शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

पालखीचे दर्शन न घेताच राज्यपाल परतले

By admin | Updated: July 11, 2015 01:44 IST

वारीदरम्यान चंद्रभागेचे वाळवंट खुले करावे या मागणीसाठी वारकऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना शुक्रवारी संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम

पुणे : वारीदरम्यान चंद्रभागेचे वाळवंट खुले करावे या मागणीसाठी वारकऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना शुक्रवारी संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम पालखीचे दर्शन न घेताच पुण्यातून मुंबईला परतावे लागले. पालखीचे दर्शन घेण्यासाठी म्हणूनच राज्यपाल आज खास पुण्यात आले होते. मात्र या आंदोलनामुळे त्यांना दर्शनाला मुकावे लागले.संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या शुक्रवारी संध्याकाळी पुण्यात दाखल झाल्या. या दोन्ही पालख्यांच्या दर्शनासाठी राज्यपाल संगमवाडीमध्ये जाणार होते. राज्यपालांच्या कार्यालयाकडून तसा कार्यक्रमही जाहीर करण्यात आला होता. मात्र, वारकरी आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा अहवाल स्थानिक प्रशासनाने दिल्यानंतर हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मिळाली.याबाबत राज्यपालांचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी राज्यपालांना वारकऱ्यांच्या आंदोलनाची माहिती दिली. वारकऱ्यांना त्रास होणार असेल तर ते आपल्याला आवडणार नाही अशी भूमिका घेतली.पंढरपूर येथील चंद्रभागा नदीचे वाळवंट आषाढी यात्रेच्या काळात वारकऱ्यांसाठी १५ दिवस खुले ठेवावे या मागणीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज अशा दोन्ही पालख्यांबरोबर असलेल्या वारकऱ्यांनी संगमवाडी येथे आंदोलन सुरू केले. चंद्रभागा नदीच्या या परिसराचा वापर करण्यास अलीकडेच न्यायालयाने मनाई केली आहे. ही मनाई उठवावी, त्यासाठी प्रसंगी कायद्यात बदल करावा, अशी वारकऱ्यांची मागणी आहे. जिल्हा प्रशासनाला या आंदोलनाची पूर्वकल्पना असल्यामुळे जिल्हाधिकारी सौरभ राव वारकरी संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा करीत होते. मात्र या चर्चेला यश आले नाही.------------आषाढी एकादशीसाठी पंढरपूर येथे होणाऱ्या वारीदरम्यान मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरते तसेच तेथे शौचालयांची व्यवस्था नसल्याने वारीनंतर हाताने मैला साफ करण्याची कुप्रथा कायम असल्याची बाब एका स्वयंसेवी संस्थेने याचिकेच्या माध्यमातून उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली होती. न्यायमूर्ती अभय ओक यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने त्याची गंभीर दखल घेत ही कुप्रथा महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात सुरू असल्याबाबत राज्य सरकारला धारेवर धरले होते. वारकऱ्यांसाठी आवश्यक स्वच्छतागृहे तात्पुरत्या स्वरूपात उभारण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्याचबरोबर पंढरपूरच्या वाळवंटात तंबू उभारण्यासही बंदी घालण्यात आली होती. राज्य सरकारने यासंदर्भात आवश्यक उपाययोजना न केल्यामुळे वारकऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत असल्यामुळे वारकरी-फडकरी दिंडी समाजामध्ये नाराजीची भावना आहे. -------------पंढरपुरातील चंद्रभागा नदीच्या वाळवंटात राहुट्या लावू द्याव्यात, या मागणीसाठी वारकऱ्यांनी शुक्रवारी सायंकाळी ठिय्या आंदोलन केले आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी रथ थांबविला. जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी मध्यस्थी केल्यानंतर पालखी सोहळा मार्गस्थ झाला.च्संगमवाडी येथे ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सायंकाळी विसाव्यास थांबलेली असताना अचानकपणे वारकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यामुळे पालखी रथाला तेथेच थांबावे लागले. एका स्वयंसेवी संघटनेने केलेल्या याचिकेवरून चंद्रभागा नदीपात्रात राहुट्या लावण्यावर मुंबई उच्च न्यायालयाने बंदी घातली. च्राज्य सरकार आमची बाजू न्यायालयात मांडून त्यात मार्ग काढत नाही तोपर्यंत रथाला पुढे जाऊ देणार नाही, अशी भूमिका वारकऱ्यांनी घेतली. वारीतील किमान १८ दिवस तरी हे निर्बंध उठवायला हवेत. यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयातदाद मागावी, असे वारकरीसेवा संघाचे अध्यक्ष राजाभाऊ चोपदार म्हणाले.च्या वेळी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या वतीने प्रांताधिकाऱ्यांनी वारकऱ्यांची भेट घेतली. तसेच शिवतारे यांनी चोपदार यांच्याशी संपर्क साधला. जिल्हाधिकाऱ्यांसमवेत शनिवारी यासंदर्भात बैठक घेण्याचे अश्वासन शिवतारे यांनी दिले.(प्रतिनिधी)