शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
4
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
5
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
6
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
7
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
8
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
9
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
10
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
11
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
12
एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
13
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
14
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
15
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
16
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं
17
Rajnath Singh : "पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली"
18
दिल्ली कॅपिटल्सनं ६ कोटींचा डाव लावला त्यानं दुबईचं फ्लाइट पकडलं! PSL कनेक्शनमुळे तो IPL ला मुकणार?
19
५० हजार पगार, घराचे स्वप्न पूर्ण होईल का? की भाड्यानेच राहणे परवडेल...; असं आहे सोपं गणित
20
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं

राज्यातील आठ हजार वसतिगृह कर्मचाऱ्यांचे भवितव्य अधांतरी

By admin | Updated: September 3, 2014 01:12 IST

सलग १५ वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारने महाराष्ट्र राज्यातील अनुदानित वसतिगृहातील आठ हजार १०४ कर्मचाऱ्यांचे भवितव्य धोक्यात आणले आहे. सतत मागणी केल्यानंतरही

राजुरा : सलग १५ वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारने महाराष्ट्र राज्यातील अनुदानित वसतिगृहातील आठ हजार १०४ कर्मचाऱ्यांचे भवितव्य धोक्यात आणले आहे. सतत मागणी केल्यानंतरही या कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी मंजुर करण्यात आली नाही. त्यामुळे राज्यातील २ हजार ३८८ वसतिगृह अधीक्षक, २ हजार ८५८ स्वयंपाकी, ४७० मदतनीस आणि २ हजार ३८८ चौकीदारांना तुटपुंज्या मानधनावर आपला उदरनिर्वाह करावा लागत आहे. करोडो रुपये जाहिरातीवर खर्च करणाऱ्या आघाडी सरकारने आपल्याच सामाजिक न्याय विभागाअंतर्गत येणाऱ्या अनुदानित वसतिगृह कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी मंजुर केला असतानाही अवघ्या ७८ कोटींचा भार राज्य सरकारच्या तिजोरीवर पडेल, या भीतीपोटी आठहजार कर्मचाऱ्यांना वेठीस धरण्यात आले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा हाती घेतल्यानंतर कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हा विषय त्यांच्या समोर मांडला. २०१२ च्या नागपूर हिवाळी अधिवेशनात अनुदानित वसतिगृहातील कर्मचाऱ्यांना नियमानुसार वेतनश्रेणी लागू करण्याचे निर्देश दिले. त्यावर सामाजिक न्याय विभागाने काहीच केले नाही. त्यामुळे चंद्रपूर जिल्हा अनुदानित वस्तीगृह कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सी.एच. चव्हाण यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र राज्यात २ हजार ३८८ वसतिगृह असून अनेक वसतिगृहात कार्यरत कर्मचारी गरीब व मागासलेल्या समाजाचे आहेत. एवढ्या प्रदीर्घ कालावधीनंतरही १५ वर्षांमध्ये हा प्रश्न सोडविण्यात तीन मुख्यमंत्र्याना यश आले नाही. स्वत: मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत ९ एप्रिल २०१३ ला वेतनश्रेणीचा प्रस्ताव दोन महिन्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवण्याचे निर्देश सामाजिक न्याय विभागाला दिले होते. परंतु १६ महिन्यानंतरही वेतनश्रेणीचा तयार प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडून मंजुर करण्यात आला नाही. त्यामुळे राज्यातील वसतिगृह कर्मचारी हतबल झाले असून अजून किती दिवस न्यायासाठी वाट पाहायची, असा प्रश्न ते उपस्थित करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)