शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

हेही सरकार मागील सरकारप्रमाणेच!

By admin | Updated: October 16, 2016 02:41 IST

राज्यात सत्तांतर होऊन दोन वर्षे होत आली तरीही शिक्षण विभागाचा कारभार अद्यापही आघाडी सरकारसारखाच सुरू असून, विद्यार्थ्यांच्या समस्या पूर्वीप्रमाणेच कायम आहेत.

मुंबई : राज्यात सत्तांतर होऊन दोन वर्षे होत आली तरीही शिक्षण विभागाचा कारभार अद्यापही आघाडी सरकारसारखाच सुरू असून, विद्यार्थ्यांच्या समस्या पूर्वीप्रमाणेच कायम आहेत. त्यामुळे पूर्वीच्या व आताच्या सरकारमध्ये काहीही बदल असल्यासारखे वाटत नाही, असा टोला युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शनिवारी युती सरकारला लगावला. ‘केजी टू पीजी’ शिक्षणाच्या गोंधळाविरुद्ध सरकारला आणि शिक्षण खात्याला जाग आणण्यासाठी युवासेनेच्या वतीने आयोजिलेल्या मोर्चात ते बोलत होते. या वेळी त्यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या कार्यपद्धतीवर अप्रत्यक्षपणे टीका करीत विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास त्यांना मंत्रिपदावरून घालविण्याचा इशारा दिला. गिरगाव चौपाटीजवळील विल्सन महाविद्यालयापासून ते मरिन लाइन्सपर्यंत मोर्चा काढण्यात आला. इस्लाम जिमखान्याच्या मैदानावर त्याचे सभेत रूपांतर झाले. या वेळी आदित्य ठाकरे म्हणाले, ‘युतीचे सरकार आल्यानंतर चांगले बदल होण्याची अपेक्षा होती, पण गेल्या दोन वर्षांत शैक्षणिक क्षेत्र विकासासाठी हवा तो बदल झालेला नाही. शैक्षणिक सुधारणेसाठी अनेकदा शिक्षणमंत्र्यांची भेट घेतली; मात्र त्याबाबत आतापर्यंत आश्वासनांशिवाय काही मिळाले नाही. त्यामुळे आता मागण्यांनाही ‘एटीकेटी’ लागली की काय? अशी भीती वाटायला लागली आहे. पाल्याच्या प्रवेशासाठी पालकांना मोठ्या देणग्या द्याव्या लागतात. शाळेत मूल शिकायला येते की, प्रवेशापूर्वीच्या मुलाखतीला सामोरे जायला हे कळेनासे झाले आहे. या डोनेशनविरुद्ध कायदा हवा. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नापास न करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचा परिणाम नववीच्या विद्यार्थ्यांवर होत आहे. नववीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या दीड लाख इतकी आहे. अकरावी प्रवेशासाठीचा गोंधळ तर अजूनही संपलेला नाही. ‘एमकेसीएल’ आहे तरी कोण? त्याच्या मागे कोण आहे? आॅनलाइन प्रवेशाने गोंधळ होत आहे हे कळत असूनही आॅनलाइन प्रवेशाचा घाट कशासाठी घातला जात आहे, हे स्पष्ट होत नसल्याचे सांगत ठाकरे यांनी निट, विधी, सीईटी गोंधळाला सरकार जबाबदार असल्याची टीका केली. मोर्चामध्ये शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे, आदेश बांदेकर, सिनेट सदस्य वरुण सरदेसाई, प्रदीप सावंत, साईनाथ दुर्गे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)ओझ्याचे काय?दप्तरांची ओझी कमी करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने वारंवार देऊनदेखील अजूनही विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी झालेले नाही, असे सांगून डिजिटल इंडियाचे स्वप्न पाहणाऱ्या सरकारने हा प्रश्न पहिल्यांदा सोडवावा, अशी मागणी ठाकरे यांनी केली.निवडणुका डोळ््यासमोर ठेवून मोर्चा - विनोद तावडेयुवासेनचा मोर्चा हा शिक्षणाच्या प्रश्नावर आहे की आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी काढलेला मोर्चा आहे असा प्रश्न पडतो, असे प्रत्युत्तर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले आहे.