शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्राला न्याय द्या

By admin | Updated: July 5, 2014 04:47 IST

अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील रेल्वेचे जाळे अपुरे असून येथे पायाभूत सुविधा आणि नवीन रेल्वे मार्गाचे प्रकल्प सुरु करणे आवश्यक आहे.

मुंबई : अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील रेल्वेचे जाळे अपुरे असून येथे पायाभूत सुविधा आणि नवीन रेल्वे मार्गाचे प्रकल्प सुरु करणे आवश्यक आहे. आगामी रेल्वे अर्थसंकल्पात राज्यासाठी पुरेसा निधी देण्याची मागणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांच्याकडे केली आहे. राज्यात नवीन रेल्वे सुरु करणे, प्रवाशांच्या सोयी-सुविधांच्या सुधारणेसाठी राज्यातील खासदार, आमदार यांनी आवाज उठविला असून या अपेक्षांची पूर्तता होणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. कुंभमेळ्याच्या निमित्ताने देशभरातून लाखो भाविक नाशिकमध्ये येतात. पुढील वर्षी होणाऱ्या अर्ध-महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक, देवळाली आणि ओढा स्थानकांवरील सुविधा वाढविण्याची गरज आहे. राज्य शासनानेही यासाठी आर्थिक तरतूद केली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.मुंबईतील रेल्वे सेवा सुधारावी मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरीय लोकल रेल्वे सेवेच्या पायाभूत सुविधांमध्ये देखील अजून वाढ होणे आवश्यक आहे. रेल्वे फलाटांची उंची वाढविण्याची आवश्यकता असून मध्य रेल्वेवरील हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर बोरीवली, विरार, डहाणूसाठी अधिकाधिक लोकल सेवा सुरू करण्याची गरज आहे. एमयुटीपी- २ या प्रकल्पासाठी ५०० कोटी, पनवेल-कर्जत कॉरिडॉर आणि ऐरोली-कळवा या एमयूटीपी- ३ टप्प्यातील रेल्वेमार्गांसाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली. त्या आठ मार्गांसाठी तातडीने निधी द्यामहाराष्ट्रातील ८ रेल्वे प्रकल्पांमध्ये ५० टक्के हिस्सा देण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. यापैकी अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ व वर्धा-यवतमाळ-नांदेड या नवीन दोन रेल्वे मार्गांचे काम पुरेशा निधीअभावी रेंगाळले आहे. तर, वडसा-गडचिरोली, आदिलाबाद-माणिकगड, कराड-चिपळूण, मनमाड-इंदूर, पुणे-नाशिक आणि नागपूर-नागभिड या ६ प्रकल्पांना अद्याप मान्यता मिळाली नाही. राज्य शासन पुढील तीन वर्षांत आपला हिस्सा देण्यास कटिबद्ध असून रेल्वे मंत्रालयानेही निधी द्यावा, असे मुख्यमंत्र्यांनी निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)