शहरं
Join us  
Trending Stories
1
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
4
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
5
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
6
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
7
"आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
8
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
9
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
10
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
11
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
12
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
13
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
14
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
15
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
16
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
17
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
18
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
19
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
20
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग

उत्सवासाठी सरकारची उदासीनता

By admin | Updated: September 15, 2015 02:08 IST

पीओपी गणेशमूर्ती आणि रासायनिक रंगांमुळे होणारे जलस्रोतांचे प्रदूषण रोखण्यासाठी तसेच गणेशमूर्तींच्या उंचीची मर्यादा ठरवण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने काही उत्तम

ठाणे : पीओपी गणेशमूर्ती आणि रासायनिक रंगांमुळे होणारे जलस्रोतांचे प्रदूषण रोखण्यासाठी तसेच गणेशमूर्तींच्या उंचीची मर्यादा ठरवण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने काही उत्तम मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश असलेली (नियमावली) तयार केली आहे. मात्र, दीड वर्ष उलटले तरी राज्य सरकारने त्याला मान्यताच न दिल्याने या वर्षीही तिच्या अंमलबजावणीची शक्यता धूसर आहे. गणेशभक्तांची नाराजी नको म्हणून सरकारने ही सावध भूमिका घेतली असली तरी त्यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता मात्र नाकारता येत नाही. दुसरीकडे, पर्यावरणप्रेमी पीओपी मूर्तींवर सरसकट बंदी घालण्याची मागणी करीत असले तरी प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्यास विरोध केला आहे. मंडळाने पहिल्यांदा २००५ मध्ये गणेशोत्सवाची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. परंतु, ती राज्यातील जलस्रोतांचे प्रदूषण रोखण्यास कुचकामी ठरली. नंतर, २००९ मध्ये त्यात काही प्रमाणात बदल करून पुन्हा दुसऱ्यांदा ती तयार केली. नंतर, हरित लवादाच्या आदेशाने एप्रिल २०१४ मध्ये अभ्यासांती तयार केलेली नवी मार्गदर्शिका खरोखरच क्र ांतिकारी आहे. यातील सूचनांचे स्थानिक स्वराज्य संस्थांनी पालन केल्यास विसर्जनाच्या वेळेस होणाऱ्या जलप्रदूषणावर निश्चितपणे मात करता येणार आहे. पीओपीच्यामूर्ती व रासायनिक रंगांमुळे जलप्रदूषण होते. २०१२ मध्ये गुजरातमधील एस.के. वाघवनकर व इतरांनी मूर्तिकारांविरोधात राष्ट्रीय हरित लवादाकडे दाद मागितली होती. त्यावर, लवादाने पीओपी मूर्तींमुळे जलस्रोतांवर होणारे परिणाम याच्या शास्त्रशुद्ध अभ्यासाची तसेच विसर्जनाबाबतची मार्गदर्शिका सादर करण्याचे आदेश सर्व राज्यांच्या प्रदूषण नियंत्रण मंडळांना २०१३मध्ये दिले. (प्रतिनिधी)काय आहे नवी नियमावली ? कागदाचा लगदा, माती, दगड, लाकूड यापासून बनवलेल्या गणेशमूर्तींना प्रोत्साहन. मंडळाच्या मूर्ती विसर्जनासाठी पाण्याची जशी सुविधा आहे, त्या प्रमाणात उंच असाव्यात. रासायनिक रंग न वापरता खाण्याच्या पदार्थात वापरला जाणारा रंग वापरावा. जिथे जलचर आहेत, जे पाणी पिण्यासाठी वापरात आहे, त्यात विसर्जनास बंदी असावी. - चांदी, सोने, इतर धातूंच्या मूर्तींना प्रोत्साहन. पोलीस, सिंचन विभाग, गणेश मंडळे, स्वयंसेवी संस्था यांच्या समित्या असाव्यात. गणपती ११ फुटांपर्यंत असावा. पेयजल स्रोतात गणेश विसर्जनावर बंदीची शिफारस. पालिकेमार्फत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर दिला जात असून, शाडूच्या मूर्ती वापराव्यात, यासाठी आवाहन केले आहे. तसेच विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती केली आहे. मंडळाच्या २००९च्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी केली जात आहे. परंतु, त्यानंतरची मार्गदर्शक तत्त्वे अद्याप पालिकेला प्राप्त झालेली नाहीत. - मनीषा प्रधान, प्रदूषण नियंत्रण अधिकारी - ठामपा