शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

-तर १५ वाघ जिवानिशी जाणार

By admin | Updated: August 27, 2014 00:54 IST

महाराष्ट्रामध्ये सुरु असलेला वनरक्षक, वनपाल व वनमजुरांच्या बेमुदत संप लागलीच न मिटल्यास महाराष्ट्रातील १० ते १५ वाघांची शिकार केली जाण्याची दाट शक्यता वर्तविणारा अहवाल 'वाईल्ड लाईफ क्राईम

वन कर्मचाऱ्यांचा संप : 'वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल बोर्डा'चा इशारावैभव बाबरेकर - अमरावतीमहाराष्ट्रामध्ये सुरु असलेला वनरक्षक, वनपाल व वनमजुरांच्या बेमुदत संप लागलीच न मिटल्यास महाराष्ट्रातील १० ते १५ वाघांची शिकार केली जाण्याची दाट शक्यता वर्तविणारा अहवाल 'वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल बोर्डा'ने पंतप्रधान कार्यालयाला पाठविला आहे. व्याघ्र प्रकल्पांवर नियंत्रणा ठेवणारे हे बोर्ड पंतप्रधानांच्या देखरेखीत कार्यरत आहे. महाराष्ट्रातील १२ हजार वनरक्षक, २ हजार वनपाल आणि ५ हजार वन कामगारांनी विविध मागण्यांच्या पुर्तेतेसाठी बेमुदत कामबंद आंदोलन छेडले आहे. मंगळवार हा या आंदोलनाचा दुसरा दिवस असून कामबंद आंदोलनामुळे महाराष्ट्रातील वन्यप्राण्याच्या संरक्षणाबाबत मोठे संकट निर्माण झाले आहे. या आंदोलनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रातील सहा व्याघ्र प्रकल्पांना बसला आहे. आधीच महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय तस्करांच्या रडारवर आहे. त्यातच वन कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरु झाल्याने आंतरराष्ट्रीय तस्करांची टोेळी महाराष्ट्रातील जंगलामध्ये शिरण्याची दाट शक्यता आहे. यासंदर्भात राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए) व वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल बोर्डाने दखल घेऊन तसा अहवाल पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविला आहे. व्याघ्र प्रकल्पांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल बोर्ड अस्तित्त्वात आहे. महाराष्ट्रामध्ये सहा व्याघ्र प्रकल्प असून येथे वाघांची सर्वाधिक संख्या आहे. त्यामुळे भारतामध्ये महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पाला चौथ्या क्रमांकाचा दर्जा आहे. जंगलात काम करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनात सहभाग घेतल्यामुळे ताडोबा, सह्याद्री, पेंच व मेळघाट या प्रदेशातील जंगल आंतरराष्ट्रीय तस्करांद्वारे लक्ष्य केले जाईल, अशी भीती पंतप्रधानांना पाठविण्यात आलेल्या अहवालात वर्तविण्यात आली आहे. पंतप्रधानांनी मध्यस्थी करुन राज्य सरकारशी चर्चा करावी व संप मिटविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंतीही अहवालातून करण्यात आली आहे.