शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

‘गोल्ड’ घेणाऱ्यांच्या घरी होवू शकेल बनावट ‘चोरी’

By admin | Updated: November 14, 2016 14:58 IST

सोने खरेदी करून भविष्यात आयकर अधिकाऱ्यांचा छापा पडण्याआधीच चोरी झाल्याची तक्रार पोलिसांत देऊन आपले सोने सुरक्षित करण्याचा पर्याय राज्यभरातील अनेक धनिकांनी शोधल्याची वार्ता बाहेर येत आहे.

धनंजय कपाले/ ऑनलाइन लोकमत 
वाशिम, दि. 14 -  मथळा वाचून धक्का बसला ना ! होय, अशा बनावट चोऱ्या होण्याची दाट शक्यता आहे. हजार-पाचशेच्या नोटा बंद झाल्यामुळे ज्यांच्याकडे काळा पैसा आहे, ते सुरक्षित पर्याय म्हणून सोने खरेदी करीत आहेत. सोने खरेदी करून भविष्यात आयकर अधिकाऱ्यांचा छापा पडण्याआधीच चोरी झाल्याची तक्रार पोलिसांत देऊन आपले सोने सुरक्षित करण्याचा पर्याय राज्यभरातील अनेक धनिकांनी शोधल्याची वार्ता बाहेर येत आहे. 
हजार-पाचशेच्या नोटांवरील बंदी आल्यावर काळा पैसा जमा करणाºया धनिकांची चांगलीच पंचाईत झाली. अनेक धनिकांनी काळ्या पैशाची ‘वाट’ शोधण्यासाठी  आपल्या चार्टड अकाउंटटच्या भेटी घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. तज्ञांच्या सल्ला घेतल्यानंतर सराफा बाजारात अनेक धनिकांच्या उड्या पडल्यामुळे सोन्याचे दर तीन वर्षांच्या उच्चांकावर गेले. राजधानी दिल्लीत सोन्याचा भाव तब्बल ९०० रुपयांनी वाढून ३१, ७५० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. चांदीही १,१५० रुपयांनी वाढून ४५ हजार रुपये किलो झाली. नोटाबंदीचा निर्णय झाल्यामुळे ‘ब्लॅक मनी’ ला ‘व्हाईट’ करण्यासाठी धनाढ्य लोकांनी ४५ ते ४८ लाख रुपए किलोप्रमाणे सोने विकत घेतले.  
काही सराफा व्यापाऱ्यांनी बिना पावतीचे सोने विकून स्वत:ची ‘चांदी’ करून घेतली. यामध्ये व्यापाऱ्यांनीही दोन लाखांच्यावर  खरेदी करण्यासाठी पॅनकार्ड आवश्यक असल्याने धनिकांना दीड - दीड लाखाच्या तुकड्यात  बनावट नावाने कोट्यावधीचे सोने विकून काळ्या पैशावाल्यांना मार्ग शोधून दिला. तर काही धनिकांनी ठोक स्वरूपात सोने घेऊन आपला पैसा सराफा व्यापाऱ्यांना देऊन सुटकेचा निश्वास टाकला. 
(नोटबंदीबद्दलच्या 'या' अफवांवर तुम्हीही ठेवलात का विश्वास?)
या धनाढ्य लोकांना त्यांच्या ‘विशिष्ट सल्लागारांनी’ सोने खरेदी करून भविष्यात आपल्या घरी चोरी झाल्याची तक्रार दाखल करण्याचा ‘अनमोल’ सल्ला दिला. डिसेंबर महिण्यानंतर राज्यातील कुठल्याही पोलीस स्टेशनला मोठी चोरी झाल्याची तक्रार आल्यास त्यात नवल वाटू नये. आयकर अधिकाऱ्यांचा छापा पडण्याआधीच राज्यभरात धनिकांच्या घरी चोरीचे सत्र प्रारंभ होण्याची दाट शक्यता आहे. 
"काळा पैसा व्हाईट करण्यासाठी राज्यभरातील अनेक धनिकांनी मोठ्या स्वरूपात सोने घेतल्याची बाब मलाही माहिती पडली. अनेक धनिकांनी दीड- दोन लाखाच्या तुकड्यात सोने घेतले तर काही धनिकांनी ठोक स्वरूपात साने घेतले हे खरे आहे. अशा प्रकारचे धनिक भविष्यात सोने चोरीला गेल्याची तक्रार देऊ शकतात, असे मलाही वाटते," असे वाशिम येथील चार्टर्ड अकाऊंटन्ट आनंदकुमार डोडिया यांनी सांगितले.