शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पालखीचे दर्शन न घेताच राज्यपाल परतले

By admin | Updated: July 11, 2015 01:44 IST

वारीदरम्यान चंद्रभागेचे वाळवंट खुले करावे या मागणीसाठी वारकऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना शुक्रवारी संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम

पुणे : वारीदरम्यान चंद्रभागेचे वाळवंट खुले करावे या मागणीसाठी वारकऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना शुक्रवारी संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम पालखीचे दर्शन न घेताच पुण्यातून मुंबईला परतावे लागले. पालखीचे दर्शन घेण्यासाठी म्हणूनच राज्यपाल आज खास पुण्यात आले होते. मात्र या आंदोलनामुळे त्यांना दर्शनाला मुकावे लागले.संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या शुक्रवारी संध्याकाळी पुण्यात दाखल झाल्या. या दोन्ही पालख्यांच्या दर्शनासाठी राज्यपाल संगमवाडीमध्ये जाणार होते. राज्यपालांच्या कार्यालयाकडून तसा कार्यक्रमही जाहीर करण्यात आला होता. मात्र, वारकरी आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा अहवाल स्थानिक प्रशासनाने दिल्यानंतर हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मिळाली.याबाबत राज्यपालांचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी राज्यपालांना वारकऱ्यांच्या आंदोलनाची माहिती दिली. वारकऱ्यांना त्रास होणार असेल तर ते आपल्याला आवडणार नाही अशी भूमिका घेतली.पंढरपूर येथील चंद्रभागा नदीचे वाळवंट आषाढी यात्रेच्या काळात वारकऱ्यांसाठी १५ दिवस खुले ठेवावे या मागणीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज अशा दोन्ही पालख्यांबरोबर असलेल्या वारकऱ्यांनी संगमवाडी येथे आंदोलन सुरू केले. चंद्रभागा नदीच्या या परिसराचा वापर करण्यास अलीकडेच न्यायालयाने मनाई केली आहे. ही मनाई उठवावी, त्यासाठी प्रसंगी कायद्यात बदल करावा, अशी वारकऱ्यांची मागणी आहे. जिल्हा प्रशासनाला या आंदोलनाची पूर्वकल्पना असल्यामुळे जिल्हाधिकारी सौरभ राव वारकरी संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा करीत होते. मात्र या चर्चेला यश आले नाही.------------आषाढी एकादशीसाठी पंढरपूर येथे होणाऱ्या वारीदरम्यान मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरते तसेच तेथे शौचालयांची व्यवस्था नसल्याने वारीनंतर हाताने मैला साफ करण्याची कुप्रथा कायम असल्याची बाब एका स्वयंसेवी संस्थेने याचिकेच्या माध्यमातून उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली होती. न्यायमूर्ती अभय ओक यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने त्याची गंभीर दखल घेत ही कुप्रथा महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात सुरू असल्याबाबत राज्य सरकारला धारेवर धरले होते. वारकऱ्यांसाठी आवश्यक स्वच्छतागृहे तात्पुरत्या स्वरूपात उभारण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्याचबरोबर पंढरपूरच्या वाळवंटात तंबू उभारण्यासही बंदी घालण्यात आली होती. राज्य सरकारने यासंदर्भात आवश्यक उपाययोजना न केल्यामुळे वारकऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत असल्यामुळे वारकरी-फडकरी दिंडी समाजामध्ये नाराजीची भावना आहे. -------------पंढरपुरातील चंद्रभागा नदीच्या वाळवंटात राहुट्या लावू द्याव्यात, या मागणीसाठी वारकऱ्यांनी शुक्रवारी सायंकाळी ठिय्या आंदोलन केले आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी रथ थांबविला. जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी मध्यस्थी केल्यानंतर पालखी सोहळा मार्गस्थ झाला.च्संगमवाडी येथे ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सायंकाळी विसाव्यास थांबलेली असताना अचानकपणे वारकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यामुळे पालखी रथाला तेथेच थांबावे लागले. एका स्वयंसेवी संघटनेने केलेल्या याचिकेवरून चंद्रभागा नदीपात्रात राहुट्या लावण्यावर मुंबई उच्च न्यायालयाने बंदी घातली. च्राज्य सरकार आमची बाजू न्यायालयात मांडून त्यात मार्ग काढत नाही तोपर्यंत रथाला पुढे जाऊ देणार नाही, अशी भूमिका वारकऱ्यांनी घेतली. वारीतील किमान १८ दिवस तरी हे निर्बंध उठवायला हवेत. यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयातदाद मागावी, असे वारकरीसेवा संघाचे अध्यक्ष राजाभाऊ चोपदार म्हणाले.च्या वेळी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या वतीने प्रांताधिकाऱ्यांनी वारकऱ्यांची भेट घेतली. तसेच शिवतारे यांनी चोपदार यांच्याशी संपर्क साधला. जिल्हाधिकाऱ्यांसमवेत शनिवारी यासंदर्भात बैठक घेण्याचे अश्वासन शिवतारे यांनी दिले.(प्रतिनिधी)