शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

गोवा महाराष्ट्रात विलीन न झाल्याने वाचलो : काँग्रेस

By admin | Updated: August 17, 2016 13:30 IST

गोवा महाराष्ट्रात विलीन झाला असता तर आमचे गोवा राज्य महाराष्ट्राचा एक छोटा जिल्हा बनून राहिले असते. आम्ही महाराष्ट्रात गेलो नाही, म्हणून वाचलो असे मत माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरोंनी व्यक्त केले.

ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. १७ - गोवा मुक्तीनंतर काही लोकांनी व काही राजकीय पक्षांनी गोव्याला महाराष्ट्रात विलिन करण्याचा घाट घातला होता. गोवा महाराष्ट्रात विलीन झाला असता तर आमचे गोवा राज्य महाराष्ट्राचा एक छोटा जिल्हा बनून राहिले असते. आम्ही महाराष्ट्रात गेलो नाही, म्हणजेच विलिनीकरण झाले नाही म्हणून वाचलो, असे मत गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे विद्यमान अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांनी बुधवारी येथे व्यक्त केले.
गोवा विधानसभेत गेल्या आठवडय़ात मराठीलाही गोव्यात राजभाषेचे स्थान द्यावे, अशी मागणी करणारा ठराव संमत झाला आहे. लोकांना विश्वासात घेऊन व लोकांशी चर्चा करून याविषयी निर्णय घ्यावा, अशी भाजप आमदाराने सूचविलेली दुरुस्ती या ठरावात समाविष्ट करण्यात आली आहे. या पाश्र्वभूमीवर बुधवारी येथे काँग्रेस हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना फालेरो म्हणाले, की गोव्याने स्वतंत्र अस्तित्व राखले आहे. गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण झाले नाही, कारण कोंकणी हीच गोव्याची भाषा आहे. आम्ही मराठी ही गोव्याची भाषा असे म्हटले  असते तर मुक्तीनंतर लगेच आम्ही महाराष्ट्राचा भाग बनलो असतो व छोटासा एक जिल्हा बनून राहिलो असतो.
फालेरो म्हणाले, की सरकारने किंवा अन्य कुणीच पुन्हा गोव्यात भाषावादाचे भूत आणू नये. भाषेच्या प्रश्नावर समाजात ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला जाऊ नये. मी गोवा विधानसभेत प्रथम प्रवेश केला होता तेव्हा केंद्रात काँग्रेसचे सरकार अधिकारावर होते व स्व. इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. त्यावेळी आम्ही म्हणजे काँग्रेस पक्षाने गोव्याला घटक राज्याचा दर्जा द्या, अशी मागणी श्रीमती इंदिरा गांधी यांच्याकडे केली होती. त्यावेळी तुम्ही अगोदर तुमची भाषा कोणती ते ठरवा, मग आम्ही तुम्हाला घटक राज्य देतो, असे इंदिरा गांधी व नंतर स्व. राजीव गांधी यांनीही सांगितले होते. त्यानंतर आम्ही कोंकणी हीच गोव्याची एकमेव राजभाषा व कोंकणी हीच अस्मिता असल्याचे मान्य केले. गोवा राजभाषा कायद्यात कोंकणीला राजभाषेचे स्थान व मराठीला सहभाषेचे स्थान आहे. कोंकणीच्या आधारे आम्हाला घटक राज्य मिळाले. कोंकणीच्या आधारे आम्हाला सरकारी सेवेत गोमंतकीयांनाच नोक:या मिळवून देणो शक्य झाले.
फालेरो म्हणाले, की गोवा राजभाषा कायद्यात मराठीला अभिमानाची जागा मिळालेली आहे. कारण मराठीचे गोव्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक साहित्यिक क्षेत्रत योगदान खूप मोठे आहे. कोंकणी प्रारंभीच्या काळात विकसित होऊ शकली नाही, त्यामागे ऐतिहासिक कारणो आहेत. गोवा पोतरुगीजांच्या राजवटीत राहिल्याने कोंकणीचा विकास झाला नव्हता. कोंकणी राजभाषा व्हावी म्हणून गोव्यात हिंसक आंदोलन झाले होते व काहीजणांना प्राणही द्यावा लागला होता. आता पुन्हा कुणीच भाषावाद उकरून काढू नये. कारण गोव्याला पुन्हा असे आंदोलन परवडणारे नाही. आम्ही मराठीच्या विरोधात नाही पण कोंकणी हीच एकमेव राजभाषा असावी ही आमची भूमिका आहे.