शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

निवडणूक कामगिरीवर ठरणार मंत्र्यांचे भवितव्य

By admin | Updated: February 20, 2017 04:40 IST

महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत ज्या भाजपा मंत्र्यांच्या जिल्ह्यात पक्षाला चांगले यश मिळणार नाही त्यांना घरी जावे लागू

यदु जोशी / मुंबईमहापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत ज्या भाजपा मंत्र्यांच्या जिल्ह्यात पक्षाला चांगले यश मिळणार नाही त्यांना घरी जावे लागू शकते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आज या बाबतचे सूतोवाच केले. वर्षा निवासस्थानी ते निवडक पत्रकारांशी बोलत होते. भाजपाचे मंत्री आणि आमदारांच्या या निवडणुकीतील कामगिरीचे मूल्यांकन मी निकालानंतर निश्चितपणे करणार आहे. ज्यांची कामगिरी अत्यंत असमाधानकारक असेल त्यांना घरी जावे लागू शकते. काहींना कामगिरी सुधारण्यास सांगितले जाईल. जे मंत्री आपल्या जिल्ह्याचे नेते होऊ शकत नाहीत ते राज्याचे नेते कसे होऊ शकतात, या शब्दात मुख्यमंत्र्यांनी संभाव्य कारवाईचे संकेत दिले. तसेच, ज्या राज्यमंत्र्यांची कामगिरी चांगली असेल, त्यांना बढती मिळू शकते, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. काही ठिकाणी भाजपाची परिस्थिती आधीच्या निवणुकीत अजिबातच चांगली नव्हती. तेथे चांगली कामगिरी म्हणजे अगदी सत्ताच मिळाली असे नाही पण निदान भाजपासाठी आजवर प्रतिकूल असलेल्या जिल्ह्यांमध्ये कामगिरी सुधारल्याचे दिसलेच पाहिजे. निवडणुकीनंतर महामंडळांवरील नियुक्त्या करण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली. मराठा समाजाच्या मोर्चांबद्दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच लक्ष्य केले आहे. या बाबत मुख्यमंत्री म्हणाले की, त्यांचे आरोप नैराश्येतून केलेले आहेत. टीका करायला काही उरले नाही म्हणजे असे आरोप होतात. अनेक नेत्यांची अशी अपेक्षा होती की मराठा समाजाच्या मोर्चांची सूत्रे त्यांच्या हाती यावीत. यासाठी त्यांनी चळवळीमध्ये त्यांची माणसेही सोडली. पण काहीही हाती न आल्याने नैराश्यापोटी माझ्यावर आरोप केले जात आहेत. सूत्रे त्यांच्या हाती यावीत. यासाठी त्यांनी चळवळीमध्ये त्यांची काही माणसेही सोडली होती पण काहीही हाती न आल्याने त्यांच्या पदरी नैराश्य आले आणि त्यातून माझ्यावर आरोप केले जात आहेत. पालिका निवडणुकीनंतर मुंबईत भाजपाला कोणाशी युती करण्याची गरजच पडली तर ती फक्त आणि फक्त पारदर्शक कारभाराची अट मान्य असलेल्यांबरोबरच होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.ठाकरेमुक्त, पवारमुक्तचेलक्ष्य कधीच नाहीमहापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीनंतर ठाकरेमुक्त मुंबई आणि पवारमुक्त महाराष्ट्र असे चित्र दिसेल का या प्रश्नात मुख्यमंत्री म्हणाले की ते आमचे कुणाचेही लक्ष्य नाही. असे ठाकरेमुक्त, पवारमुक्त करणे शक्यदेखील नसते. कुठला पक्ष असा संपत नसतो आणि तो कुणाचा उद्देशही असता कामा नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘काँग्रेसमुक्त भारत’ या विचारामागे काँग्रेसच्या जनहितविरोधी नीतींपासून मुक्ती हा होता. मुंबईत आमचा विरोध सेनेच्या आचाराला आहे.