शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
3
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
4
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
5
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
6
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
7
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
8
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
9
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
10
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
11
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
12
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
13
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
14
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
15
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
16
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
17
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
18
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
19
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
20
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला

यंदा चांगला मान्सून !

By admin | Updated: February 10, 2016 02:30 IST

दोन वर्षांपासून सातत्याने पडलेल्या दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या बळीराजासाठी खुशखबर आहे. यंदा नैऋत्य मोसमी वारे चांगला पाऊस घेऊन येणार आहेत. मोसमी वारे तयार होण्यासाठी

पुणे : दोन वर्षांपासून सातत्याने पडलेल्या दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या बळीराजासाठी खुशखबर आहे. यंदा नैऋत्य मोसमी वारे चांगला पाऊस घेऊन येणार आहेत. मोसमी वारे तयार होण्यासाठी आतापर्यंतची हवामानाची स्थिती आदर्श आहे. ती मार्च, एप्रिल आणि मे महिन्यातही कायम राहिल्यास यंदा महाराष्ट्रासह देशात वेळेच्या आधी मान्सून दाखल होईल आणि विशेष म्हणजे तो समाधानकारक असेल, असा अंदाज ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.डॉ. साबळे म्हणाले, २०१४ आणि २०१५ या वर्षात आॅगस्ट ते डिसेंबर काळात ४ ते ५ चक्रीवादळे निर्माण झाली होती. त्यानंतर गारपीट झाली होती. या सर्व गोष्टी मान्सूनला मारक होत्या. त्याचा मोसमी वाऱ्यांच्या निर्मितीवर आणि प्रवासावर विपरित परिणाम झाल्याने पावसाचे प्रमाण अल्प राहिले. यंदा आॅगस्ट ते डिसेंबरच नव्हे तर जानेवारी महिन्यात सुद्धा एकही चक्र ीवादळ किंवा गारपीट झालेली नाही. उपरोक्त काळातील हवामान हे आदर्श असून ते मान्सूनचे वारे निर्माण होण्यासाठी उपयुक्त आहे.२००६ मध्ये अशीच स्थिती होती, तेव्हा महाराष्ट्रात तब्बल १०-१२ दिवस अगोदरच मान्सून दाखल झाला होता आणि पाऊसही समाधानकारक पडला होता. २०१२, २०१३ आणि २०१५ मध्ये आॅगस्ट ते डिसेंबर महिन्यात चक्रीवादळ, गारपीट झाली होती. त्याचा मान्सूनवर परिणाम होऊन जून आणि जुलै महिन्यात पाऊसच झाला नव्हता. त्यामुळे खरिपाचे पीक हातचे गेले. यंदा स्थिती चांगली असल्याने जून व जुलै महिन्यात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे खरिपाची पिके बहरतील, अशी माहिती साबळे यांनी दिली. (प्रतिनिधी)उन्हाळा १५ दिवस अगोदरचयंदा उन्हाळा लवकर सुरू होण्यासाठी अनुकुल स्थिती आहे. पाच-सहा दिवसांपासून राज्यातील बहुतांश शहरांच्या कमाल तापमानात मोठी वाढ होताना दिसत आहे. ही स्थिती कायम राहत असल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पुढील काळात तापमानात वाढ होऊ शकते. त्यामुळे यंदा उन्हाळा ८ ते १५ दिवस अगोदरच सुरू होण्याची शक्यता आहे, असा अंदाज साबळे यांनी व्यक्त केला.