शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

विरोधात राहूनही चांगले दिवस येतील

By admin | Updated: December 16, 2014 00:12 IST

जयंत पाटील : राजकारणात पर्याय शोधणे हा अंतिम उपाय नव्हे

अशोक पाटील-इस्लामपूर -पंधरा वर्षांहून अधिक काळ मंत्रीपद भोगले आहे. मंत्रिपदावर असले की सर्वसामान्य जनता दुरावली जाते. त्यापेक्षा विरोधी बाकावर बसल्यानंतर सर्वसामान्यांच्या भावना कळतात. त्यामुळे संपर्क वाढतो. विरोधात राहिल्यानंतर काही दिवसातच चांगले दिवस येतील. त्यामुळे पर्याय शोधणे हा उपाय नव्हे, असे स्पष्ट मत माजी मंत्री, आ. जयंत पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.जयंत पाटील यांनी आज मतदारसंघातील विविध विवाह सोहळ्यांना हजेरी लावली. वडगाव येथील एका कार्यक्रमात त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. ते म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून आपण कोणत्याही विषयावर मत व्यक्त केलेले नाही. त्यामुळे मी दुसरा पर्याय शोधत असल्याची चर्चा मतदारसंघात सुरू असल्याचे वृत्त होते. यामध्ये तथ्य नाही. याउलट गेली १५ वर्षे आपण सत्ता भोगली आहे. सत्तेत राहून प्रामाणिक आणि करेक्ट काम करीत राष्ट्रवादी पक्ष भक्कम केला आहे. त्यामुळेच इस्लामपूर मतदारसंघातील जनतेने आपल्यावर विश्वास टाकला आहे. राज्यात राष्ट्रवादीचे पानिपत झाले असले तरी, राष्ट्रवादीत राहून यापुढे सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न आपण करणार आहे.भूतकाळातील राजकारणाचा अभ्यास केला असता, विरोधी बाकावर बसून प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना चांगले दिवस येतात. त्यामुळेच आपण विरोधी बाकावर बसूनच जनतेची सेवा करणार आहोत. जिल्ह्यात अवकाळी पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईसाठी विधानसभेत आवाज उठवू. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही गांभीर्याने विचार करण्यास शासनाला भाग पाडू, असेही त्यांनी स्पष्ट केले.आ. पाटील बोलत असताना त्यांच्याभोवती जनमत नसलेल्या कार्यकर्त्यांचा घोळका होता. त्यातील काही कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करुन, जयंत पाटील यांच्यापुढे मोठेपणा मिरविण्याचा प्रयत्न केला. यावर त्याठिकाणीच उपस्थित असलेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.