शहरं
Join us  
Trending Stories
1
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
2
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
3
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
4
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
6
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
7
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
8
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
9
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
10
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
11
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
12
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
13
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
14
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
15
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
16
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
17
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
18
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
19
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
20
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   

मरेच्या फेऱ्यांना फाटकांचा फटका

By admin | Updated: July 10, 2015 03:08 IST

मध्य रेल्वेच्या मेन लाइन आणि हार्बरवरील पाच फाटकांमुळे रेल्वे प्रशासनाला मोठा फटका बसत असून, महिन्याला दोन हजारपेक्षा जास्त लोकल फेऱ्या रद्द होत असल्याचे समोर आले आहे.

मुंबई : मध्य रेल्वेच्या मेन लाइन आणि हार्बरवरील पाच फाटकांमुळे रेल्वे प्रशासनाला मोठा फटका बसत असून, महिन्याला दोन हजारपेक्षा जास्त लोकल फेऱ्या रद्द होत असल्याचे समोर आले आहे. फाटकांमुळे लोकल फेऱ्या रद्द होण्याचे प्रमाण वर्षभरात वाढले असून, त्यामुळे लोकल गाड्यांबरोबरच प्रवाशांनाही लेटमार्क लागत आहे. लोकल फेऱ्या रद्द होण्याचे प्रमाण कमी व्हावे यासाठी हे फाटक सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत बंद करण्यासाठी रेल्वेकडून प्रयत्न करण्यात आले. मात्र हे प्रयत्नही फोल ठरत आहेत. मध्य रेल्वेमार्गावरील मेन लाइनचा उपनगरापर्यंतचा पसारा सीएसटी ते कल्याण, कर्जत, खोपोली, कसारा आणि हार्बरवर नवी मुंबईपर्यंत आहे. मेन लाइनवरील कळवा, दिवा, ठाकुर्ली हे तीन तर हार्बरवर शिवडी आणि चुनाभट्टी हे दोन फाटक असून, याच फाटकांमुळे लोकल गाड्यांना मोठा फटका बसत आहे. हे फाटक २४ तासांत जवळपास १00 वेळा उघडतात. वर्षभरापूर्वी फाटक उघडण्याचे प्रमाण हे कमी होते. मात्र स्थानिकांच्या मागणीनुसार फाटक उघडण्याचे प्रमाण वाढले आणि त्याचाच फटका बसत असल्याचे रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. एक वर्षापूर्वी दिवसाला ३0 लोकल फेऱ्या रद्द होत होत्या. मात्र फाटक उघडण्याचे प्रमाण वाढल्याने आता दिवसाला ७0 ते ८0 लोकल फेऱ्या रद्द होत आहेत. हे पाहता वर्षभरापूर्वी ९00 लोकल फेऱ्या रद्द होत असताना आता सुमारे २ हजारपेक्षा जास्त फेऱ्या रद्द होत आहेत.