शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

पालखीचे दर्शन न घेताच राज्यपाल परतले

By admin | Updated: July 11, 2015 01:44 IST

वारीदरम्यान चंद्रभागेचे वाळवंट खुले करावे या मागणीसाठी वारकऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना शुक्रवारी संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम

पुणे : वारीदरम्यान चंद्रभागेचे वाळवंट खुले करावे या मागणीसाठी वारकऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना शुक्रवारी संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम पालखीचे दर्शन न घेताच पुण्यातून मुंबईला परतावे लागले. पालखीचे दर्शन घेण्यासाठी म्हणूनच राज्यपाल आज खास पुण्यात आले होते. मात्र या आंदोलनामुळे त्यांना दर्शनाला मुकावे लागले.संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या शुक्रवारी संध्याकाळी पुण्यात दाखल झाल्या. या दोन्ही पालख्यांच्या दर्शनासाठी राज्यपाल संगमवाडीमध्ये जाणार होते. राज्यपालांच्या कार्यालयाकडून तसा कार्यक्रमही जाहीर करण्यात आला होता. मात्र, वारकरी आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा अहवाल स्थानिक प्रशासनाने दिल्यानंतर हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मिळाली.याबाबत राज्यपालांचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी राज्यपालांना वारकऱ्यांच्या आंदोलनाची माहिती दिली. वारकऱ्यांना त्रास होणार असेल तर ते आपल्याला आवडणार नाही अशी भूमिका घेतली.पंढरपूर येथील चंद्रभागा नदीचे वाळवंट आषाढी यात्रेच्या काळात वारकऱ्यांसाठी १५ दिवस खुले ठेवावे या मागणीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज अशा दोन्ही पालख्यांबरोबर असलेल्या वारकऱ्यांनी संगमवाडी येथे आंदोलन सुरू केले. चंद्रभागा नदीच्या या परिसराचा वापर करण्यास अलीकडेच न्यायालयाने मनाई केली आहे. ही मनाई उठवावी, त्यासाठी प्रसंगी कायद्यात बदल करावा, अशी वारकऱ्यांची मागणी आहे. जिल्हा प्रशासनाला या आंदोलनाची पूर्वकल्पना असल्यामुळे जिल्हाधिकारी सौरभ राव वारकरी संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा करीत होते. मात्र या चर्चेला यश आले नाही.------------आषाढी एकादशीसाठी पंढरपूर येथे होणाऱ्या वारीदरम्यान मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरते तसेच तेथे शौचालयांची व्यवस्था नसल्याने वारीनंतर हाताने मैला साफ करण्याची कुप्रथा कायम असल्याची बाब एका स्वयंसेवी संस्थेने याचिकेच्या माध्यमातून उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली होती. न्यायमूर्ती अभय ओक यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने त्याची गंभीर दखल घेत ही कुप्रथा महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात सुरू असल्याबाबत राज्य सरकारला धारेवर धरले होते. वारकऱ्यांसाठी आवश्यक स्वच्छतागृहे तात्पुरत्या स्वरूपात उभारण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्याचबरोबर पंढरपूरच्या वाळवंटात तंबू उभारण्यासही बंदी घालण्यात आली होती. राज्य सरकारने यासंदर्भात आवश्यक उपाययोजना न केल्यामुळे वारकऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत असल्यामुळे वारकरी-फडकरी दिंडी समाजामध्ये नाराजीची भावना आहे. -------------पंढरपुरातील चंद्रभागा नदीच्या वाळवंटात राहुट्या लावू द्याव्यात, या मागणीसाठी वारकऱ्यांनी शुक्रवारी सायंकाळी ठिय्या आंदोलन केले आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी रथ थांबविला. जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी मध्यस्थी केल्यानंतर पालखी सोहळा मार्गस्थ झाला.च्संगमवाडी येथे ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सायंकाळी विसाव्यास थांबलेली असताना अचानकपणे वारकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यामुळे पालखी रथाला तेथेच थांबावे लागले. एका स्वयंसेवी संघटनेने केलेल्या याचिकेवरून चंद्रभागा नदीपात्रात राहुट्या लावण्यावर मुंबई उच्च न्यायालयाने बंदी घातली. च्राज्य सरकार आमची बाजू न्यायालयात मांडून त्यात मार्ग काढत नाही तोपर्यंत रथाला पुढे जाऊ देणार नाही, अशी भूमिका वारकऱ्यांनी घेतली. वारीतील किमान १८ दिवस तरी हे निर्बंध उठवायला हवेत. यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयातदाद मागावी, असे वारकरीसेवा संघाचे अध्यक्ष राजाभाऊ चोपदार म्हणाले.च्या वेळी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या वतीने प्रांताधिकाऱ्यांनी वारकऱ्यांची भेट घेतली. तसेच शिवतारे यांनी चोपदार यांच्याशी संपर्क साधला. जिल्हाधिकाऱ्यांसमवेत शनिवारी यासंदर्भात बैठक घेण्याचे अश्वासन शिवतारे यांनी दिले.(प्रतिनिधी)