शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

गोनीदा जन्मशताब्दीवर्ष सांगता समारंभ

By admin | Updated: July 11, 2016 15:49 IST

ख्यातनाम साहित्यिक, कादंबरीकर, दुर्गप्रेमी साहित्यिक गोपाळ नीलकंठ दांडेकर यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचा शानदार सांगता समारंभ पुण्यात पार पडला.

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ११ - दि. ८ जुलै २०१५ ते दि. ८ जुलै २०१६ हे संपूर्ण वर्ष ख्यातनाम साहित्यिक, कादंबरीकर, दुर्गप्रेमी साहित्यिक गोपाळ नीलकंठ दांडेकर यांचे जन्मशताब्दीवर्ष म्हणून साजर झालं. नुकताच या जन्मशताब्दी सोहळ्याचा शानदार सांगता समारंभ पुण्यात पार पडला. 
 या संपूर्ण वर्षभरात स्वर्गवासी अप्पांच्या साहित्याशी निगडीत असे अनेक कार्यक्रम देश-विदेशात पार पडले. व्याख्याने, त्यांच्या कादंब-यांची अभिवाचने, प्रदर्शने, आकाशवाणीवरचा एक विशेष कार्यक्रम , अप्पांच्या साहित्यातील व्यक्तिरेखांचे सादरीकरण, सांगितीक चर्चासत्र अशा अनेक कार्यक्रमांनी हे वर्ष गजबजून गेलं. 
नुकतंच पुण्यात या जन्मशताब्दी वर्षाचा देखणा सांगता-समारंभ पार पडला. देव कुटुंबियांच्या वतीने दिला जाणारा साहित्याशी निगडीत मृण्मयी पुरस्कार या समारंभात विजया मेहता यांच्या हस्ते सिद्धहस्त नाट्यलेखक महेश एलकुंचवार यांना देण्यात आला. तसेच सामाजिक कार्याशी निगडीत असलेला नीरा-गोपाल पुरस्कार नलिनी मिश्रा यांना देण्यात आला. यावर्षीपासून ताज्या दमाच्या लेखकांना प्रोत्साहनपर गोनीदा पुरस्कार या नवोदित लेखकाला देण्यात आला. 
जन्मशताब्दीवर्षा  निमित्ताने एक वेगळा उपक्रम दिनांक ४ मे रोजी करण्यात आला. स्वर्गवासी अप्पांनी नर्मदा परिक्रमा केलेली असल्याने नर्मदेवी संबधित 'नर्मदे हर हर' हा एक कार्यक्रम पुण्यात पार पडला. स्वर्गवासी अप्पांचे साहित्या नव्या पिढीला उपलब्ध व्हावे म्हणून मृण्मयी प्रकाशनाने अप्पांची स्वरगाथा , दुर्गभ्रमण गाथा, बिंदूंची कथा, मोगरा फुलला, तुका आकाशाएवढा अशा अनेक पुस्तकांचे पुनर्प्रकाशन करण्यात आले. एकूणच या वर्षात अप्पांच्या साहित्याचा जागर त्यांच्या स्वकीयांनी, दुर्गप्रेमींनी व रसिक वाचकांनी मांडला. 
परवाच्या सांगता समारंभात महेश एलकुंचवारांसारख्या सिद्धहस्त लेखकाने स्व.अप्पांच्या साहित्याबाबत बोलताना उद्गार काढले ते तर  नव्या पिढीच्या नव्या लेखकांना मार्गदर्शन करणारे होतेच पण त्या जोडीला त्या लेखकांच्या डोळ्यात अंजन घालणारेही होते. ते म्हणाले, आमची पिढी अप्पांच्या लेखनामुळे लखनसमृद्ध झाली. इतकी मिताक्षरी पण अर्थगर्भ भाषा मी फार थोड्या ठिकाणी पाहिली. त्यांचं अनुभवाला जाऊन थेट भिडणं नव्या लेखकांना झेपणारं नव्हतं. ते अनुभव पेलायची ताकद नसल्याने ते लेखनच नाकारायची, भावनिक म्हणून हेटाळणी करण्याची सुरूवात झाली. आणि या हेटाळणीला स्पिरीट ऑफ इर्ररिलेटिव्हिटी (spirit of irrelativity) म्हणून आम्हीच मुलामा देऊन त्याचे समर्थन केले. खरतर जुन्या परंपरा व आधुनिक विचारा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. परंपरेत घट्ट पाय रोवल्याशिवाय आधुनिक विचार आत्मसात करताच येत नाहीत. 
स्व. अप्पांच्या ' अजून नाही जागे गोकूळ' या कादंबरीची उदाहरणे देऊन महेश एलकुंचवार म्हणाले, ' असं एखादं नाकारलेलं, झिकारलेलं, त्याज्य, कुरूप व्यक्तिमत्व घेऊन त्या तुलनेच्या व्यक्तिमत्वावर आष्टसात्विक भाव निर्माण करणारे लिखाण फक्त दांडेकरच करू शकतात. त्यांची ती आर्त पुरवणारी लेखणी त्यांच्यातील परंपरावादी लेखकाचे अनुभवसिद्ध सामर्थ्य दाखवते. काळाच्या ओघात टिकून राहणारी जी लेखनकला आहे ती दांडेकरांनी स्वत:च्या प्रतिभेच्या जोरावर आणि अनुभवसमृद्धतेच्या आधारावर निर्माण केली.'
थोर दिग्दर्शक आणि कलांवत विजया मेहता म्हणाल्या  की , ' अप्पांचे माणूसपण हे सहज, निरागस आणि कृतज्ञता जपणारं, धीर देणारं होते.  नाटकाचे स्टेज हे कलावंत, लेखक आणि दिग्दर्शकाचा आत्मा असतो. या आत्मरूप कलाकृतीला थेट भिडण्याचे कसब स्व. अप्पांनी मला शिकवलं. नाटक हा एक आकृतीबंध असतो. तो चैतन्यमयी, जीवंत करण्यासाठी कलाकाराला जी अनुभवसमृद्ध उर्जा लागते ती ती उर्जा सहजतेने उबलब्ध करून द्यायचं काम, अप्पांनी मोठ्या ताकदीने केलं.'
या दोघांनीही मुक्तकंठाने स्व. अप्पांच्या साहित्याचा, त्यांच्यातील कलंदरपणाचा, अनुभवांचा, माणुसकीचा गौरव केला.