शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
5
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
6
Operation Sindoor Live Updates: भारताचा कोणताही शत्रू वाचू शकत नाही, अमित शाहांची पोस्ट
7
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
8
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
9
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
11
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
12
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
13
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
14
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
15
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
16
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
17
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
18
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
19
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
20
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?

आवडीच्या क्षेत्रात सखोल ज्ञान मिळवा

By admin | Updated: January 6, 2015 00:25 IST

ज्ञान ही मोठी शक्ती असून, या शक्तीच्या आधारे अमर्याद गोष्टींचा शोध घेता येतो.

नोबेलविजेत्या इ. योनाथ : भारती विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभपुणे : ज्ञान ही मोठी शक्ती असून, या शक्तीच्या आधारे अमर्याद गोष्टींचा शोध घेता येतो. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून त्यातच अधिकाधिक ज्ञान मिळवावे. केवळ पैसा, पुरस्कार आणि सन्मानासाठी ज्ञान मिळवू नये, असे मत इस्राईलच्या नोबेल पुरस्कारप्राप्त संशोधक प्रा. अदा. इ. योनाथ यांनी व्यक्त केले.भारती विद्यापीठाच्या सोळाव्या पदवीप्रदान समारंभात त्या बोलत होत्या. विद्यापीठाचे कुलपती डॉ. पतंगराव कदम, कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम, कुलसचिव जी. जयकुमार, परीक्षा विभागाचे नियंत्रक डॉ. विश्वास धाप्ते, सर्व विद्याशाखांचे अधिष्ठाता आदी उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते २१ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके आणि ५४ विद्यार्थ्यांना पीएच. डी. पदवी प्रदान करण्यात आली.योनाथ म्हणाल्या, ‘‘काही कारणास्तव शिक्षण घेता येत नाही, त्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आजच्या तरुण पिढीने प्रयत्न केले पाहिजेत. गरीब आणि श्रीमंती यांच्यातील दरी कमी करण्यासाठी शिक्षण हे एक प्रभावी साधन असून, त्याचा उपयोग करायला हवा.विद्यार्थ्यांनी कोणत्याही क्षेत्रात सर्वोच्च स्थानावर जाण्यासाठी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. ज्ञान मिळवताना आपल्याला आनंद मिळाला पाहिजे. तसेच, जीवन समजून घेणे हासुद्धा ज्ञान मिळविण्याचा उद्देश असला पाहिजे.’’आपला जीवनप्रवास उलगडताना योनाथ म्हणाल्या, ‘‘एका गरीब कुटुंबात माझा जन्म झाला. घराजवळील सर्वसामान्य शाळेत मी शिक्षण घेत होते. परंतु, मी चांगल्या शाळेत शिक्षण घेतले पाहिजे, यासाठी माझ्या शिक्षिकेने प्रयत्न केले. मी पडेल ते काम करून शिक्षण घेतले. दरम्यान, वडिलांचे अकाली निधन झाले. परंतु, शिक्षण घेण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असल्यामुळे मी संशोधन क्षेत्रात काम करू शकले.माझ्या संशोधनाचा विषय जगातल्या संशोधकांना परिकल्पनेप्रमाणे वाटत होता. मात्र, या स्वप्नाला मी सत्यात उतरवले.’’शिवाजीराव कदम म्हणाले, ‘‘आजच्या नव्या युगात टिकून राहण्यासाठी सर्जनशीलता आणि नवनिर्मिती हे मूलमंत्र आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळावा आणि त्यांच्यातील कौशल्ये विकसित व्हावीत यासाठी विद्यापीठाने सेंटर फॉर क्रिएटिव्हिटी अँड स्किल डेव्हलपमेंट केंद्राची स्थापना केली आहे.विद्यापीठातर्फे संशोधनाला चालना देण्यासाठी विद्यार्थी व प्राध्यापकांसाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करून दिला जात आहे.’’ (प्रतिनिधी)४पत्रकारांशी बोलताना अदा इ. योनाथ म्हणाल्या, सध्याचे विद्यार्थी पायाभूत विज्ञानाकडे वळत नाही, अशी ओरड केली जाते. परंतु, त्यामुळे घाबरून जाण्याचे काही कारण नाही. तर विद्यार्थ्यांना संशोधनाकडे वळवणे गरजेचे आहे. त्यांच्यात लहानपणापासूनच संशोधक निर्माण करणे गरजेचे आहे. तसेच एकाच विषयाचा अभ्यास करून उपयोग नाही, तर विद्यार्थ्यांनी आंतरविद्याशाखीय अभ्यास करायला हवा.विद्यार्थ्यांनी नैतिक मूल्यांपासून दूर जाऊ नये. योग्य मार्ग स्वीकारून शिक्षण घ्यावे. आपल्या कर्तव्याचे पालन करावे, आई, वडील, शिक्षक, देश यांना परमेश्वराप्रमाणे पूजनीय मानावे.- डॉ. पतंगराव कदम