शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ ‘मेडिकल’च्या ५० जागांवर गंडांतर

By admin | Updated: January 12, 2015 00:59 IST

येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भारतीय वैद्यकीय परिषदेच्या (एमसीआय) निकषानुसार आवश्यक सुविधांचा अभाव आहे. सुविधांच्या पूर्ततेसाठी राज्यशासनाने

उणिवा कायमच : एमसीआय पथकाकडून पाहणी यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भारतीय वैद्यकीय परिषदेच्या (एमसीआय) निकषानुसार आवश्यक सुविधांचा अभाव आहे. सुविधांच्या पूर्ततेसाठी राज्यशासनाने वर्षभरापूर्वी नागपूर उच्च न्यायालयात एक हमी पत्र दिले होते. त्यानंतरही उणिवा कायम आहेत. एमसीआयने आता याच मुद्यावर बोट ठेवल्यास येथील ५० जागांना कात्री लागण्याची भीती आहे. ग्रामीण भागात आरोग्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एमबीबीएस अभ्यासक्रमाची विद्यार्थी संख्या वाढविण्यचा निर्णय घेण्यात आला. सलग दहा वर्ष झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांनी १०० विद्यार्थी क्षमतेचा अभ्यासक्रम यशस्वीरित्या चालविला तेथे जागा वाढवून देण्यात आल्या आहे. याचिकेची सुनावणी करताता, एमसीआयने खासगी वैद्यकीय महाविद्यालयाचे निकष लावू नयेत. उणिवांची पुूर्तता करण्यासाठी राज्य शासनाला वेळ द्यावा, असे निर्देश न्यायालयाने दिले. त्यावेळी राज्य शासनाने न्यायालयात हमीपत्र सादर केले. त्यात जवळपास दीड वर्षाचा कालावधी लोटला. यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अडचणी तशाच कायम आहेत. यापूर्वी एमसीआयाच्या पथकाने निदर्शनास आणून दिलेल्या उणिवाच पुन्हा त्यांनी दोन दिवसापूर्वी केलेल्या पाहणीत अधोरेखित केली आहे. यवतमळच्या मेडिकलमध्ये लेक्चर हॉल, डेमोट्रेशन हॉल, विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा, शिक्षकांची रिक्त पदे याच उणिवा पुन्हा दाखविण्यात येत आहे. रुग्णालयाच्या प्रशासकीय इमारतीचे काम पूर्ण झाले असले तरी केवळ फर्निचरसाठी ३ कोटींचा निधी नसल्याने त्या इमारतीचे हस्तांतरण करण्यात आले नाही. प्रशासकीय इमारतीच्या कामाचे भिजत घोंगडे अनेक दिवसापासून कायम आहे. त्यामुळेच वारंवार एमसीआयाची मान्यता मिळविताना अडचणी उद्भवतात त्यानंतरही इमारतीचे काम रखडलेले आहे. (प्रतिनिधी)जनहित याचिकेवर उच्च न्यायालयाचा दिलासाअमरावती विभागात अकोला आणि यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला या वाढीव जागा मिळाल्यात. २०१२-१३ या शैक्षणिक वर्षात या अतिरिक्त जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर पुन्हा या जागांना मंजुरी देण्यासाठी एमसीआयच्या चमूने दोन्ही महाविद्यालयातील सोयीसुविधा, शिक्षकांची संख्या, रुग्णसंख्या याचा आढावा घेतला. यात अनेक त्रुट्या आढळून आल्याने वाढीव जागांची मंजुरी रद्द करण्याचा निर्णय एमसीआयने घेतला. या निर्णया विरोधात २०१३-१४ मध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांनी जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निकाल देत राज्य शासनाला दिलासा दिला.