शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

कर्जाच्या खर्चावर श्वेतपत्रिका काढणारच

By admin | Updated: December 2, 2014 00:40 IST

राज्यावर ३ लाख ४४४ हजार कोटी रुपये कर्ज आहे. मात्र, कर्ज काढून उभारलेला एवढा पैसा नेमका कुठे खर्च झाला यावर प्रकाश टाकण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी श्वेतपत्रिका काढली जाईल,

अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी सादर : सुधीर मुनगंटीवार यांचा पुनरुच्चारनागपूर : राज्यावर ३ लाख ४४४ हजार कोटी रुपये कर्ज आहे. मात्र, कर्ज काढून उभारलेला एवढा पैसा नेमका कुठे खर्च झाला यावर प्रकाश टाकण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी श्वेतपत्रिका काढली जाईल, अशी घोषणा वित्त, नियोजन व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी ‘लोकमत भवन’ला सदिच्छा भेट देऊन संपादकीय सहकाऱ्यांशी चर्चा केली. मुनगंटीवार म्हणाले, राज्यात खर्च केलेल्या कर्जाच्या रकमेतून राज्याची किती संपत्ती तयार झाली, महसुलात किती वाढ झाली, रोजगार निर्मिती किती झाली व लोक समूहाला याचा किती फायदा झाला या चार निकषांवर अभ्यास करून ही श्वेतपत्रिका काढली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या राज्याला वार्षिक २३ हजार कोटी रुपये व्याज भरावे लागत आहे. मात्र, एवढे कर्ज काढून उभारलेली रक्कम विधायक कामासाठी खर्च करण्यात आली की चुकीच्या कामांवर हे पाहणे आवश्यक आहे. आपण एखादे घर बांधायला घेतो ते वर्ष-दोन वर्षात पूर्ण करतो, मात्र, सिंचन प्रकल्पाचे काम वर्षानुवर्षे सुरू राहते. त्यामुळे कित्येक पट पैसा खर्च होतो. या सर्व बाबींचा ऊहापोह यात केला जाईल. काँग्रेसला विरासतमध्ये सत्ता मिळाली व आम्हाला कर्ज मिळाले आहे. काँग्रेस सरकारने घेतलेल्या कर्जापासून राज्याची कुठलीही संपत्ती उभारली गेलेली नाही. पैसा खर्च झाला पण गतीने विकास झाला नाही. मध्य प्रदेशचा कृषी विकास दर २४ टक्क्यांवर गेला, आपण बरेच मागे राहिलो. येत्या काळात हे चित्र बदलायचे आहे. त्यासाठी ऊर्जा, उद्योग, कृषी, सिंचन, वन आदी विभागात कसे चांगले काम करता येईल, यासाठी प्रत्येक विभाागाला स्वतंत्रपणे सादरीकरण करण्याचे निर्देश दिले जातील, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)चंद्रपुरात दारुबंदी निश्चितचंद्रपूर जिल्ह्यात कोणत्याही परिस्थितीत दारुबंदी लागू केली जाईल. यासंबंधीचा प्रस्ताव तयार झाला आहे. येत्या हिवाळी अधिवेशनापूर्वी याची घोषणा केली जाईल. प्रत्यक्षात बंदी १ एप्रिल, १४ एप्रिल की १ मे पासून लागू करायची याबाबतचा निर्णय चर्चेतून घेतला जाईल, अशी घोषणा वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. ते म्हणाले, चंद्रपुरात दारुबंदी केल्यामुळे राज्य सरकारचा २०० कोटी रुपयांचा महसूल बुडणार आहे. पण दारूमुळे आरोग्य, सार्वजनिक सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था आदीबाबत निर्माण होणारे प्रश्न हाताळण्यासाठी सुमारे १४०० कोटी रुपये खर्च होतात. त्यामुळे दारुबंदीतून महसूल कमी होणार नसून उलट बचत होणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. व्यसनमुक्तीची घोषणा करणे सोपे आहे, पण व्यसनमुक्त समाज निर्माण करणे कठीण आहे. दारुबंदीनंतर व्यसनी व्यक्ती दुसरीकडे वळण्याची शक्यता आहे. शिवाय त्यांच्या आरोग्याचे प्रश्नही निर्माण होऊ शकतात. ही परिस्थिती हाताळण्यासाठी काय करता येईल याची पूर्वतयारी करण्यासाठी काही स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाईल. उत्पादन शुल्क विभाग व पोलीस अधिकाऱ्यांचाही यात समावेश केला जाईल. व्यसनमुक्तीसाठी काम करणाऱ्या संस्थांची संख्या वाढविली जाईल. आरोग्य विभागाला सांगून अशा रुग्णांसाठी औषधे तयार ठेवले जातील. यासाठी अर्थसंकल्पात चार कोटी रुपयांची तरतूद केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. आम्ही वेगळ्या विदर्भाच्या बाजूने आहोत. शिवसेनेशी भाजपची सकारात्मक चर्चा सुरू आहे. रविवारीही सकारात्मक चर्चा झाली. शिवसेना सरकारमध्ये सहभागी होईल, असेही मुनगंटीवार म्हणाले.