शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

सत्ता द्या, शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प देतो : उद्धव ठाकरे

By admin | Updated: October 5, 2014 01:15 IST

चिखली (बुलडाणा) येथील शिवसेनेच्या प्रचारासभेत उद्धव ठाकरे यांचे आश्‍वासन.

चिखली (बुलडाणा): शिवसेनेच्या हाती राज्याची सत्ता द्या, रेल्वे अर्थसंकल्पाच्या धर्तीवर शे तीसाठीही स्वतंत्र अर्थसंकल्प देऊ, असे आश्‍वासन शिवसेनेचे कार्याध्यक्ष पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी चिखली येथे शनिवारी दिले. राज्यातील बहुतांश नागरिकांच्या उदरनिर्वाहाचे साधन हे शेती आहे; मात्र आतापर्यंत शेतकर्‍यांचे कैवारी म्हणविणार्‍यांनीच सत्तेत असूनही शेतकर्‍यांवर आत्महत्येची पाळी आणली असल्याचा आरोप ठाकरे यांनी यावेळी केला. शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी स्थानिक जिल्हा सहकारी बँकेनजिकच्या भव्य प्रांगणामध्ये शनिवार, ४ ऑक्टोबर रोजी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आमदार दिवाकर रावते, खासदार तथा जिल्हा संपर्क प्रमुख प्रतापराव जाधव, पक्षाचे उमेदवार डॉ.प्रतापसिंग राजपूत, आमदार विजयराज शिंदे, डॉ.संजय रायमुलकर, वसंतराव भोजने, संतोष घाटोळ आणि हरीभाऊ हुरसाड, तसेच जिल्हा प्रमुखद्वय धिरज लिंगाडे आणि दत्ता पाटील, युवा सेनेचे जिल्हा उपप्रमुख रोहीत खेडेकर, शिवसेनेचे तालुका प्रमुख अर्जुन नेमाडे, शहर प्रमुख निलेश अंजनकर, शिवाजीराव देशमुख, महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख सिंधुताई खेडेकर, चंदाताई बढे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबतच भाजपलाही लक्ष्य केले. ह्यमहाराष्ट्र की सत्ता दो, महाराष्ट्र मे अच्छे दिन आयेंगेह्ण अशी घोषणा करणार्‍यांनी जी सत्ता मिळाली आहे, तिचा वापर आधी शे तकर्‍यांच्या आणि महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी करा, असा टोला मारला. शेतकर्‍यांना पूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी करताना, ठाकरे म्हणाले, एकमेव शेतकर्‍यांच्या समस्यांची जाण असलेले स्व. गोपीनाथराव मुंडे भाजपमध्ये एकमेव नेते होते. सत्ता मिळेपर्यंत भाजपला शिवसेनेची गरज होती. आता सत्ता मिळताच अच्छे दिन आले तर शिवसेना नकोसी होतेय. या स्वार्थी लोकांना शिवसैनिक धडा शिकवतीलच, असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्राच्या पिढय़ा बरबाद केल्याचा आरोपही त्यांनी केला; मात्र त्यांच्या संपूर्ण भाषणाचा रोख केवळ भाजपकडेच असल्याचे दिसून येत होते.इतर पक्षांनी धनशक्ती आणि जातिय समीकरणांचा विचार करुन उमेदवारांची निवड केली; मात्र शिवसेना हा एकमेव पक्ष असा आहे, की तो सर्वसामान्य कुटुंबातील शिवसैनिकांना आमदार आणि खासदारकीची संधी देतो. विधानसभेवर भगवा फडकाविण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करा असे आवाहन खा. प्रतापराव जाधव यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे संचलन निलेश अंजनकर यांनी तर आभार अर्जुन नेमाडे यांनी मानले.