शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
3
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
4
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
5
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
6
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
7
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
8
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
9
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
10
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
11
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
12
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
13
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
14
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
15
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
16
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
17
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
18
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
19
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
20
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका

अनुभवांना चेहरा देणे म्हणजे कविता

By admin | Updated: December 31, 2015 04:14 IST

गेली सात दशके आपल्या शब्दांद्वारे मराठी कवितेला स्वत:ची वेगळी ओळख देणाऱ्या मंगेश पाडगावकरांनी कवितेबरोबर जीवनातील विविध विषयांवर चिंतन केले.

गेली सात दशके आपल्या शब्दांद्वारे मराठी कवितेला स्वत:ची वेगळी ओळख देणाऱ्या मंगेश पाडगावकरांनी कवितेबरोबर जीवनातील विविध विषयांवर चिंतन केले. कविता अनुभवच असतात. प्रत्येक अनुभव कवीकडे चेहरा मागत असतो. त्याचा आविष्कार कविता, गझल किंवा गाण्याच्या रूपात होत असतो. या शब्दात ९ वर्षांपूर्वी आयोजित केलेल्या नागपूर संगीत महोत्सव निमित्ताने पाडगावकर यांनी ‘लोकमत’चे प्रतिनिधी राज चिंचणकर यांच्याकडे आपल्या लेखनाचा प्रवास उलगडला होता.कविता किंवा गाणं कसं सूचतं, ते अजिबात सांगता येणार नाही. एखादी घटना घडते किंवा विशिष्ट असा उत्कट अनुभव येतो, तेव्हा कविता मुळीच सूचत नाही. उलट काहीही संबंध नसताना एक ओळ मनात येते आणि तीच कवितेची सुरुवात ठरते. माझं ‘श्रावणात घननिळा’ हे गाणं असंच अचानक निर्माण झालं आहे. त्यामागची पार्श्वभूमी गमतीशीर आहे. मुंबईत मी एकदा रेल्वेने प्रवास करत होतो. उन्हाळ्याचे दिवस होते. घाम गळत होता. तितक्यात अचानक एक ओळ कुठून तरी आली. अंगातून घामाच्या धारा वाहत असतानाही तिचा मला मूड कळला. त्यावेळी प्रवासात माझ्यासोबत असणाऱ्या श्रीनिवास खळे आणि मी, त्या गाण्याचा मूड व्ही.टी. स्टेशन येईपर्यंत पकडला होता. गंमत अशी, की, ‘श्रावणात घननिळा’ हे गाणे जरी पावसात भिजलेले वाटत असले, तरी ते ऐन घामेजलेल्या दिवसांत तयार झालेले आहे.‘कविता एकट्याने वाचता येते, परंतु गाणं एकट्याने वाचता येत नाही. कविता आणि गाणं यांची तुलनाही करता येत नाही. जीवनातल्या नाना तऱ्हेचे अनुभव माझ्याकडे येतात. ते मला सांगतात की, मला माझा चेहरा दे, मला माझा आवाज दे. प्रत्येक अनुभव त्याची भाषा मागत असतो. असाच कधीतरी एक अनुभव मला येऊन सांगतो की, मला चेहरा दे मला गझल व्हायचंय. तेव्हा तो शुद्ध गझलच असतो. या तिन्ही प्रकारांत भाषेची सर्जनशीलता महत्त्वाची असते’.सन्मान कविवर्यांचा...नागपूर संगीत महोत्सव, तसेच मराठी हास्यकवी संमेलन अशा ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये मंगेश पाडगावकर आवर्जून उपस्थित होते.आम्ही मुंबईच्या रस्त्यावर कविता वाचल्या आहेत‘यशवंत देव आणि श्रीनिवास खळे या संगीतकारांनी माझ्या बहुतांश गाण्यांना चाली लावल्या आहेत. चालीवरून गाण्यांचे शब्द लिहिणे मला मान्य नाही.मी तसं करू शकतो, पण तसे करणे मला पटत नाही. एखाद्या काव्याचं गाणं करायचं की कविता, हे माझ्यातला कलाकार ठरवतो’. मी विंदा आणि वसंत बापट असे आम्ही तिघांनी गावोगाव फिरून कार्यक्रम केले. टीका करणाऱ्यांनी त्यावर टीका केली, पण आम्ही आमचे कार्यक्रम सुरूच ठेवले.आम्ही मुंबईच्या रस्त्यावर कविता वाचल्या आहेत‘यशवंत देव आणि श्रीनिवास खळे या संगीतकारांनी माझ्या बहुतांश गाण्यांना चाली लावल्या आहेत. चालीवरून गाण्यांचे शब्द लिहिणे मला मान्य नाही.मी तसं करू शकतो, पण तसे करणे मला पटत नाही. एखाद्या काव्याचं गाणं करायचं की कविता, हे माझ्यातला कलाकार ठरवतो’. मी विंदा आणि वसंत बापट असे आम्ही तिघांनी गावोगाव फिरून कार्यक्रम केले. टीका करणाऱ्यांनी त्यावर टीका केली, पण आम्ही आमचे कार्यक्रम सुरूच ठेवले.