शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
2
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
3
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
4
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
5
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला
6
Health Tips: पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? जेवण करण्यापूर्वी, जेवण करताना की जेवणानंतर? 
7
"ऑपरेशन सिंदूरचा पार्ट २, पार्ट ३ अजून बाकी"; राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला 'मेसेज', मोरक्कोमध्ये काय बोलले?
8
खेळण्यातली बंदूक वापरली अन् ३ बँकांवर डल्ला मारला! पोलिसांनी दरोडेखोराला पकडताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
सणासुदीच्या काळात कार खरेदी करणे झाले स्वस्त! जीएसटीमध्ये मोठी कपात, कर्जही झाले स्वस्त
10
पाकिस्ताननं कर्जाच्या आकडेवारीत असं काय लपवलं की, अमेरिकेनं दिला अल्टिमेटम; भारताशी तर कनेक्शन नाही ना?
11
दणदणीत विजयानंतर गंभीरने पाकिस्तानला डिवचले, खेळाडूंना अशी सूचना देत जखमेवर मीठ चोळले
12
ब्रेकअपचं खोटं अन् हत्येनंतरचा बनाव...कानपूर सुटकेस 'कांड' प्रकरणात ट्विस्ट, २ आरोपींना अटक
13
Accident: पाण्याचा टँकर आणि दुचाकीत भीषण धडक; तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
14
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
15
VIRAL: रिक्षात बसलेल्या विदेशी तरुणाला रिक्षाचालकाने फ्रेंचमध्ये विचारला प्रश्न; त्यानंतर जे झालं ते...
16
'या' ग्राहकांना हेल्थ इन्शुरन्सवर GST माफीचा फायदा नाही; आरोग्य विम्या कंपन्यांनी केलं स्पष्ट
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमात मराठी मालिकाविश्वातील 'या' अभिनेत्याची लागली वर्णी, स्वतः दिली माहिती
18
"पैसे कमावतो, टॅक्स भरतो; चोरी करत नाही...", तगड्या कमाईवरुन अक्षय कुमारचं स्पष्टीकरण
19
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
20
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार

सूक्ष्म सिंचन योजनेसाठी शासनाचे नियोजनच नाही!

By admin | Updated: July 22, 2014 00:41 IST

सूक्ष्म सिंचन योजनेसाठी शासनाने कोणतेही नियोजन केले नसून, राज्यातील शेतकर्‍यांचे जवळपास २00 कोटी रू पयांचे अनुदान थकले

अकोला : शेतीतील पाण्याचा अतिवापर टाळण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या सूक्ष्म सिंचन योजनेसाठी शासनाने कोणतेही नियोजन केले नसून, राज्यातील शेतकर्‍यांचे जवळपास २00 कोटी रू पयांचे अनुदान थकले असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतकर्‍यांसाठी केंद्र शासनाने सुक्ष्म सिंचन योजना सुरू केली असून, २0११-१२ मध्ये या योजनेसाठी ८२.३५ कोटी रू पये मंजूर करण्यात आले होते. त्यापैकी ६७.८३ कोटी रूपयांचे अनुदान केंद्र शासनाने दिले; मात्र उर्वरित १५.६ कोटी रूपये तीन वर्षापासून रखडले आहेत. हे अनुदान आता राष्ट्रीय कृषी विकास योजनतून देण्यात येणार असल्याचे वृत्त असले तरी, अद्याप हा पैसा शेतकर्‍यांच्या हाती पडला नाही. २0१२-१३ पासून या योजनेची विभागणी करण्यात आली. त्यानुसार विदर्भात विदर्भ सिंचन विकास प्रकल्प (व्हीआएआएडीपी) आणि उर्वरित राज्यासाठी राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन चळवळ (एनएमएमआय) या नावाने ही योजना राबविली जात आहे. व्हीआयआयडीपी योजना विदर्भातील गोंदिया, गडचिरोली व भंडारा हे जिल्हे वगळता उर्वरित सर्व जिल्हयांत राबविण्यात आली. या योजनेंतंर्गत २0१२-१३ मध्ये विदर्भाला १0३ कोटी रुपये मिळाले होते. त्यातील ९७ टक्के रक्कम रितसर खर्च झाली. त्यावेळी विदर्भातील सर्वच जिल्हय़ांचा या योजनेत समावेश होता. यामध्ये अकोला जिल्हय़ातील शेतकर्‍यांना १६ कोटी १५ लाख ५९ हजार रुपये अनुदान मिळाले. २0१३-१४ करिता ९४ कोटी ३८ लाख रू पये मंजूर झाले होते. त्यातील ७२ कोटी ११ लाख ७३ हजार रुपये अनुदान शेतकर्‍यांना मिळाले आहे. उर्वरित अनुदान मात्र शासनाकडे थकीत आहेत. उर्वरित राज्यासाठी राबविण्यात येत असलेल्या एनएमएमआय योजनेंतर्गत २0१२ -१३ साठी १९८ कोटी १७ लाख मंजूर झाले होते. त्यापैकी १४७ कोटी ८५ लाख रूपये एवढेच अनुदान प्राप्त झाले आहे. जवळपास ४0 कोटी रूपये अनुदानाची शेतकर्‍यांना प्रतिक्षा आहे.

** गतवर्षीचे २00 कोटी रूपये थकले

२0१३-१४ मध्ये राज्यातील शेतकर्‍यांनी जवळपास २00 कोटीचे ठिबक व तुषार संच खरेदी केले आहे; तथापि शासनाने कोणतेही मार्गदर्शक तत्व अथवा सुचना केल्या नाही. त्यामुळे आधीच ठिबक व तुषार संच खरेदी करणारे शेतकरी आर्थिक अडचनीत सापडले आहेत. या सर्व शेतकर्‍यांना आता अनुदानाची प्रतिक्षा आहे.

** शेतकर्‍यांचे शेकडो अर्ज धूळ खात

२0१४-१५ सालासाठी मार्गदर्शक तत्व व सुचनाही संबधीत विभागाला प्राप्त झाल्या आहेत; पंरतु गतवर्षी कोणत्याही सुचना नसल्याने शेतकरी वर्ग संभ्रमात सापडला आहे. गतवर्षी शेतकर्‍यांनी या योजनेतंर्गत केलेले शेकडो अर्ज धूळ खात पडले आहेत.