शहरं
Join us  
Trending Stories
1
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
2
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूर स्थगित केलंय, थांबवलेलं नाही; मोदींचा पाकिस्तानला इशारा
3
"भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
4
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
5
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
7
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
8
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
9
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
10
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
11
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
12
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
13
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
14
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
15
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
16
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
17
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
18
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
19
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
20
मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न

वाहतूक नियम अंमलबजावणीस सरकार अपयशी

By admin | Updated: August 17, 2016 03:35 IST

वाहतुकीचे नियम व अधिनियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने मार्च २०१५ मध्ये दिला होता.

मुंबई : वाहतुकीचे नियम व अधिनियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने मार्च २०१५ मध्ये दिला होता. तथापि, या आदेशाचीच अंमलबजावणी करण्यात राज्य सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फैलावर घेत गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव के. पी. बक्षी यांना २ सप्टेंबरपर्यंत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले. वाहतूक नियम व अधिनियमांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी उच्च न्यायालयाने २०१३ मध्ये नेमलेल्या उच्चस्तरीय समितीने नियमित बैठक घेऊन न्यायालयाच्या आदेशांवर चर्चा करून त्यांची पूर्तता केली जाते की नाही, याचा आढावा घ्यावा, असे निर्देश उच्च न्यायालयाने मार्च २०१५ मध्ये दिले होते. शहरातील मोठ्या जंक्शन्सवर उत्तम दर्जाचे सीसीटीव्ही बसवणे, वाहनांची नोंद डिजिटायझेशन पद्धतीने करणे, वाहतूक पोलीस विभागातील रिक्त पदे भरणे इत्यादी निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला व संबंधित प्रशासनांना दिले होते.वाहतुकीच्या नियमांचे पालन होत नसल्याने नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे सरकार व संबंधित प्रशासनांना नियमांचे पालन करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका बॉम्बे बार असोसिएशनने उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीत उच्च न्यायालयाने वरील निर्देश सरकारला दिले.उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार उच्चस्तरीय समितीची एकदाही बैठक झाली नाही आणि उच्च न्यायालयाच्या एकाही निर्देशाची किंवा सूचनेची अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्याशिवाय उच्च न्यायालयाची परवानगी न घेता उच्चस्तरीय समितीने उपसमिती नेमल्याचेही बॉम्बे बार असोसिएशनने न्या. अभय ओक व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठाच्या निदर्शनास आणले.‘उच्च न्यायालयानेच उच्चस्तरीय समिती नेल्यावर ही समिती उपसमिती कशी नेमू शकते? हा अधिकार कोणी दिला? आतापर्यंत सरकारने काय केले? न्यायालयाने दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी करण्यास सरकार अपयशी ठरले आहे,’ अशा शब्दांत सरकारवर टीका करत उच्च न्यायालयाने गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव के. पी. बक्षी यांना २ सप्टेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)