शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
3
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
4
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
5
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
6
जातगणना : मॅजिक की मंडल?
7
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
8
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
9
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
10
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
11
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
12
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
13
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
14
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
15
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
16
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
17
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
18
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
19
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
20
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा

सोहळा फराळाचा!

By admin | Updated: October 29, 2016 23:38 IST

गेले १५ दिवस सुगरणीने राबून केलेल्या फराळावर एव्हाना घरातल्यांनी ताव मारला असेल. आता दिवाळीचे सगळेच पदार्थ जरी कधीही मिळत असले तरी दिवाळीच्या दिवसात

- भक्ती सोमणगेले १५ दिवस सुगरणीने राबून केलेल्या फराळावर एव्हाना घरातल्यांनी ताव मारला असेल. आता दिवाळीचे सगळेच पदार्थ जरी कधीही मिळत असले तरी दिवाळीच्या दिवसात ते करण्याची उत्सुकता आणि मजा वेगळीच असते. दिवाळीचे हे चार दिवस उत्साहाने, आनंदाने भारलेले असतात. त्यात खरी मजा येते ती फराळाने. खरं तर आजकाल चिवडा, लाडू, चकल्या, शंकरपाळे हे पदार्थ अगदी कधीही मिळतात. पण असे असले तरी दिवाळीच्या दिवसात हे पदार्थ करण्याची मजा काही औरच. घरातल्या गृहिणीची लगबग तर अगदी बघण्यासारखी असते. आमच्याकडे तर माझी आई दिवस ठरवून आजही सगळं फराळाचं करते. पण दिवाळीतले हे पदार्थ करताना इतर दिवसांपेक्षा त्या पदार्थांवर प्रेम जरा जास्तच असतं. म्हणून तर फराळ करणं हा घराघरात सोहळाच होऊन जातो. मग अगदी फोनवर किंवा मुलांच्या शाळेतही मैत्रिणी भेटल्या की फराळ कामांच्या गप्पाच जास्त असतात. एखादीची गेल्यावर्षीची चकलीची चव आवडते म्हणून तशीच चकली करण्याची धडपडही केली जाते. महाराष्ट्रात कुठेही जा हे फराळ करण्याची आपली आपली खासियत आहे. त्या भागात राहणारी मंडळी जर दुसरीकडे स्थलांतरित झाली तर दिवाळीच्या दिवसांत त्यांना जाम चुकल्यासारखे वाटते. काही महिन्यांपूर्वी नागपूरहून पुण्यात स्थलांतरित झालेल्या माझ्या पद्मजा काकूची मनाची अवस्था अगदी तशीच आहे. नागपूरला त्यांच्याकडे एक दिवस ठरवून पंडित (आचारी) यायचा. फक्त त्यांचाच नाही तर आणखी चार घरचा फराळ तो एका दिवसात आणि तोही चविष्ट करायचा. तो आला की पहिल्यांदा लाडू करायचा. मग ते सारण गार झालं की या चार घरातल्या बायका लाडू वळायला बसत. मग चकली, भरपूर चिवडा, चिरोटे.... दिवसभर त्या फराळाच्या सुगंधाने घर भारलेलं असायचं. ही आठवण सांगताना काकूचा कातर स्वर फराळाशी आपण किती एकरूप झालो आहोत हेच सांगत होता. फराळाशी निगडित अशा किती तरी आठवणी अनेकांच्या जोडल्या गेलेल्या असतील. काळाच्या ओघात घरातली गृहिणी कमावती झाली. मोठ्या हुद्द्यावर पोहोचली. त्यामुळे दिवाळीच्या दिवसात तिला आई-सासूप्रमाणे साग्रसंगीत फराळ करायला जमेल याची शाश्वती नाही. त्यामुळेच की काय आता रेडिमेड फराळाकडे महिलांचा ओढा वाढला आहे. यामुळे अनेक महिलांना रोजगार मिळतो आहे. थोडक्यात काय तर फराळ घरी केलेला असो वा बाहेरचा, त्याची मजा दिवाळीच्या दिवसात जास्त असते. संपूर्ण कुटुंबाने एकत्र येत केलेला फराळ आणि कल्ला याची आठवण पुढच्या दिवाळीपर्यंत पुरते. हो ना!बेक्ड फराळाचेही दिवसआजकाल वेगळ्या पद्धतीने पदार्थ केला की तो उत्सुकतेने खाल्ला जातो. त्यामुळेच की काय बेक्ड केलेला फराळही आता बनू लागला आहे. हा बेक्ड फराळ डाएट करत असलेले लोकही खाऊ शकत असल्याने त्याकडे तरुणाईचा ओढा जास्त वाढला आहे. या प्रकारांमध्ये प्रामुख्याने बेक्ड चकली, करंज्या, तिखट-मिठाचे शंकरपाळे, रव्याचा चिवडा, शेव असे अनेक प्रकार येतात. बेक्ड चकलीत जर चवीत फरक करायचा असेल तर त्यात कोथिंबीर पेस्ट, लसूणही घालावी. चकलीसाठी नेहमी करतो त्या सारणात कोथिंबीर, लसूण घालायची. सर्व सारण एकत्र केलेल्या गोळ्याची चकली पाडून ती १०-१५ मिनिटे बेक करायची. अशीही चकली फार खुसखुशीत लागते. असेच इतरही पदार्थांचे करता येते. दिसायलाही हे पदार्थ आकर्षक दिसतात. बदलत्या दिवाळीच्या वातावरणात मात्र, या बेक्ड प्रकारांकडे अधिक सकारात्मक बघायला हवे.