शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

लष्कराचे श्रेय सरकारने लाटू नये

By admin | Updated: October 8, 2016 04:13 IST

भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मिरात (पीओके) घुसून ‘सर्जिकल स्ट्राइक्स’द्वारे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.

अमरावती : भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मिरात (पीओके) घुसून ‘सर्जिकल स्ट्राइक्स’द्वारे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. ही कारवाई शत्रूला वेगळा संदेश देणारी आहे. ‘उरी’च्या बदल्याचे श्रेय खऱ्या अर्थाने लष्कराचे आहे. परंतु या कारवाईचा मोदी सरकारने गवगवा करून श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी येथे केली.अमरावती येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागीय मेळाव्यात ते बोलत होते. पवार म्हणाले, ‘संपुआ’ सरकारच्या काळात चारवेळा ‘सर्जिकल स्ट्राइक्स’ करण्यात आले, पण देशहित लक्षात घेऊन त्याचे ‘मार्केटिंग’ आम्ही केले नाही. उरी येथील हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईचे राजकीय फायद्यासाठी श्रेय लाटण्याचा प्रयत्न मोदी सरकार आणि भाजपाची मंडळी करीत आहेत. (प्रतिनिधी)>तामिळनाडूत मिळू शकते, तर महाराष्ट्रात का नाही?तामिळनाडूत ७४ टक्क्यांपर्यंत आरक्षण दिले जाते, तर महाराष्ट्रातील मराठ्यांना आरक्षण देताना हे निकष का लावले जात नाहीत, असा सवालही पवार यांनी उपस्थित केला. आरक्षणासाठी राज्यभरात मराठा समाजाचे मोर्चे निघत आहेत. आरक्षणाची मागणी करताना यात शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. मराठ्यांना आरक्षण देताना दलित, आदिवासी, ओबीसी व इतर समाजाचे आरक्षण सुरक्षित ठेवण्यात आले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी द्या!कोपर्डी येथील एका युवतीवर अमानुष अत्याचार करण्यात आले. या घटनेनंतर महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकली. गुन्हेगाराला जात, पात, धर्म, पंथ नसतो. त्यामुळे कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी द्यावी, अशी मागणी पवारांनी या वेळी केली. भाजपाने मुस्लिमांना आरक्षण देण्यास नकार दिल्याबाबत त्यांनी चांगलाच समाचार घेतला.