शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

अनुभवांना चेहरा देणे म्हणजे कविता

By admin | Updated: December 31, 2015 04:14 IST

गेली सात दशके आपल्या शब्दांद्वारे मराठी कवितेला स्वत:ची वेगळी ओळख देणाऱ्या मंगेश पाडगावकरांनी कवितेबरोबर जीवनातील विविध विषयांवर चिंतन केले.

गेली सात दशके आपल्या शब्दांद्वारे मराठी कवितेला स्वत:ची वेगळी ओळख देणाऱ्या मंगेश पाडगावकरांनी कवितेबरोबर जीवनातील विविध विषयांवर चिंतन केले. कविता अनुभवच असतात. प्रत्येक अनुभव कवीकडे चेहरा मागत असतो. त्याचा आविष्कार कविता, गझल किंवा गाण्याच्या रूपात होत असतो. या शब्दात ९ वर्षांपूर्वी आयोजित केलेल्या नागपूर संगीत महोत्सव निमित्ताने पाडगावकर यांनी ‘लोकमत’चे प्रतिनिधी राज चिंचणकर यांच्याकडे आपल्या लेखनाचा प्रवास उलगडला होता.कविता किंवा गाणं कसं सूचतं, ते अजिबात सांगता येणार नाही. एखादी घटना घडते किंवा विशिष्ट असा उत्कट अनुभव येतो, तेव्हा कविता मुळीच सूचत नाही. उलट काहीही संबंध नसताना एक ओळ मनात येते आणि तीच कवितेची सुरुवात ठरते. माझं ‘श्रावणात घननिळा’ हे गाणं असंच अचानक निर्माण झालं आहे. त्यामागची पार्श्वभूमी गमतीशीर आहे. मुंबईत मी एकदा रेल्वेने प्रवास करत होतो. उन्हाळ्याचे दिवस होते. घाम गळत होता. तितक्यात अचानक एक ओळ कुठून तरी आली. अंगातून घामाच्या धारा वाहत असतानाही तिचा मला मूड कळला. त्यावेळी प्रवासात माझ्यासोबत असणाऱ्या श्रीनिवास खळे आणि मी, त्या गाण्याचा मूड व्ही.टी. स्टेशन येईपर्यंत पकडला होता. गंमत अशी, की, ‘श्रावणात घननिळा’ हे गाणे जरी पावसात भिजलेले वाटत असले, तरी ते ऐन घामेजलेल्या दिवसांत तयार झालेले आहे.‘कविता एकट्याने वाचता येते, परंतु गाणं एकट्याने वाचता येत नाही. कविता आणि गाणं यांची तुलनाही करता येत नाही. जीवनातल्या नाना तऱ्हेचे अनुभव माझ्याकडे येतात. ते मला सांगतात की, मला माझा चेहरा दे, मला माझा आवाज दे. प्रत्येक अनुभव त्याची भाषा मागत असतो. असाच कधीतरी एक अनुभव मला येऊन सांगतो की, मला चेहरा दे मला गझल व्हायचंय. तेव्हा तो शुद्ध गझलच असतो. या तिन्ही प्रकारांत भाषेची सर्जनशीलता महत्त्वाची असते’.सन्मान कविवर्यांचा...नागपूर संगीत महोत्सव, तसेच मराठी हास्यकवी संमेलन अशा ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये मंगेश पाडगावकर आवर्जून उपस्थित होते.आम्ही मुंबईच्या रस्त्यावर कविता वाचल्या आहेत‘यशवंत देव आणि श्रीनिवास खळे या संगीतकारांनी माझ्या बहुतांश गाण्यांना चाली लावल्या आहेत. चालीवरून गाण्यांचे शब्द लिहिणे मला मान्य नाही.मी तसं करू शकतो, पण तसे करणे मला पटत नाही. एखाद्या काव्याचं गाणं करायचं की कविता, हे माझ्यातला कलाकार ठरवतो’. मी विंदा आणि वसंत बापट असे आम्ही तिघांनी गावोगाव फिरून कार्यक्रम केले. टीका करणाऱ्यांनी त्यावर टीका केली, पण आम्ही आमचे कार्यक्रम सुरूच ठेवले.आम्ही मुंबईच्या रस्त्यावर कविता वाचल्या आहेत‘यशवंत देव आणि श्रीनिवास खळे या संगीतकारांनी माझ्या बहुतांश गाण्यांना चाली लावल्या आहेत. चालीवरून गाण्यांचे शब्द लिहिणे मला मान्य नाही.मी तसं करू शकतो, पण तसे करणे मला पटत नाही. एखाद्या काव्याचं गाणं करायचं की कविता, हे माझ्यातला कलाकार ठरवतो’. मी विंदा आणि वसंत बापट असे आम्ही तिघांनी गावोगाव फिरून कार्यक्रम केले. टीका करणाऱ्यांनी त्यावर टीका केली, पण आम्ही आमचे कार्यक्रम सुरूच ठेवले.