शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

गावस्तरावर भरपाई मिळावी!

By admin | Updated: May 4, 2015 01:28 IST

पीक विमा आता सक्तीचा नसून ऐच्छिक स्वरूपाचा आहे. मात्र विमा घेतल्यानंतर भरपाई देताना नुकसानीचा आढावा गट स्तरावर घेतला जातो.

विजय जावंधियाज्येष्ठ शेतकरी नेते -

पीक विमा आता सक्तीचा नसून ऐच्छिक स्वरूपाचा आहे. मात्र विमा घेतल्यानंतर भरपाई देताना नुकसानीचा आढावा गट स्तरावर घेतला जातो. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीनंतर नुकसान झालेल्या एखाद्या गावातील शेतकऱ्यांना पुरेशी भरपाईसुद्धा मिळत नाही. त्यामुळे नुकसानीचा आढावा गावस्तरावर घेण्याची गरज आहे. म्हणजे प्रत्येक गावातील वस्तुनिष्ठ नुकसानीचा अंदाज घेता येऊ शकतो.पाऊस मोजण्याची यंत्रणा गावस्तरावर विकसित केली जावी. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी पीक विम्याचा संपूर्ण हप्ता सरकारने भरावा. त्याचा राज्य व केंद्र सरकारने निम्मा वाटा उचलावा. भारत जागतिक व्यापार संघटनेचा सदस्य असल्याने आपल्याला अनुदानाबाबत त्यांचे नियम पाळावे लागतात. मात्र पिकासाठी ‘ग्रीन बॉक्स’ योजनेच्या माध्यमातून १०० टक्के अनुदान दिले जाऊ शकते. शेतकरी निसर्ग व बाजाराच्या अनिश्चिततेविरोधात लढत असतो. बाजाराच्या अनिश्चिततेपासूनही शेतकऱ्याला संरक्षण मिळाले पाहिजे.