शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सर्व शिक्षा अभियानाला निधीची कात्री

By admin | Updated: November 20, 2015 02:03 IST

२0१५-१६ चा निधी अप्राप्त; बांधकामाच्या संख्येतही कपात.

संतोष वानखडे/ वाशिम: जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये भौतिक सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने कार्यान्वित असलेले सर्व शिक्षा अभियान सद्य स्थितीत अपुर्‍या निधीच्या कचाट्यात अडकले आहे. २0१४- १५ च्या मंजूर निधीतही ४0 टक्के ह्यबाकीह्ण ठेवून, २0१५-१६ या वर्षातील निधी अद्यापही प्राप्त झाला नाही. खासगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये भौतिक सुविधांचा अभाव असल्याची ओरड नेहमीच होते. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मुलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाच्या निधीच्या माध्यमातून राज्यात सर्व शिक्षा अभियान कार्यान्वित केले आहे. वर्गखोली बांधकाम, भौतिक सुविधा, विद्युतीकरण अशा सुविधा असणार्‍या एका वर्गखोलीवर पाच लाख ५0 हजाराची तरतूद केली जाते. प्रत्येक जिल्ह्यात ७0 ते १६0 अशा संख्येत वर्गखोलीवर खर्च केला जातो. वाशिम जिल्ह्यात २0१४-१५ या वर्षात एकूण १00 वर्गखोल्यांचे बांधकाम करण्यात आले असून, यावर पाच कोटी ५0 लाखाचा निधी खर्ची पडला. तसेच ८३ शाळांमध्ये विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी रॅम्प बांधण्यात आले. यावर प्रत्येकी २0 हजार रुपये असा एकूण १६ लाख ६0 हजाराचा खर्च झाला. बांधकाम व रॅम्प असा एकूण पाच कोटी ६६ लाख ६ हजाराचा निधी सर्व शिक्षा अभियानाला मिळणे क्रमप्राप्त होते. आतापर्यंत शासनाकडून पहिल्या टप्प्यात एक कोटी व दुसर्‍या टप्प्यात दोन कोटी असा एकूण तीन कोटी रुपये निधी मिळाला. अजून दोन कोटी ६६ लाखाच्या निधीची प्रतीक्षा आहे. याहीपेक्षा धक्कादायक बाब म्हणजे २0१५- १६ या वर्षात निधीत कपात केली असून, केवळ दोन वर्गखोल्या मंजूर करण्यात आल्या. शिक्षण विभागाने एकूण ७१ शाळा खोल्यांच्या बांधकामाची मागणी केली होती. २0१५-१६ या वर्षात सर्व शिक्षा अभियानांतर्गत राज्यात शिक्षण विभागाला अद्याप कोणताही निधी देण्यात आला नाही. त्यामुळे वर्गखोल्यांचे बांधकाम करावे की नाही, या संभ्रमात शिक्षण विभाग अडकला आहे.