शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

-तर १५ वाघ जिवानिशी जाणार

By admin | Updated: August 27, 2014 00:54 IST

महाराष्ट्रामध्ये सुरु असलेला वनरक्षक, वनपाल व वनमजुरांच्या बेमुदत संप लागलीच न मिटल्यास महाराष्ट्रातील १० ते १५ वाघांची शिकार केली जाण्याची दाट शक्यता वर्तविणारा अहवाल 'वाईल्ड लाईफ क्राईम

वन कर्मचाऱ्यांचा संप : 'वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल बोर्डा'चा इशारावैभव बाबरेकर - अमरावतीमहाराष्ट्रामध्ये सुरु असलेला वनरक्षक, वनपाल व वनमजुरांच्या बेमुदत संप लागलीच न मिटल्यास महाराष्ट्रातील १० ते १५ वाघांची शिकार केली जाण्याची दाट शक्यता वर्तविणारा अहवाल 'वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल बोर्डा'ने पंतप्रधान कार्यालयाला पाठविला आहे. व्याघ्र प्रकल्पांवर नियंत्रणा ठेवणारे हे बोर्ड पंतप्रधानांच्या देखरेखीत कार्यरत आहे. महाराष्ट्रातील १२ हजार वनरक्षक, २ हजार वनपाल आणि ५ हजार वन कामगारांनी विविध मागण्यांच्या पुर्तेतेसाठी बेमुदत कामबंद आंदोलन छेडले आहे. मंगळवार हा या आंदोलनाचा दुसरा दिवस असून कामबंद आंदोलनामुळे महाराष्ट्रातील वन्यप्राण्याच्या संरक्षणाबाबत मोठे संकट निर्माण झाले आहे. या आंदोलनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रातील सहा व्याघ्र प्रकल्पांना बसला आहे. आधीच महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय तस्करांच्या रडारवर आहे. त्यातच वन कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरु झाल्याने आंतरराष्ट्रीय तस्करांची टोेळी महाराष्ट्रातील जंगलामध्ये शिरण्याची दाट शक्यता आहे. यासंदर्भात राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए) व वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल बोर्डाने दखल घेऊन तसा अहवाल पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविला आहे. व्याघ्र प्रकल्पांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल बोर्ड अस्तित्त्वात आहे. महाराष्ट्रामध्ये सहा व्याघ्र प्रकल्प असून येथे वाघांची सर्वाधिक संख्या आहे. त्यामुळे भारतामध्ये महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पाला चौथ्या क्रमांकाचा दर्जा आहे. जंगलात काम करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनात सहभाग घेतल्यामुळे ताडोबा, सह्याद्री, पेंच व मेळघाट या प्रदेशातील जंगल आंतरराष्ट्रीय तस्करांद्वारे लक्ष्य केले जाईल, अशी भीती पंतप्रधानांना पाठविण्यात आलेल्या अहवालात वर्तविण्यात आली आहे. पंतप्रधानांनी मध्यस्थी करुन राज्य सरकारशी चर्चा करावी व संप मिटविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंतीही अहवालातून करण्यात आली आहे.