शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
6
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
7
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
8
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
9
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
10
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
11
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
12
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
13
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
14
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
15
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
16
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
17
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
20
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

चार दिवसांत गॅस्ट्रोचे रुग्ण दोनशेपल्ल्याड

By admin | Updated: July 31, 2016 01:45 IST

आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसाच्या लपंडावामुळे साथीच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे.

मुंबई : आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसाच्या लपंडावामुळे साथीच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या चार दिवसांत गॅस्ट्रोच्या रुग्णांचा आलेख दोनशेच्या वर सरकला आहे. तर मलेरियाच्या रुग्णांनी शंभरी पार केल्याची माहिती महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून मिळाली आहे. डेंग्यूच्या रुग्णांनीही गेल्या तीन दिवसांत नव्वदी पार केली आहे. २५ ते २८ जुलैदरम्यान गॅस्ट्रोचे तब्बल २२० रुग्ण आढळून आले आहेत. दूषित पाणी आणि अन्नाच्या सेवनामुळे गॅस्ट्रोची लागण होते. मलेरियाचे ११४ रुग्ण आढळून आले आहेत. डेंग्यूच्या रुग्णांचेही प्रमाण गेल्या चार दिवसांत वाढले आहे. डेंग्यूच्या ९१ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर लेप्टोस्पायरोसिसच्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. ४४ लेप्टोस्पायरोसिसच्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तापाच्या रुग्णातही वाढ झाली आहे. १ हजार २० तापाचे रुग्ण आढळून आले आहेत, तर हेपिटायटिसचे १८ रुग्ण आढळले आहेत. जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात पावसाने उसंत घेतली होती. गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस आणि मध्येच ऊन असे काहीसे वातावरण आहे. अशा वातावरणात साथींचे आजार बळावण्याचा धोका असतो. दमट वातावरण हे विषाणूंच्या वाढीस पोषक असते. त्याचबरोबर साठलेल्या पाण्यात डासांची पैदास वाढते. त्यामुळे आजारांचा धोका असल्याने मुंबईकरांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. (प्रतिनिधी) >डेंग्यू रोखण्यासाठी ही काळजी घ्या...डास चावू नयेत म्हणून हात-पाय झाकले जातील असे कपडे घाला रात्री झोपताना डासांपासून बचावासाठी जाळ्या लावारुग्णांना डास चावणार नाहीत याची काळजी घ्याघरातील पाण्याची भांडी आठवड्यातून एकदा तरी रिकामी करा पाण्याची भांडी, पिंप पूर्ण बंद राहतील याची काळजी घ्या, घट्ट झाकण लावाआजूबाजूच्या परिसरात टायर, करवंट्या, अडगळीचे सामान राहणार नाही याची काळजी घ्या.>लेप्टोस्पायरोसिस टाळण्यासाठी ही काळजी घ्या...साचलेल्या दूषित पाण्यातून चालणे टाळाजोखीम गटातील व्यक्तींनी शारीरिक स्वच्छता राखाकचरा उचलावा, गटारांमध्ये कचरा अडकून गटारे तुंबणार नाहीत याची काळजी घ्यावीरहिवासी क्षेत्रात पाणी अधिक काळ साठून राहणार नाही याची काळजी घ्याअन्नपदार्थ स्वच्छ जागी आणि झाकून ठेवावेतसाचलेल्या पाण्यातून चालताना शक्य असल्यास गमबूट वापरावेत.