शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

सत्ता द्या, शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प देतो : उद्धव ठाकरे

By admin | Updated: October 5, 2014 01:15 IST

चिखली (बुलडाणा) येथील शिवसेनेच्या प्रचारासभेत उद्धव ठाकरे यांचे आश्‍वासन.

चिखली (बुलडाणा): शिवसेनेच्या हाती राज्याची सत्ता द्या, रेल्वे अर्थसंकल्पाच्या धर्तीवर शे तीसाठीही स्वतंत्र अर्थसंकल्प देऊ, असे आश्‍वासन शिवसेनेचे कार्याध्यक्ष पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी चिखली येथे शनिवारी दिले. राज्यातील बहुतांश नागरिकांच्या उदरनिर्वाहाचे साधन हे शेती आहे; मात्र आतापर्यंत शेतकर्‍यांचे कैवारी म्हणविणार्‍यांनीच सत्तेत असूनही शेतकर्‍यांवर आत्महत्येची पाळी आणली असल्याचा आरोप ठाकरे यांनी यावेळी केला. शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी स्थानिक जिल्हा सहकारी बँकेनजिकच्या भव्य प्रांगणामध्ये शनिवार, ४ ऑक्टोबर रोजी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आमदार दिवाकर रावते, खासदार तथा जिल्हा संपर्क प्रमुख प्रतापराव जाधव, पक्षाचे उमेदवार डॉ.प्रतापसिंग राजपूत, आमदार विजयराज शिंदे, डॉ.संजय रायमुलकर, वसंतराव भोजने, संतोष घाटोळ आणि हरीभाऊ हुरसाड, तसेच जिल्हा प्रमुखद्वय धिरज लिंगाडे आणि दत्ता पाटील, युवा सेनेचे जिल्हा उपप्रमुख रोहीत खेडेकर, शिवसेनेचे तालुका प्रमुख अर्जुन नेमाडे, शहर प्रमुख निलेश अंजनकर, शिवाजीराव देशमुख, महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख सिंधुताई खेडेकर, चंदाताई बढे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबतच भाजपलाही लक्ष्य केले. ह्यमहाराष्ट्र की सत्ता दो, महाराष्ट्र मे अच्छे दिन आयेंगेह्ण अशी घोषणा करणार्‍यांनी जी सत्ता मिळाली आहे, तिचा वापर आधी शे तकर्‍यांच्या आणि महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी करा, असा टोला मारला. शेतकर्‍यांना पूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी करताना, ठाकरे म्हणाले, एकमेव शेतकर्‍यांच्या समस्यांची जाण असलेले स्व. गोपीनाथराव मुंडे भाजपमध्ये एकमेव नेते होते. सत्ता मिळेपर्यंत भाजपला शिवसेनेची गरज होती. आता सत्ता मिळताच अच्छे दिन आले तर शिवसेना नकोसी होतेय. या स्वार्थी लोकांना शिवसैनिक धडा शिकवतीलच, असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्राच्या पिढय़ा बरबाद केल्याचा आरोपही त्यांनी केला; मात्र त्यांच्या संपूर्ण भाषणाचा रोख केवळ भाजपकडेच असल्याचे दिसून येत होते.इतर पक्षांनी धनशक्ती आणि जातिय समीकरणांचा विचार करुन उमेदवारांची निवड केली; मात्र शिवसेना हा एकमेव पक्ष असा आहे, की तो सर्वसामान्य कुटुंबातील शिवसैनिकांना आमदार आणि खासदारकीची संधी देतो. विधानसभेवर भगवा फडकाविण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करा असे आवाहन खा. प्रतापराव जाधव यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे संचलन निलेश अंजनकर यांनी तर आभार अर्जुन नेमाडे यांनी मानले.