शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

सरकार पैशांसाठी जमिनी विकणार

By admin | Updated: September 21, 2016 05:39 IST

सरकारने आता मिठागाराच्या जमिनी विकणे आणि उड्डाणपुलांच्या खालच्या जमिनी भाडेतत्त्वावर देऊन पैसे उभे करण्याचा निर्णय घेतला आहे.

अतुल कुलकर्णी,

मुंबई- आर्थिक वर्षाच्या मध्येच व्हॅटमध्ये वाढ केल्यानंतर महसूल वाढविण्यासाठी सरकारने आता मिठागाराच्या जमिनी विकणे आणि उड्डाणपुलांच्या खालच्या जमिनी भाडेतत्त्वावर देऊन पैसे उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याला विविध करांच्या माध्यमातून किती महसूल मिळतो याचा आढावा वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला. तेव्हा कराशिवाय मिळणाऱ्या महसुलाचे प्रमाण अन्य राज्यांच्या तुलनेत अत्यल्प असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. करेतर उत्पन्नाच्या माध्यमातून ३७ टक्के उत्पन्न मिळणारे राज्य म्हणून तेलंगणाचा पहिला नंबर आहे तर फक्त १९ टक्के उत्पन्न मिळवून महाराष्ट्र राज्यात सातव्या नंबरावर आहे. १९ टक्के म्हणजे राज्याच्या तिजोरीत कराशिवायच्या महसुलातून जवळपास ८ ते १० हजार कोटी रुपये मिळतात. हाच महसूल आता किमान १५ ते २० हजार कोटींपर्यंत कसा वाढेल याचे नियोजन केले जात आहे. महसूल वाढविण्यासाठी वित्तमंत्र्यांनी करेतर उत्पन्नाचा एक आराखडाच तयार करण्याचे आदेश दिले होते. >महसूल वाढीसाठीचे उपायवापरात नसलेल्या जमिनी तसेच मिठागाराच्या जमिनी विक्रीस काढणे.भाडेतत्त्वावर दिलेल्या मालमत्तांची भाडेवाढ करणे.महत्त्वाचे रस्ते, सरकारी इमारतींच्या किनाऱ्यांच्या जागांचे जाहिरात हक्क विकून पैसे उभे करणेउड्डाणपुलाखालील मोकळ्या जागा अ‍ॅटो कंपन्यांना, डिस्प्लेसाठी तसेच पार्किंगसाठी भाडेतत्त्वावर देऊन पैसे मिळवणार.महामार्ग, मेट्रो कॉरिडोअरच्या आजूबाजूच्या जागा व्यावसायिक तत्त्वासाठी आयटी, आयटीईएससारख्या कंपन्यांना कार्यालये करण्यासाठी भाडेतत्त्वावर देऊन महसुलात वाढ करणार; शिवाय महामार्गांभोवती असणाऱ्या मोक्याच्या जागी हॉटेल्स, हॉस्पिटल, सर्व्हिस अपार्टमेंट उभे करणार.कन्व्हेअन्शन सेंटर्स, थीम पार्क, गोडाऊन्स, सोलार पार्कस्ची उभारणी करून महसूल वाढवणार.