शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

लष्कराचे श्रेय सरकारने लाटू नये

By admin | Updated: October 8, 2016 04:13 IST

भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मिरात (पीओके) घुसून ‘सर्जिकल स्ट्राइक्स’द्वारे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.

अमरावती : भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मिरात (पीओके) घुसून ‘सर्जिकल स्ट्राइक्स’द्वारे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. ही कारवाई शत्रूला वेगळा संदेश देणारी आहे. ‘उरी’च्या बदल्याचे श्रेय खऱ्या अर्थाने लष्कराचे आहे. परंतु या कारवाईचा मोदी सरकारने गवगवा करून श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी येथे केली.अमरावती येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागीय मेळाव्यात ते बोलत होते. पवार म्हणाले, ‘संपुआ’ सरकारच्या काळात चारवेळा ‘सर्जिकल स्ट्राइक्स’ करण्यात आले, पण देशहित लक्षात घेऊन त्याचे ‘मार्केटिंग’ आम्ही केले नाही. उरी येथील हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईचे राजकीय फायद्यासाठी श्रेय लाटण्याचा प्रयत्न मोदी सरकार आणि भाजपाची मंडळी करीत आहेत. (प्रतिनिधी)>तामिळनाडूत मिळू शकते, तर महाराष्ट्रात का नाही?तामिळनाडूत ७४ टक्क्यांपर्यंत आरक्षण दिले जाते, तर महाराष्ट्रातील मराठ्यांना आरक्षण देताना हे निकष का लावले जात नाहीत, असा सवालही पवार यांनी उपस्थित केला. आरक्षणासाठी राज्यभरात मराठा समाजाचे मोर्चे निघत आहेत. आरक्षणाची मागणी करताना यात शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. मराठ्यांना आरक्षण देताना दलित, आदिवासी, ओबीसी व इतर समाजाचे आरक्षण सुरक्षित ठेवण्यात आले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी द्या!कोपर्डी येथील एका युवतीवर अमानुष अत्याचार करण्यात आले. या घटनेनंतर महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकली. गुन्हेगाराला जात, पात, धर्म, पंथ नसतो. त्यामुळे कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी द्यावी, अशी मागणी पवारांनी या वेळी केली. भाजपाने मुस्लिमांना आरक्षण देण्यास नकार दिल्याबाबत त्यांनी चांगलाच समाचार घेतला.