शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

वाहतूक नियम अंमलबजावणीस सरकार अपयशी

By admin | Updated: August 17, 2016 03:35 IST

वाहतुकीचे नियम व अधिनियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने मार्च २०१५ मध्ये दिला होता.

मुंबई : वाहतुकीचे नियम व अधिनियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने मार्च २०१५ मध्ये दिला होता. तथापि, या आदेशाचीच अंमलबजावणी करण्यात राज्य सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फैलावर घेत गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव के. पी. बक्षी यांना २ सप्टेंबरपर्यंत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले. वाहतूक नियम व अधिनियमांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी उच्च न्यायालयाने २०१३ मध्ये नेमलेल्या उच्चस्तरीय समितीने नियमित बैठक घेऊन न्यायालयाच्या आदेशांवर चर्चा करून त्यांची पूर्तता केली जाते की नाही, याचा आढावा घ्यावा, असे निर्देश उच्च न्यायालयाने मार्च २०१५ मध्ये दिले होते. शहरातील मोठ्या जंक्शन्सवर उत्तम दर्जाचे सीसीटीव्ही बसवणे, वाहनांची नोंद डिजिटायझेशन पद्धतीने करणे, वाहतूक पोलीस विभागातील रिक्त पदे भरणे इत्यादी निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला व संबंधित प्रशासनांना दिले होते.वाहतुकीच्या नियमांचे पालन होत नसल्याने नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे सरकार व संबंधित प्रशासनांना नियमांचे पालन करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका बॉम्बे बार असोसिएशनने उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीत उच्च न्यायालयाने वरील निर्देश सरकारला दिले.उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार उच्चस्तरीय समितीची एकदाही बैठक झाली नाही आणि उच्च न्यायालयाच्या एकाही निर्देशाची किंवा सूचनेची अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्याशिवाय उच्च न्यायालयाची परवानगी न घेता उच्चस्तरीय समितीने उपसमिती नेमल्याचेही बॉम्बे बार असोसिएशनने न्या. अभय ओक व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठाच्या निदर्शनास आणले.‘उच्च न्यायालयानेच उच्चस्तरीय समिती नेल्यावर ही समिती उपसमिती कशी नेमू शकते? हा अधिकार कोणी दिला? आतापर्यंत सरकारने काय केले? न्यायालयाने दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी करण्यास सरकार अपयशी ठरले आहे,’ अशा शब्दांत सरकारवर टीका करत उच्च न्यायालयाने गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव के. पी. बक्षी यांना २ सप्टेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)