शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
3
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
4
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
5
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
6
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
7
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
8
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
9
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
10
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
11
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
12
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
13
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
15
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
16
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
17
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
18
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
19
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
20
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला

सरकारने लपविली ‘जात’!

By admin | Updated: February 15, 2015 00:46 IST

देशभरात चर्चेचा विषय ठरलेली सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणनेची माहिती जाहीर झाली असून सर्वेक्षणातून नोंदविलेली जातींची माहितीच मात्र सरकारने लपवून ठेवली आहे.

मिलिंदकुमार साळवेल्ल श्रीरामपूर (जि. अहमदनगर)देशभरात चर्चेचा विषय ठरलेली सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणनेची माहिती जाहीर झाली असून सर्वेक्षणातून नोंदविलेली जातींची माहितीच मात्र सरकारने लपवून ठेवली आहे.स्वातंत्र्यानंतर प्रथमच जातनिहाय जनगणना केली जात असल्याचा मोठा गवगवा झाला होता. जून ते डिसेंबर २०११ दरम्यान मुख्य जनगणनेनंतर दुसऱ्यांदा जनगणना करण्यात आली. त्याला ‘सामाजिक-आर्थिक व जातीनिहाय जनगणना’ असे नाव देण्यात आले होते. १ जानेवारी २०१५ रोजी प्रारुप याद्यांच्या माध्यमातून माहिती जाहीर झाली. त्यावर ३० जानेवारीपर्यंत दावे व आक्षेप स्वीकारण्यात आले. २१ फेब्रुवारीपर्यंत दावे व आक्षेप निकाली काढण्याची अंतिम मुदत आहे.श्रीरामपूर नगरपालिकेच्या सभागृहात प्रारुप याद्या नागरिकांच्या अवलोकनार्थ प्रभागनिहाय ठेवण्यात आल्या होत्या. त्याची पाहणी केल्यावर त्यावर ‘जातनिहाय जनगणना’ असा उल्लेख असला तरी प्रत्यक्षात त्यात जातींचा उल्लेख नाही. यादीतील आठव्या क्रमांकाच्या रकान्यात ‘जात / जमात व इतर’ असा उल्लेख असला तरी त्यात जातींचा उल्लेखच नाही. त्या ऐवजी ‘अनुसूचित जाती, जमाती व इतर’ एवढाच त्रोटक उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे प्रारुप याद्यांवर आक्षेप, हरकती घेण्यासाठी जातींची माहितीच नसल्याने त्यावर हरकती घ्यायच्या कशा?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. नगरपालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार याद्या पालिकेच्या सभागृहात हरकती, तक्रारी नोंदविण्यासाठी ठेवल्या होत्या. संबंधित माहितीचा विषय केंद्र सरकार व वरिष्ठ पातळीवरचा आहे.- संतोष खांडेकर,मुख्याधिकारी, श्रीरामपूर नगरपालिका़़़ही तर फसवणूकचजातनिहाय जनगणना होणार म्हणून अनेक नेत्यांनी, पुढाऱ्यांनी महाराष्ट्रात जल्लोष केला. पण प्रत्यक्षात जनगणनेच्या याद्यांमध्ये जातींचा उल्लेखच नाही. सरकारने जाती लपवून सर्वच भारतीयांची, महाराष्ट्रातील सर्वसामान्यांची फसवणूकच केली आहे.- कृषीराज टकले, प्रदेश सरचिटणीस, अखिल भारतीय मराठा सेवा संघ