शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

मुंबईच्या गोपिका पंजाबला जाणार

By admin | Updated: August 29, 2015 01:45 IST

मुंबईतील पल्लवी फाउंडेशनचे गोरखनाथ महिला दहीहंडी मंडळातील १८० महिलांचे पथक दहीहंडी फोडण्यासाठी पंजाबला रवाना होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कोणत्याही

मुंबई : मुंबईतील पल्लवी फाउंडेशनचे गोरखनाथ महिला दहीहंडी मंडळातील १८० महिलांचे पथक दहीहंडी फोडण्यासाठी पंजाबला रवाना होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कोणत्याही प्रकारचे मानधन नसताना केवळ महाराष्ट्राची संस्कृती देशभर पोहोचवण्यासाठी या महिला पंजाबला जात आहेत, असे मंडळाच्या अध्यक्षा शलाका कोरगांवकर यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.कोरगांवकर म्हणाल्या, महाराष्ट्र शीख असोसिएशनने पंजाबमधील अमृतसरमध्ये दहीहंडीचे आयोजन केले आहे. महिलांचा येण्याजाण्याचा खर्च मंडळाने केला असून, आयोजकांनी तेथील सर्व व्यवस्था केली आहे. याआधी हे पथक द्वारका, डाकोर, उडप्पी, मथुरा, कर्नाटक (निप्पाणी), जयपूर, उजैन, वाराणसीला जाऊन आले आहे. अलीकडेच घुमान येथे पार पडलेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर महिला पथकाला दहीहंडी फोडण्याचे निमंत्रण मिळाल्याने महिलाही जाण्यासाठी उत्सुक आहेत. २ सप्टेंबरला ट्रेनने पंजाबला जाणार असून, ५ सप्टेंबरच्या मध्यरात्री गोकुळाष्टमीला महिला एक हंडी आणि दुसऱ्या रात्री दोन हंड्या फोडणार असल्याचे कोरगांवकर यांनी सांगितले.महाराष्ट्र शीख असोसिएशनचे अध्यक्ष दलजित सिंग बल यांनी सांगितले की, मुंबईप्रमाणे पंजाबमध्ये दहीहंडी उत्सव साजरा केला जात नाही. साहित्य संमेलनाच्या माध्यमातून महाराष्ट्रीय आणि पंजाबी लोकांमध्ये आपुलकीची भावना अधिक बळकट झाली आहे. त्यात अधिक भर टाकण्यासाठी हा उत्सव पंजाबमध्ये साजरा करण्याचा प्रयत्न आहे. महिला पथक दहीहंडी उत्सवासाठी पंजाबमध्ये येणार असल्याचे कळताच दिल्ली गुरूद्वारा मॅनेजमेंट कमिटीनेही पंजाबमधील ८० खोल्यांची इमारत मोफत स्वरूपात उपलब्ध करून दिली आहे. महिलांच्या जेवणाचा खर्चही कमिटीने करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय तळमळतेने गोकुळाष्टमीची वाट पाहणाऱ्यांनी उत्सवाठिकाणीच आठवडाभर गीता प्रवचनाचा कार्यक्रम ठेवला आहे.मंडळांनी स्वत:वर निर्बंध घालावेसार्वजनिक गोविंदा पथकांनी स्वत:वर निर्बंध घातल्यास न्यायालयाला निर्बंध घालण्याची गरज भासणार नाही, असेही शलाका कोरगांवकर म्हणाल्या. उत्सवाला अर्थकारणाचा संदर्भ लागल्याने उत्सवाचे रूप बदलले आहे. न्यायालयाने उत्सव साजरू करू नये, असे कुठेही म्हटलेले नाही. केवळ उत्सवातील अर्थकारण दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे चुकीचा अर्थ न काढता मंडळानी उत्सव साजरा करण्याचे मत त्यांनी व्यक्त केले.