शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

हेही सरकार मागील सरकारप्रमाणेच!

By admin | Updated: October 16, 2016 02:41 IST

राज्यात सत्तांतर होऊन दोन वर्षे होत आली तरीही शिक्षण विभागाचा कारभार अद्यापही आघाडी सरकारसारखाच सुरू असून, विद्यार्थ्यांच्या समस्या पूर्वीप्रमाणेच कायम आहेत.

मुंबई : राज्यात सत्तांतर होऊन दोन वर्षे होत आली तरीही शिक्षण विभागाचा कारभार अद्यापही आघाडी सरकारसारखाच सुरू असून, विद्यार्थ्यांच्या समस्या पूर्वीप्रमाणेच कायम आहेत. त्यामुळे पूर्वीच्या व आताच्या सरकारमध्ये काहीही बदल असल्यासारखे वाटत नाही, असा टोला युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शनिवारी युती सरकारला लगावला. ‘केजी टू पीजी’ शिक्षणाच्या गोंधळाविरुद्ध सरकारला आणि शिक्षण खात्याला जाग आणण्यासाठी युवासेनेच्या वतीने आयोजिलेल्या मोर्चात ते बोलत होते. या वेळी त्यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या कार्यपद्धतीवर अप्रत्यक्षपणे टीका करीत विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास त्यांना मंत्रिपदावरून घालविण्याचा इशारा दिला. गिरगाव चौपाटीजवळील विल्सन महाविद्यालयापासून ते मरिन लाइन्सपर्यंत मोर्चा काढण्यात आला. इस्लाम जिमखान्याच्या मैदानावर त्याचे सभेत रूपांतर झाले. या वेळी आदित्य ठाकरे म्हणाले, ‘युतीचे सरकार आल्यानंतर चांगले बदल होण्याची अपेक्षा होती, पण गेल्या दोन वर्षांत शैक्षणिक क्षेत्र विकासासाठी हवा तो बदल झालेला नाही. शैक्षणिक सुधारणेसाठी अनेकदा शिक्षणमंत्र्यांची भेट घेतली; मात्र त्याबाबत आतापर्यंत आश्वासनांशिवाय काही मिळाले नाही. त्यामुळे आता मागण्यांनाही ‘एटीकेटी’ लागली की काय? अशी भीती वाटायला लागली आहे. पाल्याच्या प्रवेशासाठी पालकांना मोठ्या देणग्या द्याव्या लागतात. शाळेत मूल शिकायला येते की, प्रवेशापूर्वीच्या मुलाखतीला सामोरे जायला हे कळेनासे झाले आहे. या डोनेशनविरुद्ध कायदा हवा. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नापास न करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचा परिणाम नववीच्या विद्यार्थ्यांवर होत आहे. नववीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या दीड लाख इतकी आहे. अकरावी प्रवेशासाठीचा गोंधळ तर अजूनही संपलेला नाही. ‘एमकेसीएल’ आहे तरी कोण? त्याच्या मागे कोण आहे? आॅनलाइन प्रवेशाने गोंधळ होत आहे हे कळत असूनही आॅनलाइन प्रवेशाचा घाट कशासाठी घातला जात आहे, हे स्पष्ट होत नसल्याचे सांगत ठाकरे यांनी निट, विधी, सीईटी गोंधळाला सरकार जबाबदार असल्याची टीका केली. मोर्चामध्ये शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे, आदेश बांदेकर, सिनेट सदस्य वरुण सरदेसाई, प्रदीप सावंत, साईनाथ दुर्गे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)ओझ्याचे काय?दप्तरांची ओझी कमी करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने वारंवार देऊनदेखील अजूनही विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी झालेले नाही, असे सांगून डिजिटल इंडियाचे स्वप्न पाहणाऱ्या सरकारने हा प्रश्न पहिल्यांदा सोडवावा, अशी मागणी ठाकरे यांनी केली.निवडणुका डोळ््यासमोर ठेवून मोर्चा - विनोद तावडेयुवासेनचा मोर्चा हा शिक्षणाच्या प्रश्नावर आहे की आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी काढलेला मोर्चा आहे असा प्रश्न पडतो, असे प्रत्युत्तर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले आहे.