाबत निश्चिती नाही. असे असताना एका पोलीस ठाण्यातून थरांचे बंधन नसल्याचे सांगितले जाते. त्याचवेळी दुसऱ्या पोलीस ठाण्यातून केवळ पाच थर रचण्याचे बंधन घातले जात आहे. या उत्सवात १८ वर्षांखालील मुलांचा सहभाग नसावा की १२ वर्षांखालील यावरूनही पोलिसांनी वेगवेगळी भूमिका आहे. ठाणे आणि वसईमध्ये मंडळांना ज्या नोटिसा पाठविण्यात आल्यात, त्यामध्ये १८, १२ तर काही ठिकाणी १४ वर्षांखालील मुलांना सहभाग घेता येणार नसल्याचे सांगितले आहे. तर थरांच्या बाबतीतही असाच संभ्रम निर्माण करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई-ठाण्यात उत्सवांसाठी वेगवेगळे नियम आहेत का, असा प्रश्न या वेळी करण्यात आला. मुंबईत नारळी पौर्णिमेला आठ थर लावून गोविंदांनी सराव केला. मग इथेच अटकाव का केला जातोय, असेही ते म्हणाले.मुंबई : दहीहंडीवरून सुरू असलेल्या वादंगामुळे रविवारी वांद्रे आणि बोरीवली येथे आयोजित साहसी स्पर्धांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय दहीहंडी समन्वय समितीने व समितीशी संलग्न शहरातील नामांकित गोविंदा पथकांनी घेतला होता. मात्र, रविवारी सायंकाळी ‘उपनगरचा राजा’ म्हणून लोकप्रिय असणाऱ्या जय जवान पथकाने वांद्रे येथे मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेत हजेरी लावली. या घडामोडीने समितीला धक्का बसला. शेलार यांनी जय जवान पथकाला स्पर्धेस येण्यास भाग पाडले, असा आरोप समन्वय समिती करते आहे. तसेच शेलार समितीत फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा दावाही समितीकडून होत आहे.जोगेश्वरी येथील जय जवान गोविंदा पथकाच्या सरावाला शनिवारी रात्री शेलार उपस्थित होते. या भेटीत शेलार यांनी पथकाची मनधरणी केली आणि वांद्रे येथील स्पर्धेत सहभागी करून घेतले, अशी माहिती समितीच्या जाणत्या पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला दिली. जय जवानसारख्या नामांकित पथकाने शेलार यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेत भाग घेऊन समितीने घेतलेल्या निर्णयाला तडा दिल्याचेही हे पदाधिकारी म्हणतात. या सर्व घडामोडींमुळे गोविंदा पथकांमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण असून, बऱ्याच पथकांनी जय जवान गोविंदा पथकाचा निषेध नोंदवला आहे. याबाबत ‘लोकमत’ने शेलार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क होऊ शकला नाही.