शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
2
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
3
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
4
'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
5
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
6
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
7
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
8
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
9
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
10
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
11
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
12
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
13
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
14
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
15
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
16
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
17
Operation Sindoor Live Updates: भारत पाकिस्तानमधील लष्करी संघर्ष थांबला! डोनाल्ड ट्रम्प यांनी काय सांगितलं?
18
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
19
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
20
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...

वेतनवाढ लवकर घ्या, पण नोकरी सोडू नका

By admin | Updated: September 21, 2016 05:29 IST

वेतन कमी मिळते म्हणून एसटी महामंडळाची नोकरी सोडणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या वाढली आहे.

विलास गावंडे,

यवतमाळ- वेतन कमी मिळते म्हणून एसटी महामंडळाची नोकरी सोडणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या वाढली आहे. परिणामी मनुष्यबळ अस्थिर होत आहे. शिवाय पदभरतीसाठी वारंवार प्रक्रिया राबवावी लागत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी अधिकाऱ्यांना आता दोन वर्षातच श्रेणीवाढ दिली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात सरळ सेवा भरतीअंतर्गत वर्ग-एक आणि दोनच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते. यामध्ये वाहतूक निरीक्षक, वरिष्ठ आगार व्यवस्थापक, सुरक्षा अधिकारी, यंत्र अभियंता आदी पदांचा समावेश असतो. या अधिकाऱ्यांना तीन वर्षेपर्यंत कनिष्ठ वेतनश्रेणी दिली जात होती. या वेतनश्रेणीत सहा ते आठ हजार रुपयांपर्यंत वेतन मिळते. तीन वर्षेपर्यंत एवढ्या कमी वेतनात नोकरी परवडत नसल्याने अनेक जण नोकरी सोडून जात असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. यावर पर्याय म्हणून महामंडळाने अधिकाऱ्यांच्या वेतनश्रेणीचा कालावधी दोन वर्षे केला आहे. दोन वर्षानंतर वेतनश्रेणी वाढताच चांगले वेतन मिळणार असल्याने अधिकारी नोकरी सोडून जाणार नाही, असे यामागचे धोरण असल्याची माहिती सूत्रांनी दिली. >कामगारांमध्ये नाराजीचा सूरमहामंडळात नव्याने रुजू झालेले चालक, वाहक आणि यांत्रिक कामगारांनाही कमी वेतन मिळते. अधिकाऱ्यांसाठी वेतनश्रेणीचा कालावधी कमी करण्यात आला. कामगारांविषयी हा विचार का केला गेला नाही, असा प्रश्न कामगारांकडून विचारला जात आहे. वेतनश्रेणी कालावधी ठरविताना महामंडळाने दुजाभाव केला आहे. कामगारांनाही कमी वेतनाचा फटका बसतो. सर्वांसाठी समान धोरण असावे.- सचिन गिरी,‘एसटी’ संघर्ष गु्रप, यवतमाळ