शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
3
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
4
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
5
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
6
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
8
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
9
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
10
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
11
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
12
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
13
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
14
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
15
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
16
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
17
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
18
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
19
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
20
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी

सूक्ष्म सिंचन योजनेसाठी शासनाचे नियोजनच नाही!

By admin | Updated: July 22, 2014 00:41 IST

सूक्ष्म सिंचन योजनेसाठी शासनाने कोणतेही नियोजन केले नसून, राज्यातील शेतकर्‍यांचे जवळपास २00 कोटी रू पयांचे अनुदान थकले

अकोला : शेतीतील पाण्याचा अतिवापर टाळण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या सूक्ष्म सिंचन योजनेसाठी शासनाने कोणतेही नियोजन केले नसून, राज्यातील शेतकर्‍यांचे जवळपास २00 कोटी रू पयांचे अनुदान थकले असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतकर्‍यांसाठी केंद्र शासनाने सुक्ष्म सिंचन योजना सुरू केली असून, २0११-१२ मध्ये या योजनेसाठी ८२.३५ कोटी रू पये मंजूर करण्यात आले होते. त्यापैकी ६७.८३ कोटी रूपयांचे अनुदान केंद्र शासनाने दिले; मात्र उर्वरित १५.६ कोटी रूपये तीन वर्षापासून रखडले आहेत. हे अनुदान आता राष्ट्रीय कृषी विकास योजनतून देण्यात येणार असल्याचे वृत्त असले तरी, अद्याप हा पैसा शेतकर्‍यांच्या हाती पडला नाही. २0१२-१३ पासून या योजनेची विभागणी करण्यात आली. त्यानुसार विदर्भात विदर्भ सिंचन विकास प्रकल्प (व्हीआएआएडीपी) आणि उर्वरित राज्यासाठी राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन चळवळ (एनएमएमआय) या नावाने ही योजना राबविली जात आहे. व्हीआयआयडीपी योजना विदर्भातील गोंदिया, गडचिरोली व भंडारा हे जिल्हे वगळता उर्वरित सर्व जिल्हयांत राबविण्यात आली. या योजनेंतंर्गत २0१२-१३ मध्ये विदर्भाला १0३ कोटी रुपये मिळाले होते. त्यातील ९७ टक्के रक्कम रितसर खर्च झाली. त्यावेळी विदर्भातील सर्वच जिल्हय़ांचा या योजनेत समावेश होता. यामध्ये अकोला जिल्हय़ातील शेतकर्‍यांना १६ कोटी १५ लाख ५९ हजार रुपये अनुदान मिळाले. २0१३-१४ करिता ९४ कोटी ३८ लाख रू पये मंजूर झाले होते. त्यातील ७२ कोटी ११ लाख ७३ हजार रुपये अनुदान शेतकर्‍यांना मिळाले आहे. उर्वरित अनुदान मात्र शासनाकडे थकीत आहेत. उर्वरित राज्यासाठी राबविण्यात येत असलेल्या एनएमएमआय योजनेंतर्गत २0१२ -१३ साठी १९८ कोटी १७ लाख मंजूर झाले होते. त्यापैकी १४७ कोटी ८५ लाख रूपये एवढेच अनुदान प्राप्त झाले आहे. जवळपास ४0 कोटी रूपये अनुदानाची शेतकर्‍यांना प्रतिक्षा आहे.

** गतवर्षीचे २00 कोटी रूपये थकले

२0१३-१४ मध्ये राज्यातील शेतकर्‍यांनी जवळपास २00 कोटीचे ठिबक व तुषार संच खरेदी केले आहे; तथापि शासनाने कोणतेही मार्गदर्शक तत्व अथवा सुचना केल्या नाही. त्यामुळे आधीच ठिबक व तुषार संच खरेदी करणारे शेतकरी आर्थिक अडचनीत सापडले आहेत. या सर्व शेतकर्‍यांना आता अनुदानाची प्रतिक्षा आहे.

** शेतकर्‍यांचे शेकडो अर्ज धूळ खात

२0१४-१५ सालासाठी मार्गदर्शक तत्व व सुचनाही संबधीत विभागाला प्राप्त झाल्या आहेत; पंरतु गतवर्षी कोणत्याही सुचना नसल्याने शेतकरी वर्ग संभ्रमात सापडला आहे. गतवर्षी शेतकर्‍यांनी या योजनेतंर्गत केलेले शेकडो अर्ज धूळ खात पडले आहेत.