शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates : कोसळधारा! मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग; मध्य रेल्वेला फटका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
2
१८ महिने राहु-केतु गोचर: ५ मूलांकांना दुपटीने लाभ, गुंतवणुकीत फायदा; सुख-समृद्धी-भरभराट!
3
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
4
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
5
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
6
"तुझा नंबर पाठव, फ्लर्ट करायची इच्छा झालीये", टीव्ही अभिनेत्रीला दिग्गज मराठी अभिनेत्याचा मेसेज, म्हणाली- "तुझ्या बायकोला..."
7
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
8
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
9
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
10
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
11
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
12
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
13
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
14
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
15
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
16
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
17
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
18
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
19
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
20
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी

मीरा-भार्इंदरची धुरा गणेश नाईकांकडे

By admin | Updated: May 7, 2017 05:46 IST

मीरा-भार्इंदरमधील राष्ट्रवादीची नेतृत्वाअभावी झालेली वाताहत रोखण्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी नेतृत्वाची

राजू काळे/ लोकमत न्यूज नेटवर्कभार्इंदर : मीरा-भार्इंदरमधील राष्ट्रवादीची नेतृत्वाअभावी झालेली वाताहत रोखण्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी नेतृत्वाची दोर हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षातून बाहेर पडलेल्यांना धडा शिकवण्यासह निष्ठावंतांना येत्या पालिका निवडणुकीत न्याय देण्याचा निर्धार करण्यात आल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले. योग्य व ठोस नेतृत्वाअभावी स्थानिक पातळीवरील राष्ट्रवादीला गळती लागल्याने पक्षातील बरेच निष्ठावंत दुसऱ्या पक्षात विसावू लागले. यामुळे पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. राष्ट्रवादीमध्ये इतर पक्षांप्रमाणेच गटातटांचे राजकारण सुरू असल्याचे सर्वश्रुत असल्याने माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांच्या गटातील व त्यांचे समर्थक मानले जाणारे बहुतांश नगरसेवक भाजपा-सेनेत स्थिरावले. याचप्रमाणे नाईक यांच्या समर्थकांनीही राष्ट्रवादीसोबत फारकत घेत सेना-भाजपात जाणे पसंत केले. पक्षात केवळ काही निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्ते उरले असतानाच पक्षाचे जिल्हाध्यक्ष मोहन पाटील हेही पक्ष सोडून भाजपाच्या तंबूत गेले. यामुळे उरलीसुरली राष्ट्रवादी तळागाळाला जाऊ नये, यासाठी प्रदेशपातळीवरून माजी उपमहापौर जयंत पाटील यांची जिल्हाध्यक्षपदावर वर्णी लावण्यात आली. पाटील यांचा पक्षबांधणीचा कार्यक्रम सुरू असतानाच पक्षातील धुसफूस मात्र सुरूच राहिली. ही बाब थेट नाईकांच्या कानी धाडून त्यांना पक्षाचे नेतृत्व करण्याची गळ घालण्यात आली. अखेर, ते मान्य करीत नाईकांनी पक्षातील अनिष्टांची साफसफाई करण्यास सुरुवात केली आहे. लवकरच ते स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांशीही संवाद साधणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. राष्ट्रवादीचे स्थानिक नेतृत्व गिल्बर्ट मेंडोन्सा सध्या कारागृहात आहे. मेंडोन्सा हे आमदारकीच्या निवडणुकीपासून शिवसेनेच्या संपर्कात होते व आजही ते सेनेतच जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. २०१२ मधील निवडणुकीनंतर सुरुवातीला आघाडीच्या सत्तास्थापनेत मेंडोन्सा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र, पुढील अडीच वर्षांची सत्ता भाजपाने हिसकावून घेतली. सत्ता मिळवण्यासाठी मेंडोन्सा यांची कन्या तथा माजी महापौर कॅटलिन परेरा या आपल्या वडिलांसोबत सतत सेनेच्या संपर्कात होत्या. यात कॅटलिन यांचा सेनेतील संपर्क दांडगा झाल्याने त्या सेनेच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्याप्रमाणेच कुटुंबातील इतर काही नगरसेवक सेनेतच जाणार असल्याचे पक्षातील सूत्रांकडून सांगण्यात आले.काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढणार?मागील निवडणुकीत आघाडी न केल्यानेच काँग्रेस-राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळाले नाही. दोन्ही पक्षांच्या नेतृत्वाने परस्परांतील मतभेद बाजूला सारून येत्या पालिका निवडणुकीत आघाडी करणे आवश्यक आहे. आघाडीखेरीज पर्याय नसल्याची चर्चा पक्षात सुरू झाली आहे. यावरून, येत्या निवडणुकीत दोन्ही पक्षांची आघाडी होण्याचे संकेत मिळत असले, तरी स्थानिक पातळीवर काँग्रेसकडून अद्याप संकेत मिळालेले नाहीत. निवडणूक जाहीर होताच जागावाटपावर चर्चा होईल. अधिक जागा काँग्रेसला देण्याची तयारी आतापासूनच केल्याचे सांगण्यात येत आहे