शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

चार किलो मटकीतून चांगले उत्पादन

By admin | Updated: March 6, 2017 03:19 IST

मटकीच्या बियाणातून सुमारे साडे चारशे किलो उत्पादन काढून शेती कल्पकतेने केल्यास त्यावर कुटुंब सहज चालू शकते याचा प्रत्यय आणून दिला

कर्जत : तालुक्यातील कोषाणे गावातील एका प्रगतशील शेतकऱ्याने अवघ्या साडेचार किलो मटकीच्या बियाणातून सुमारे साडे चारशे किलो उत्पादन काढून शेती कल्पकतेने केल्यास त्यावर कुटुंब सहज चालू शकते याचा प्रत्यय आणून दिला. गतवर्षी याच शेतकऱ्याने दोन किलो मटकीचे बियाणे वापरून तब्बल दोनशे किलो उत्पादन काढले होते.तालुक्यातील कोषाणे गावातील शेतकरी हरिश्चंद्र ठोंबरे आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करून शेती कशी फायदेशीर होईल हे पाहत असतात. शेतीची एकदा मशागत केल्यानंतर त्यावर चार पाच पिके घेणे. कलिंगड, मका, भेंडी, टोमॅटो, पेरू, भोपळा आदींचे विक्र मी उत्पादन घेणे, एसआरटी पद्धतीने भात पीक घेणे शक्य झाले नव्हते, तेव्हा पेर भात करून चांगले भातपीक घेऊन कोणत्याही प्रकारे शेती ओसाड राहू नये यासाठी झटणाऱ्या ठोंबरे यांनी साडे तीन किलो साधे मटकीचे आणि एक किलो चांगल्या प्रकारचे मटकीचे बियाणे पेरून सुमारे चारशे किलो उत्पन्न काढले आहे. ठोंबरे आपल्या कुटुंबीयांच्या सहकार्याने दुग्ध व्यवसाय गेल्या ३०-३५ वर्षे यशस्वीपणे करीत आहेत. या पिकासाठी त्यांना केवळ १२०० रु पये खर्च आला असून, एक ते सव्वा एक एकर जमिनीवर त्यांनी हे पीक काढले आहे. विशेष म्हणजे, भातपीक काढल्यानंतर कोणत्याही प्रकारची उखळणी अगर मशागत न करता तसेच मटकीचे बियाणे पेरले आणि चांगले उत्पादन काढले. (वार्ताहर)>भात पीक घेणे हा आतबट्ट्याचा व्यवसाय असा समज आहे; परंतु थोडीशी कल्पकता वापरल्यास भाताचे पीकही चांगल्या प्रकारे खर्चाची बचत करून घेता येते. उन्हाळ्यात कडधान्याचे पीक घेतल्यास शेती फायदेशीर होऊ शकते. - हरिश्चंद्र ठोंबरे, प्रगतशील शेतकरी ठोंबरे आपल्या कुटुंबीयांच्या सहकार्याने दुग्ध व्यवसाय गेल्या ३०-३५ वर्षे यशस्वीपणे करीत आहेत. त्याचबरोबर शेती करीत असून मटकी पिकासाठी त्यांना केवळ १२०० रु पये खर्च आला असून, एक ते सव्वा एकर जमिनीवर त्यांनी हे पीक काढले आहे. त्यामुळे यंदा त्यांना या कडधान्य पीकामुळे फायदा झाला आहे.