शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या गोपिका पंजाबला जाणार

By admin | Updated: August 29, 2015 01:45 IST

मुंबईतील पल्लवी फाउंडेशनचे गोरखनाथ महिला दहीहंडी मंडळातील १८० महिलांचे पथक दहीहंडी फोडण्यासाठी पंजाबला रवाना होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कोणत्याही

मुंबई : मुंबईतील पल्लवी फाउंडेशनचे गोरखनाथ महिला दहीहंडी मंडळातील १८० महिलांचे पथक दहीहंडी फोडण्यासाठी पंजाबला रवाना होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कोणत्याही प्रकारचे मानधन नसताना केवळ महाराष्ट्राची संस्कृती देशभर पोहोचवण्यासाठी या महिला पंजाबला जात आहेत, असे मंडळाच्या अध्यक्षा शलाका कोरगांवकर यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.कोरगांवकर म्हणाल्या, महाराष्ट्र शीख असोसिएशनने पंजाबमधील अमृतसरमध्ये दहीहंडीचे आयोजन केले आहे. महिलांचा येण्याजाण्याचा खर्च मंडळाने केला असून, आयोजकांनी तेथील सर्व व्यवस्था केली आहे. याआधी हे पथक द्वारका, डाकोर, उडप्पी, मथुरा, कर्नाटक (निप्पाणी), जयपूर, उजैन, वाराणसीला जाऊन आले आहे. अलीकडेच घुमान येथे पार पडलेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर महिला पथकाला दहीहंडी फोडण्याचे निमंत्रण मिळाल्याने महिलाही जाण्यासाठी उत्सुक आहेत. २ सप्टेंबरला ट्रेनने पंजाबला जाणार असून, ५ सप्टेंबरच्या मध्यरात्री गोकुळाष्टमीला महिला एक हंडी आणि दुसऱ्या रात्री दोन हंड्या फोडणार असल्याचे कोरगांवकर यांनी सांगितले.महाराष्ट्र शीख असोसिएशनचे अध्यक्ष दलजित सिंग बल यांनी सांगितले की, मुंबईप्रमाणे पंजाबमध्ये दहीहंडी उत्सव साजरा केला जात नाही. साहित्य संमेलनाच्या माध्यमातून महाराष्ट्रीय आणि पंजाबी लोकांमध्ये आपुलकीची भावना अधिक बळकट झाली आहे. त्यात अधिक भर टाकण्यासाठी हा उत्सव पंजाबमध्ये साजरा करण्याचा प्रयत्न आहे. महिला पथक दहीहंडी उत्सवासाठी पंजाबमध्ये येणार असल्याचे कळताच दिल्ली गुरूद्वारा मॅनेजमेंट कमिटीनेही पंजाबमधील ८० खोल्यांची इमारत मोफत स्वरूपात उपलब्ध करून दिली आहे. महिलांच्या जेवणाचा खर्चही कमिटीने करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय तळमळतेने गोकुळाष्टमीची वाट पाहणाऱ्यांनी उत्सवाठिकाणीच आठवडाभर गीता प्रवचनाचा कार्यक्रम ठेवला आहे.मंडळांनी स्वत:वर निर्बंध घालावेसार्वजनिक गोविंदा पथकांनी स्वत:वर निर्बंध घातल्यास न्यायालयाला निर्बंध घालण्याची गरज भासणार नाही, असेही शलाका कोरगांवकर म्हणाल्या. उत्सवाला अर्थकारणाचा संदर्भ लागल्याने उत्सवाचे रूप बदलले आहे. न्यायालयाने उत्सव साजरू करू नये, असे कुठेही म्हटलेले नाही. केवळ उत्सवातील अर्थकारण दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे चुकीचा अर्थ न काढता मंडळानी उत्सव साजरा करण्याचे मत त्यांनी व्यक्त केले.