शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
2
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
3
एक वर्ष पूर्ण होण्याआधीच जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा पायउतार
4
अदानी लिमिटेडविरुद्धचा ‘तो’ मानहानिकारक मजकूर नष्ट करा; उच्च न्यायालयाचे निर्देश, प्रकरण काय? 
5
दिवाळीत मध्य रेल्वेच्या ९४४ एक्स्प्रेस गाड्या धावणार; प्रवाशांच्या सुविधांसाठी अनारक्षित व्यवस्था
6
भारताने रशियाकडून केली तेल खरेदी, अन् नवारो-मस्क यांच्यात भडका! काय म्हणाले होते नवारो?
7
चिंताजनक! कोणतेही प्रशिक्षण नसलेल्यांकडून भारतात २.५ टक्के महिलांची होतेय प्रसूती, महाराष्ट्रात स्थिती काय?
8
पीडित मुलगी ठाम तर नराधमास शिक्षा होणारच; १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला १२ वर्षांचा कारावास 
9
रामायण केवळ कथा नाही तर धर्म, जीवन जगण्याची कला : मोरारीबापू
10
गणपती विसर्जन सोहळ्यावर शोककळा; वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू  
11
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
12
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
13
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
14
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
15
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
16
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
17
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
18
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
19
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
20
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...

आवडीच्या क्षेत्रात सखोल ज्ञान मिळवा

By admin | Updated: January 6, 2015 00:25 IST

ज्ञान ही मोठी शक्ती असून, या शक्तीच्या आधारे अमर्याद गोष्टींचा शोध घेता येतो.

नोबेलविजेत्या इ. योनाथ : भारती विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभपुणे : ज्ञान ही मोठी शक्ती असून, या शक्तीच्या आधारे अमर्याद गोष्टींचा शोध घेता येतो. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून त्यातच अधिकाधिक ज्ञान मिळवावे. केवळ पैसा, पुरस्कार आणि सन्मानासाठी ज्ञान मिळवू नये, असे मत इस्राईलच्या नोबेल पुरस्कारप्राप्त संशोधक प्रा. अदा. इ. योनाथ यांनी व्यक्त केले.भारती विद्यापीठाच्या सोळाव्या पदवीप्रदान समारंभात त्या बोलत होत्या. विद्यापीठाचे कुलपती डॉ. पतंगराव कदम, कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम, कुलसचिव जी. जयकुमार, परीक्षा विभागाचे नियंत्रक डॉ. विश्वास धाप्ते, सर्व विद्याशाखांचे अधिष्ठाता आदी उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते २१ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके आणि ५४ विद्यार्थ्यांना पीएच. डी. पदवी प्रदान करण्यात आली.योनाथ म्हणाल्या, ‘‘काही कारणास्तव शिक्षण घेता येत नाही, त्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आजच्या तरुण पिढीने प्रयत्न केले पाहिजेत. गरीब आणि श्रीमंती यांच्यातील दरी कमी करण्यासाठी शिक्षण हे एक प्रभावी साधन असून, त्याचा उपयोग करायला हवा.विद्यार्थ्यांनी कोणत्याही क्षेत्रात सर्वोच्च स्थानावर जाण्यासाठी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. ज्ञान मिळवताना आपल्याला आनंद मिळाला पाहिजे. तसेच, जीवन समजून घेणे हासुद्धा ज्ञान मिळविण्याचा उद्देश असला पाहिजे.’’आपला जीवनप्रवास उलगडताना योनाथ म्हणाल्या, ‘‘एका गरीब कुटुंबात माझा जन्म झाला. घराजवळील सर्वसामान्य शाळेत मी शिक्षण घेत होते. परंतु, मी चांगल्या शाळेत शिक्षण घेतले पाहिजे, यासाठी माझ्या शिक्षिकेने प्रयत्न केले. मी पडेल ते काम करून शिक्षण घेतले. दरम्यान, वडिलांचे अकाली निधन झाले. परंतु, शिक्षण घेण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असल्यामुळे मी संशोधन क्षेत्रात काम करू शकले.माझ्या संशोधनाचा विषय जगातल्या संशोधकांना परिकल्पनेप्रमाणे वाटत होता. मात्र, या स्वप्नाला मी सत्यात उतरवले.’’शिवाजीराव कदम म्हणाले, ‘‘आजच्या नव्या युगात टिकून राहण्यासाठी सर्जनशीलता आणि नवनिर्मिती हे मूलमंत्र आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळावा आणि त्यांच्यातील कौशल्ये विकसित व्हावीत यासाठी विद्यापीठाने सेंटर फॉर क्रिएटिव्हिटी अँड स्किल डेव्हलपमेंट केंद्राची स्थापना केली आहे.विद्यापीठातर्फे संशोधनाला चालना देण्यासाठी विद्यार्थी व प्राध्यापकांसाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करून दिला जात आहे.’’ (प्रतिनिधी)४पत्रकारांशी बोलताना अदा इ. योनाथ म्हणाल्या, सध्याचे विद्यार्थी पायाभूत विज्ञानाकडे वळत नाही, अशी ओरड केली जाते. परंतु, त्यामुळे घाबरून जाण्याचे काही कारण नाही. तर विद्यार्थ्यांना संशोधनाकडे वळवणे गरजेचे आहे. त्यांच्यात लहानपणापासूनच संशोधक निर्माण करणे गरजेचे आहे. तसेच एकाच विषयाचा अभ्यास करून उपयोग नाही, तर विद्यार्थ्यांनी आंतरविद्याशाखीय अभ्यास करायला हवा.विद्यार्थ्यांनी नैतिक मूल्यांपासून दूर जाऊ नये. योग्य मार्ग स्वीकारून शिक्षण घ्यावे. आपल्या कर्तव्याचे पालन करावे, आई, वडील, शिक्षक, देश यांना परमेश्वराप्रमाणे पूजनीय मानावे.- डॉ. पतंगराव कदम