शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या गोपिका पंजाबला जाणार

By admin | Updated: August 29, 2015 01:45 IST

मुंबईतील पल्लवी फाउंडेशनचे गोरखनाथ महिला दहीहंडी मंडळातील १८० महिलांचे पथक दहीहंडी फोडण्यासाठी पंजाबला रवाना होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कोणत्याही

मुंबई : मुंबईतील पल्लवी फाउंडेशनचे गोरखनाथ महिला दहीहंडी मंडळातील १८० महिलांचे पथक दहीहंडी फोडण्यासाठी पंजाबला रवाना होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कोणत्याही प्रकारचे मानधन नसताना केवळ महाराष्ट्राची संस्कृती देशभर पोहोचवण्यासाठी या महिला पंजाबला जात आहेत, असे मंडळाच्या अध्यक्षा शलाका कोरगांवकर यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.कोरगांवकर म्हणाल्या, महाराष्ट्र शीख असोसिएशनने पंजाबमधील अमृतसरमध्ये दहीहंडीचे आयोजन केले आहे. महिलांचा येण्याजाण्याचा खर्च मंडळाने केला असून, आयोजकांनी तेथील सर्व व्यवस्था केली आहे. याआधी हे पथक द्वारका, डाकोर, उडप्पी, मथुरा, कर्नाटक (निप्पाणी), जयपूर, उजैन, वाराणसीला जाऊन आले आहे. अलीकडेच घुमान येथे पार पडलेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर महिला पथकाला दहीहंडी फोडण्याचे निमंत्रण मिळाल्याने महिलाही जाण्यासाठी उत्सुक आहेत. २ सप्टेंबरला ट्रेनने पंजाबला जाणार असून, ५ सप्टेंबरच्या मध्यरात्री गोकुळाष्टमीला महिला एक हंडी आणि दुसऱ्या रात्री दोन हंड्या फोडणार असल्याचे कोरगांवकर यांनी सांगितले.महाराष्ट्र शीख असोसिएशनचे अध्यक्ष दलजित सिंग बल यांनी सांगितले की, मुंबईप्रमाणे पंजाबमध्ये दहीहंडी उत्सव साजरा केला जात नाही. साहित्य संमेलनाच्या माध्यमातून महाराष्ट्रीय आणि पंजाबी लोकांमध्ये आपुलकीची भावना अधिक बळकट झाली आहे. त्यात अधिक भर टाकण्यासाठी हा उत्सव पंजाबमध्ये साजरा करण्याचा प्रयत्न आहे. महिला पथक दहीहंडी उत्सवासाठी पंजाबमध्ये येणार असल्याचे कळताच दिल्ली गुरूद्वारा मॅनेजमेंट कमिटीनेही पंजाबमधील ८० खोल्यांची इमारत मोफत स्वरूपात उपलब्ध करून दिली आहे. महिलांच्या जेवणाचा खर्चही कमिटीने करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय तळमळतेने गोकुळाष्टमीची वाट पाहणाऱ्यांनी उत्सवाठिकाणीच आठवडाभर गीता प्रवचनाचा कार्यक्रम ठेवला आहे.मंडळांनी स्वत:वर निर्बंध घालावेसार्वजनिक गोविंदा पथकांनी स्वत:वर निर्बंध घातल्यास न्यायालयाला निर्बंध घालण्याची गरज भासणार नाही, असेही शलाका कोरगांवकर म्हणाल्या. उत्सवाला अर्थकारणाचा संदर्भ लागल्याने उत्सवाचे रूप बदलले आहे. न्यायालयाने उत्सव साजरू करू नये, असे कुठेही म्हटलेले नाही. केवळ उत्सवातील अर्थकारण दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे चुकीचा अर्थ न काढता मंडळानी उत्सव साजरा करण्याचे मत त्यांनी व्यक्त केले.