शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

ठिबकसाठीही शासनाचा हात आखडता

By admin | Updated: July 1, 2016 01:45 IST

शेतीसाठी पाण्याचा अतिरिक्त वापर होत असल्याने शासनाने ठिबकसिंचनसाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करीत ‘प्रधानमंत्री कृषिसिंचन योजना’ आखली;

संदीप चाफेकर,

यवत- शेतीसाठी पाण्याचा अतिरिक्त वापर होत असल्याने शासनाने ठिबकसिंचनसाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करीत ‘प्रधानमंत्री कृषिसिंचन योजना’ आखली; मात्र निधीअभावी येथेही शासनाने आखडता हात घेतला असून, अनुदानाअभावी शेतकऱ्यांनी दाखल केलेले प्रस्ताव परत करण्यात आले आहेत. जिल्हा कृषी विभागाने शिल्लक राहिलेले प्रस्ताव संबंधित शेतकऱ्यांना परत करा, असे आदेश सर्व तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिले आहेत. एकीकडे शासन ठिबकवर शेती करा, असे सांगत असताना निधीचे कारण पुढे करून प्रस्ताव परत करीत असल्याबाबत शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रधानमंत्री कृषिसिंचन योजनेच्या माध्यमातून ठिबक सिंचन योजनेसाठी ३५ ते ५० टक्के अनुदान शासनाच्या वतीने दिले जाते. त्यानुसार शेतकऱ्यांनी शासनाच्या कृषी विभागाकडे रीतसर यासाठी प्रस्ताव दाखल केले होते. मात्र, यातील अनेक शेतकऱ्यांचे प्रस्ताव परत करण्यात येत आहेत. पुणे जिल्ह्यात ७८५६ शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन योजनेसाठी प्रस्ताव कृषी विभागाकडे दाखल केले होते. यातील १६५६ शेतकऱ्यांचे प्रस्ताव यासाठी अपात्र ठरल्याने बाद करण्यात आले आहेत. तर, ६२०० प्रस्ताव यासाठी पात्र होते. मात्र, यातील केवळ ३७२४ शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आले. उर्वरित २४७६ पात्र शेतकऱ्यांचे प्रस्ताव निधी उपलब्ध नसल्याने परत पाठविण्याची वेळ कृषी विभागावर आली आहे.सदर योजनेसाठी आॅनलाईन प्रस्ताव दाखल करावे लागतात. अगोदरच जास्तीचे प्रस्ताव आल्याने नोव्हेंबर २०१५ पासून आॅनलाईन प्रस्ताव स्वीकारणेदेखील कृषी विभागाने बंद केले होते. यामुळे अनेक शेतकऱ्यांना सदर योजनेत प्रस्ताव दाखल न करता आल्याने त्यांची संख्यादेखील मोठी आहे.पुणे जिल्हा कृषी अधीक्षकांनी याबाबत जिल्ह्यातील सर्व तालुका अधिकाऱ्यांना २ जून २०१६ रोजी एका पत्रद्वारे अनुदानअभावी शिल्लक राहिलेले प्रस्ताव संबंधित लाभर्थ्यांना परत करण्याचे आदेश दिले आहेत. सदर आदेशात ज्या प्रस्तावांना पूर्व संमती दिली होती, तथापि विहीत वेळेत (१ महिन्यात ) प्राप्त न झाल्याने अनुदानासाठी शिफारस केली नसल्यास अशा प्रस्तावांचे पूर्व संमती आदेश रद्द करून प्रस्ताव परत करण्यास सांगितले आहे. तसेच, कोणत्याही परिस्थितीत अनुदान नसताना प्रस्ताव कार्यालयांनी स्वीकारू नयेत, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. >यंदा अपेक्षेपेक्षा जास्त प्रस्ताव : अनेक शेतकरी योजनेपासून वंचितपुणे जिल्ह्यासाठी उपलब्ध असलेल्या लभांशापेक्षा जास्त आलेले प्रस्ताव परत करण्यात आले आहे. निधी उपलब्ध नसल्याने सदर प्रस्ताव परत पाठविण्यात आले असून, आॅनलाईन प्रस्ताव दाखल करण्यात आल्यानंतर ज्यांचे प्रस्ताव अगोदर आले अशा शेतकऱ्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. पाण्याची कमतरता भासू लागल्याने शेतकरीवर्गाचा कल ठिबक सिंचन करण्याकडे अचानकपणे वाढला आहे. यामुळे यंदा अपेक्षेपेक्षा जास्त प्रस्ताव आल्याने अशी परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी सुभाष काटकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.एकीकडे केंद्र शासनाने नोकरदारवर्गासाठी सातवा वेतन आयोग लागू करून लाखो रुपये उपलब्ध करून दिले आहेत. तर, दुसरीकडे कमी पाण्यात शेती करण्यासाठी ठिबक सिंचन योजनेसाठी पुरेसा निधी उपलब्ध करत नसल्याने आता ग्रामीण भागातून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.पुणे जिल्ह्यासाठी या योजनेसाठी यावर्षी १८ कोटींचा निधी मिळाला होता. आॅनलाईन अर्ज केला म्हणजे अनुदानासाठी पात्र ठरलो असा शेतकऱ्यांचा समज झाल्याने ते फेरे मारत आहेत. मात्र, जेवढे अनुदान मिळाले तेवढे वाटप केले आहे.