शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

कचऱ्याने दमले प्रशासन

By admin | Updated: May 6, 2017 02:50 IST

तब्बल १ हजार टन कचऱ्यावर शहरातील वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये रोज प्रक्रिया होत आहे, तरीही ६०० टन कचरा शिल्लक राहतो

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : तब्बल १ हजार टन कचऱ्यावर शहरातील वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये रोज प्रक्रिया होत आहे, तरीही ६०० टन कचरा शिल्लक राहतो. शिल्लक कचरा दिशा व अजिंक्य या अनुक्रमे रामटेकडी व हडपसर येथील प्रकल्पांमध्ये साठवून ठेवला जात होता; मात्र या दोन्ही प्रकल्पांची क्षमता आता संपुष्टात येत चालली आहे. येत्या चार दिवसांत डेपोची समस्या सुटली नाही, तर शहर कचराकुंडी होण्याची दाट शक्यता आहे.शिल्लक कचऱ्याच्या विल्हेवाटीची व्यवस्था करताना प्रशासन आता दमले असून, महापौर व पालकमंत्री परदेशातच असल्याने महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या उर्वरित पदाधिकारीही हतबल झाले आहेत. सलग २० दिवसांनंतरही कचरा डेपोची समस्या अद्याप आहे तिथेच आहे. उरुळी येथील ग्रामस्थांनी कचरा टाकू न देण्याचा आपला निर्धार कायम ठेवला आहे. त्यांच्याशी चर्चा करण्याचे प्रशासनाचे व पदाधिकाऱ्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरत आहेत. सध्या शहरात एकूण ४८ प्रकल्प सुरू आहेत. त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त कचरा जिरवला जात आहे. वडगाव येथील प्रकल्प ५० टनांचा असूनही तिथे १०० टन कचरा रोज जिरवला जातो. काही प्रभागांमधील ५ ते ७ टन क्षमतेच्या प्रकल्पांमध्ये दीड पट जास्त कचरा दिला जातो. हे प्रकल्प महापालिकेने चालविण्यासाठी म्हणून वेगवेगळ्या संस्थांना दिले आहेत. त्यांना कर्मचारी वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, तसेच प्रकल्प सतत सुरूच ठेवावा, असेही सांगण्यात आले आहे. या मार्गाने सध्या शहरातील सुमारे १ हजार टन कचरा जिरवला जात आहे. त्यामुळेच सलग २० दिवस होऊनही शहरातील कचरा समस्येने अद्याप उग्र स्वरूप धारण केलेले नाही.मात्र, आता रोजचा शिल्लक ६०० टन कचरा ज्या दिशा व अजिंक्य या प्रकल्पांमध्ये साठवून ठेवला जात होता, त्या प्रकल्पांची क्षमता आता संपली आहे. रोज तिथे महापालिकेची कचरा जमा केलेली वाहने येऊन कचरा डंप करतात. तिथेच ओला व सुका असे वर्गीकरण करण्यात येऊन दोन्ही प्रकारचा कचरा साठविण्यात येत आहे. सुरू असलेल्या प्रकल्पांमध्ये रोजच्या रोज कचरा जात असल्यामुळे दोन्ही प्रकल्पांमधील कचरा रोज भर पडत असल्याने वाढतच चालला आहे. यावर उपाय म्हणून कचरा जमा करणाऱ्या वाहनचालकांना कचरा शहरातील उड्डाणपुलांच्या खाली असणाऱ्या पोकळीत साठवण्यास सांगण्यात आले होते. धायरी येथील उड्डाणपुलाच्या खाली असा कचरा साठवण्यात येत होता; मात्र स्थानिक नागरिकांच्या तक्रारी सुरू झाल्यावर शुक्रवारी दुपारी तो तिथून हलवण्यात आला. सर्व प्रयत्न करून, वेगवेगळी आश्वासने दिल्यानंतरही उरुळी ग्रामस्थ ऐकायला तयार नसल्याने आता प्रशासनालाही चिंता भेडसावू लागली आहे.महापालिकेत सत्ताधाऱ्यांपैकी उपमहापौर नवनाथ कांबळे, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ हेही आता ग्रामस्थांबरोबर चर्चा करून त्रस्त झाले आहेत. भिमाले म्हणाले, की प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न सुरू आहे.शहरातील प्रकल्पांची क्षमता वाढविण्यात येत आहे, येत्या १० दिवसांत वडगावमध्ये दोन प्रकल्प नव्याने सुरू करत आहोत. प्रशासनाला शहरात कचरा साठू देऊ नये, असे सांगण्यात आले़विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनीही प्रश्न सुटावा, अशीच राष्ट्रवादी काँग्रेसची इच्छा असल्याचे स्पष्ट केले. मात्र, सत्ताधाऱ्यांमधील वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित नाहीत, सरकार म्हणजे मुख्यमंत्री यात लक्ष घालायला तयार नाहीत; त्यामुळे विनाकारण प्रश्न चिघळत चालला आहे, अशी टिका त्यांनी केली. काँग्रेस, मनसे, शिवसेना हेही आता या विषयावर आंदोलन करून, सत्ताधारी भाजपावर टीका करून शांत झाले आहेत. सत्ताधाऱ्यांनी सर्वांना विश्वासात घेऊन या विषयावर चर्चा घडवून आणली पाहिजे, असे मत विरोधी पक्षांकडून व्यक्त होत आहे.