शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक कामगिरीवर ठरणार मंत्र्यांचे भवितव्य

By admin | Updated: February 20, 2017 04:40 IST

महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत ज्या भाजपा मंत्र्यांच्या जिल्ह्यात पक्षाला चांगले यश मिळणार नाही त्यांना घरी जावे लागू

यदु जोशी / मुंबईमहापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत ज्या भाजपा मंत्र्यांच्या जिल्ह्यात पक्षाला चांगले यश मिळणार नाही त्यांना घरी जावे लागू शकते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आज या बाबतचे सूतोवाच केले. वर्षा निवासस्थानी ते निवडक पत्रकारांशी बोलत होते. भाजपाचे मंत्री आणि आमदारांच्या या निवडणुकीतील कामगिरीचे मूल्यांकन मी निकालानंतर निश्चितपणे करणार आहे. ज्यांची कामगिरी अत्यंत असमाधानकारक असेल त्यांना घरी जावे लागू शकते. काहींना कामगिरी सुधारण्यास सांगितले जाईल. जे मंत्री आपल्या जिल्ह्याचे नेते होऊ शकत नाहीत ते राज्याचे नेते कसे होऊ शकतात, या शब्दात मुख्यमंत्र्यांनी संभाव्य कारवाईचे संकेत दिले. तसेच, ज्या राज्यमंत्र्यांची कामगिरी चांगली असेल, त्यांना बढती मिळू शकते, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. काही ठिकाणी भाजपाची परिस्थिती आधीच्या निवणुकीत अजिबातच चांगली नव्हती. तेथे चांगली कामगिरी म्हणजे अगदी सत्ताच मिळाली असे नाही पण निदान भाजपासाठी आजवर प्रतिकूल असलेल्या जिल्ह्यांमध्ये कामगिरी सुधारल्याचे दिसलेच पाहिजे. निवडणुकीनंतर महामंडळांवरील नियुक्त्या करण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली. मराठा समाजाच्या मोर्चांबद्दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच लक्ष्य केले आहे. या बाबत मुख्यमंत्री म्हणाले की, त्यांचे आरोप नैराश्येतून केलेले आहेत. टीका करायला काही उरले नाही म्हणजे असे आरोप होतात. अनेक नेत्यांची अशी अपेक्षा होती की मराठा समाजाच्या मोर्चांची सूत्रे त्यांच्या हाती यावीत. यासाठी त्यांनी चळवळीमध्ये त्यांची माणसेही सोडली. पण काहीही हाती न आल्याने नैराश्यापोटी माझ्यावर आरोप केले जात आहेत. सूत्रे त्यांच्या हाती यावीत. यासाठी त्यांनी चळवळीमध्ये त्यांची काही माणसेही सोडली होती पण काहीही हाती न आल्याने त्यांच्या पदरी नैराश्य आले आणि त्यातून माझ्यावर आरोप केले जात आहेत. पालिका निवडणुकीनंतर मुंबईत भाजपाला कोणाशी युती करण्याची गरजच पडली तर ती फक्त आणि फक्त पारदर्शक कारभाराची अट मान्य असलेल्यांबरोबरच होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.ठाकरेमुक्त, पवारमुक्तचेलक्ष्य कधीच नाहीमहापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीनंतर ठाकरेमुक्त मुंबई आणि पवारमुक्त महाराष्ट्र असे चित्र दिसेल का या प्रश्नात मुख्यमंत्री म्हणाले की ते आमचे कुणाचेही लक्ष्य नाही. असे ठाकरेमुक्त, पवारमुक्त करणे शक्यदेखील नसते. कुठला पक्ष असा संपत नसतो आणि तो कुणाचा उद्देशही असता कामा नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘काँग्रेसमुक्त भारत’ या विचारामागे काँग्रेसच्या जनहितविरोधी नीतींपासून मुक्ती हा होता. मुंबईत आमचा विरोध सेनेच्या आचाराला आहे.