ऑनलाइन लोकमत
गडचिरोली, दि. 7 - गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली मार्गावरील उमानूर जवळ भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात 6 जण जागीच ठारे झाले तर 8 जण जखमी आहेत. जखमींना गडचिरोली येथील रूग्णालयात नेण्यात आल्याची माहिती आहे. पहाटे 2 वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातातील सर्व मृतक हे देचली पेठा गावाचे रहिवासी आहेत.
सिरोंचा तालुक्यातील एक लग्नसोहळा आटोपून गावकरी परतत असताना पहाटे 2 च्या सुमारास ट्रक आणि मॅक्समध्ये जोरदार धडक झाली. गाडीत एकूण 14 जण होते त्यापैकी 6 जणांचा मृत्यू झाला. समोरून अचानक ट्रक येत असल्याचं पाहून चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली.