शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

दहावी नापासांना संधी द्या

By admin | Updated: November 28, 2014 23:54 IST

शासकीय सेवेत शिपाई भरती : राज्य सहकारी कर्मचाऱ्यांच्या बैठकीत ठराव

सिंधुदुर्गनगरी : शासकीय सेवेत वर्ग ४ची (शिपाई) भरती करताना दहावीपासून पदवीधरपर्यंत शिपाई पदावर नेमणूक केली जाते. त्यामुळे भरती प्रक्रियेत सातवी ते दहावी नापासपर्यंतच्या मुलांना शासकीय सेवेपासून वंचित रहावे लागते. त्यामुळे समाजामध्ये बेकारी वाढत चालली आहे. म्हणून शिपाई भरती करताना दहावी नापासपर्यंतच्या मुलांनाच शिपाई पदाची संधी द्यावी, असा महत्त्वपूर्ण ठराव महाराष्ट्र राज्य सहकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने मुंबई येथे झालेल्या १४व्या राज्यस्तरीय अधिवेशनात घेतला.या संघटनेचे अधिवेशन नुकतेच औरंगाबाद येथे झाले. या अधिवेशनाचे उद्घाटन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते झाले. तर समारोप केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या हस्ते झाले. या अधिवेशनास खासदार चंद्रकांत खैरे, आमदार काळे, आमदार संजय शिरसाठ, आमदार अतुल साठे, नगरसेवक अभिजीत देशमुख, संघटनेचे जिल्हाध्यक्ष किसन धनराज, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे राज्य सहसचिव एस. एल. सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील २१ पदाधिकारी औरंगाबाद येथील अधिवेशनाला उपस्थित होते.सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष धनराज व सकपाळ यांनी ठरावावर चर्चा करताना जिल्ह्याच्यावतीने तीन नवीन ठराव मांडले. यात शिपाई भरती करताना दहावी नापासपर्यंतच्या मुलांनाच शिपाई पदाची संधी द्यावी, महसूल विभागातील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून किरकोळ चूक झाली तरी फौजदारी दाखल करण्याऐवजी कार्यालयीन चौकशी होणे गरजेचे आहे. निवडणुका लागतात त्यावेळी कर्मचाऱ्यांना ते राहत असलेल्या ठिकाणी व ते कार्यरत असलेले ठिकाण आणि मतदारसंघ वगळून निवडणूक कामासाठी इतर ठिकाणी नेमणूक दिली जाते. अशाप्रकारे कर्मचाऱ्यांवर अविश्वास दाखविला जातो. यामुळे महिला कर्मचाऱ्यांचे खूप हाल होतात. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मतदारसंघातच निवडणूक कामासाठी नेमणूक करावी, असे महत्त्वपूर्ण ठराव घेण्यात आले.या अधिवेशनात कर्मचाऱ्यांच्या हिताचे एकूण २३ प्रलंबित प्रश्नांचे ठराव मांडण्यात आले असून त्याचा पाठपुरावा करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले असून प्रसंगी आंदोलनही करावे लागेल व ते करण्याची तयारी राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी दाखवली आहे. ठरावामध्ये आगाऊ वेतनवाढ, बालसंगोपन रजा, रिक्त पदे त्वरित भरणे, विनाअट अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या, महागाई भत्त्याची ३५ महिन्याची थकबाकी, निवृत्तीचे वय ६० करणे, ५ दिवसांचा आठवडा करणे, बोनस सुरू करणे, निवृत्तीसाठी कमीतकमी २० वर्षे सेवा, प्रत्येक तालुक्यासाठी जातपडताळणी पथक निर्माण करून जिल्हास्तरावर पडताळणी समिती निर्माण करणे, बंधपत्रीत हिवताप कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करणे, गटविमा योजना दर केंद्राप्रमाणे असावेत. संघटना सभासद वर्गणी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून वसूल करणे, महाराष्ट्र दर्शन सवलतीमध्ये आई-वडील व सासू-सासरे यांचा कुटुंब शाखेमध्ये समावेश असावा. उपदानाची परीगणना करताना महागाई भत्त्याचा समावेश करावा, असे २३ ठराव मांडण्यात आले. त्याचा शासनाकडे पाठपुरावा करण्याबाबत सर्वानुमते ठरले असून प्रसंगी शासनाशी संघर्ष करण्याचा निर्धार करण्यात आला.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकारी दीपक महाडिक, एस. एल. सकपाळ, किसन देसाई, भास्कर कासार, अरविंद कोलते, राजन वालावलकर, विजय वर्दम, आत्माराम ठाकूर, सिद्धार्थ कदम, अनंत वालावलकर, नारायण राऊळ, बाळकृष्ण राणे, सुहास पाटील, विलास रायकर, रमेश महाकाळ, अनुजा कदम, प्रथमा कुडाळकर, सुविधा परब, वैशाली पाटील यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्यावतीने अधिवेशनामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेऊन किसन धनराज यांच्या निवडीचे औरंगाबाद येथे स्वागत केले. (प्रतिनिधी)कोकण विभागीय सहसचिवपदी धनराजत्रैवार्षिक अधिवेशनामध्ये राज्य कार्यकारिणीची निवड करण्यात आली. सन १९८१ ला रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन सिंधुदुर्ग जिल्हा निर्माण झाला तेव्हापासून आजपर्यंत गेली ३३ वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्याला राज्यकार्यकारिणीवर प्रतिनिधीत्व मिळाले नव्हते. त्याकरिता यापूर्वी बऱ्याचवेळा सिंधुदुर्ग जिल्ह्यातर्फे निवडणुका लढविण्यात आल्या. त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याला यश आले नव्हते. मात्र जिल्हाध्यक्ष किसन धनराज यांचे संघटनात्मक उत्कृष्ट काम व कामाची धडाडी पाहून मध्यवर्ती संघटनेचे पदाधिकारी व राज्यातील पदाधिकाऱ्यांनी किसन धनराज यांची कोकण विभागीय सहसचिव या पदावर बिनविरोध निवड केली.