शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
2
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
3
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
4
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
5
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
6
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
7
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
8
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
9
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
10
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
11
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
12
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
13
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
14
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
15
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
16
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
17
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
18
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
19
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
20
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...

हेही सरकार मागील सरकारप्रमाणेच!

By admin | Updated: October 16, 2016 02:41 IST

राज्यात सत्तांतर होऊन दोन वर्षे होत आली तरीही शिक्षण विभागाचा कारभार अद्यापही आघाडी सरकारसारखाच सुरू असून, विद्यार्थ्यांच्या समस्या पूर्वीप्रमाणेच कायम आहेत.

मुंबई : राज्यात सत्तांतर होऊन दोन वर्षे होत आली तरीही शिक्षण विभागाचा कारभार अद्यापही आघाडी सरकारसारखाच सुरू असून, विद्यार्थ्यांच्या समस्या पूर्वीप्रमाणेच कायम आहेत. त्यामुळे पूर्वीच्या व आताच्या सरकारमध्ये काहीही बदल असल्यासारखे वाटत नाही, असा टोला युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शनिवारी युती सरकारला लगावला. ‘केजी टू पीजी’ शिक्षणाच्या गोंधळाविरुद्ध सरकारला आणि शिक्षण खात्याला जाग आणण्यासाठी युवासेनेच्या वतीने आयोजिलेल्या मोर्चात ते बोलत होते. या वेळी त्यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या कार्यपद्धतीवर अप्रत्यक्षपणे टीका करीत विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास त्यांना मंत्रिपदावरून घालविण्याचा इशारा दिला. गिरगाव चौपाटीजवळील विल्सन महाविद्यालयापासून ते मरिन लाइन्सपर्यंत मोर्चा काढण्यात आला. इस्लाम जिमखान्याच्या मैदानावर त्याचे सभेत रूपांतर झाले. या वेळी आदित्य ठाकरे म्हणाले, ‘युतीचे सरकार आल्यानंतर चांगले बदल होण्याची अपेक्षा होती, पण गेल्या दोन वर्षांत शैक्षणिक क्षेत्र विकासासाठी हवा तो बदल झालेला नाही. शैक्षणिक सुधारणेसाठी अनेकदा शिक्षणमंत्र्यांची भेट घेतली; मात्र त्याबाबत आतापर्यंत आश्वासनांशिवाय काही मिळाले नाही. त्यामुळे आता मागण्यांनाही ‘एटीकेटी’ लागली की काय? अशी भीती वाटायला लागली आहे. पाल्याच्या प्रवेशासाठी पालकांना मोठ्या देणग्या द्याव्या लागतात. शाळेत मूल शिकायला येते की, प्रवेशापूर्वीच्या मुलाखतीला सामोरे जायला हे कळेनासे झाले आहे. या डोनेशनविरुद्ध कायदा हवा. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नापास न करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचा परिणाम नववीच्या विद्यार्थ्यांवर होत आहे. नववीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या दीड लाख इतकी आहे. अकरावी प्रवेशासाठीचा गोंधळ तर अजूनही संपलेला नाही. ‘एमकेसीएल’ आहे तरी कोण? त्याच्या मागे कोण आहे? आॅनलाइन प्रवेशाने गोंधळ होत आहे हे कळत असूनही आॅनलाइन प्रवेशाचा घाट कशासाठी घातला जात आहे, हे स्पष्ट होत नसल्याचे सांगत ठाकरे यांनी निट, विधी, सीईटी गोंधळाला सरकार जबाबदार असल्याची टीका केली. मोर्चामध्ये शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे, आदेश बांदेकर, सिनेट सदस्य वरुण सरदेसाई, प्रदीप सावंत, साईनाथ दुर्गे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)ओझ्याचे काय?दप्तरांची ओझी कमी करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने वारंवार देऊनदेखील अजूनही विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी झालेले नाही, असे सांगून डिजिटल इंडियाचे स्वप्न पाहणाऱ्या सरकारने हा प्रश्न पहिल्यांदा सोडवावा, अशी मागणी ठाकरे यांनी केली.निवडणुका डोळ््यासमोर ठेवून मोर्चा - विनोद तावडेयुवासेनचा मोर्चा हा शिक्षणाच्या प्रश्नावर आहे की आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी काढलेला मोर्चा आहे असा प्रश्न पडतो, असे प्रत्युत्तर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले आहे.