शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
4
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
5
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
6
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
7
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
8
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
9
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
10
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
11
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
12
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
13
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
14
नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार!
15
July Born Astro: कसा ओळखावा जुलैमधल्या लोकांचा स्वभाव? ब्रह्मदेवालाही कळणे कठीण; वाचा गुण-दोष!
16
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
17
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
18
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
19
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
20
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...

सरकार समाजमन जाणून घेणार

By admin | Updated: September 27, 2016 05:38 IST

मराठा आरक्षण आणि अ‍ॅट्रॉसिटीच्या कायद्याबाबत होत असलेल्या मागणीवर मराठा समाजासह एकूणच समाजमन जाणून घेण्यासाठी मंत्र्यांसह विधानसभेचे विरोधी

मुंबई : मराठा आरक्षण आणि अ‍ॅट्रॉसिटीच्या कायद्याबाबत होत असलेल्या मागणीवर मराठा समाजासह एकूणच समाजमन जाणून घेण्यासाठी मंत्र्यांसह विधानसभेचे विरोधी पक्षनेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते यांचे गट तयार करून थेट जनतेत जाण्यावर राज्य सरकार विचार करीत आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली.यासंदर्भात विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच चर्चा करतील, असे स्पष्ट संकेत एका ज्येष्ठ मंत्र्याने आज पत्रकारांशी बोलताना दिले. या मंत्र्याने सांगितले की, प्रत्येक जिल्ह्यात या गटाने जावे आणि जनभावना जाणून घ्यावी, असा प्रयत्न असेल. त्यात मराठा समाजाबरोबरच इतर समाजाची मतेदेखील जाणून घेण्यात येतील. (विशेष प्रतिनिधी)मोर्चेकऱ्यांनी चर्चेसाठी नेते निवडावेतमराठा समाजाचे प्रचंड मोर्चे सध्या निघत आहेत. या मोर्चांचे नेमके नेतृत्व समोर येत नसल्याने कोणासोबत चर्चा करावी, याबाबत सरकार संभ्रमात आहे. मोर्चेकऱ्यांनी आपल्यातून काही नेते चर्चेसाठी निवडावेत, अशी सरकारची अपेक्षा आहे. तसे झाले तर मराठा समाजाच्या मागण्यांविषयी चर्चा कोणाशी करायची हे स्पष्ट होईल, असे मत या मंत्र्यांनी व्यक्त केले. मंत्री आणि विरोधी पक्षांचे गट जिल्ह्याजिल्ह्यांत जाऊन जनभावना जाणून घेतील याचा अर्थ मराठा समाजाच्या मोर्चेकऱ्यांशी सरकार चर्चा करणार नाही, असे मुळीच नाही. या मोर्चेकऱ्यांच्या नेत्यांशी निश्चितपणे चर्चा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.मुख्यमंत्र्यांच्या पदास अजिबात धोका नाहीदेवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाला कोणताही धोका नसल्याचे आणि पक्षात त्यांना बदलण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्वत: मराठा समाजाचे असलेल्या या मंत्रीमहोदयांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, मराठा समाजाचे मोर्चे हे फडणवीस वा राज्य सरकारच्या विरोधात नाहीत. शिवाय, मुख्यमंत्र्यांना हटविण्याची कोणाचीही मागणी नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.आरक्षणाबरोबरच इतर उपायदेखील करणारमराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीत आरक्षण देणारच, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. तथापि, सकल मराठा समाजाच्या कल्याणासाठी इतरही उपाययोजना राज्य सरकारकडून करण्यात येणार आहेत. अण्णासाहेब पाटील यांच्या नावाने असलेल्या आर्थिक विकास महामंडळाला राज्य सरकारकडून २०० कोटी रुपये देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा याच उपाययोजनेचा भाग आहे. याशिवाय, मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती, या समाजातील तरुणांसाठी कौशल्य विकासाचे कार्यक्रम यावरही भर दिला जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.