शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

लोंढे रोखण्यावरून सरकारचे घूमजाव

By admin | Updated: April 2, 2015 05:18 IST

मुंबईत येणारे परप्रांतीयांचे लोंढे रोखण्यासाठी सरकारने अर्थसंकल्पात तरतूद केलेली नाही. सामान्य प्रशासन विभागाच्या अंदाजपत्रकात आलेला मुद्दा

मुंबई : मुंबईत येणारे परप्रांतीयांचे लोंढे रोखण्यासाठी सरकारने अर्थसंकल्पात तरतूद केलेली नाही. सामान्य प्रशासन विभागाच्या अंदाजपत्रकात आलेला मुद्दा २००८ पासूनचा आहे आणि तो याही वेळी प्रकाशित झाला, असे सांगून सरकारने या मुद्द्यावरून घूमजाव केले. यंदाच्या अर्थसंकल्पात मुंबईतील परप्रांतीयांचे लोंढे रोखण्यासाठी तरतूद करण्यात आल्याचे वृत्त ‘लोकमत‘ने ३० मार्चच्या अंकात प्रकाशित केले होते. त्याचे तीव्र पडसाद उमटताच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत विनिनियोजन विधेयक मंजूर करतेवेळी सारवासारव करण्याचा प्रयत्न करीत  लोकमतमधील वृत्त म्हणजे राईचा पर्वत करण्यासारखे आहे, असे सांगितले. मात्र, भाजपाचे आ. आशिष शेलार यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता हे सांगण्याचे अर्थमंत्र्यांनी खुबीने टाळले. आ. शेलार यांनी घेतलेल्या ओक्षपाकडे लक्ष वेधले असता ‘शेलार यांनी काय भाषण केले ते मला माहित नाही. कदाचित हा विषय समजण्याची त्यांची गल्लत झाली असावी’, असा खुलासाही मुनगंटीवार यांनी केला. सामान्य प्रशासन विभागाच्या कार्यक्रम अंदाजपत्रकात कार्यासन क्र. २९ अ मध्ये ‘मुंबईत परप्रांतियांचे येणारे लोंढे रोखण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत’ असा दहाव्या नंबरचा मुद्दा आहे. जर यासाठी आर्थिक तरतूदच नाही तर हा विषय बजेटच्या अंदाजपत्रकात कसा आला, असा प्रश्न उपस्थित होतो. त्यावर अर्थमंत्र्यांचे म्हणणे असे की, कोणत्या डेस्कने या प्रश्नाचे उत्तर द्यायचे हे निश्चित करण्यासाठी तो उल्लेख आहे. जर अर्थमंत्र्यांचे म्हणणे ग्राह्ण धरले तर हा विषय अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात न येता तो ‘सामान्य विभागाच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये’ यात यायला हवा होता, पण तसे घडलेले नाही. (विशेष प्रतिनिधी)