शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
4
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
5
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
6
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
7
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
8
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
9
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
10
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
11
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
12
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
13
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
14
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
15
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
16
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
17
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
18
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
19
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
20
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा

वेतनवाढ लवकर घ्या, पण नोकरी सोडू नका

By admin | Updated: September 21, 2016 05:29 IST

वेतन कमी मिळते म्हणून एसटी महामंडळाची नोकरी सोडणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या वाढली आहे.

विलास गावंडे,

यवतमाळ- वेतन कमी मिळते म्हणून एसटी महामंडळाची नोकरी सोडणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या वाढली आहे. परिणामी मनुष्यबळ अस्थिर होत आहे. शिवाय पदभरतीसाठी वारंवार प्रक्रिया राबवावी लागत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी अधिकाऱ्यांना आता दोन वर्षातच श्रेणीवाढ दिली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात सरळ सेवा भरतीअंतर्गत वर्ग-एक आणि दोनच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते. यामध्ये वाहतूक निरीक्षक, वरिष्ठ आगार व्यवस्थापक, सुरक्षा अधिकारी, यंत्र अभियंता आदी पदांचा समावेश असतो. या अधिकाऱ्यांना तीन वर्षेपर्यंत कनिष्ठ वेतनश्रेणी दिली जात होती. या वेतनश्रेणीत सहा ते आठ हजार रुपयांपर्यंत वेतन मिळते. तीन वर्षेपर्यंत एवढ्या कमी वेतनात नोकरी परवडत नसल्याने अनेक जण नोकरी सोडून जात असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. यावर पर्याय म्हणून महामंडळाने अधिकाऱ्यांच्या वेतनश्रेणीचा कालावधी दोन वर्षे केला आहे. दोन वर्षानंतर वेतनश्रेणी वाढताच चांगले वेतन मिळणार असल्याने अधिकारी नोकरी सोडून जाणार नाही, असे यामागचे धोरण असल्याची माहिती सूत्रांनी दिली. >कामगारांमध्ये नाराजीचा सूरमहामंडळात नव्याने रुजू झालेले चालक, वाहक आणि यांत्रिक कामगारांनाही कमी वेतन मिळते. अधिकाऱ्यांसाठी वेतनश्रेणीचा कालावधी कमी करण्यात आला. कामगारांविषयी हा विचार का केला गेला नाही, असा प्रश्न कामगारांकडून विचारला जात आहे. वेतनश्रेणी कालावधी ठरविताना महामंडळाने दुजाभाव केला आहे. कामगारांनाही कमी वेतनाचा फटका बसतो. सर्वांसाठी समान धोरण असावे.- सचिन गिरी,‘एसटी’ संघर्ष गु्रप, यवतमाळ