शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

कुंभमेळ्यासाठी निधी द्या अन्यथा भाविकांवर निर्बंध

By admin | Updated: November 8, 2014 03:49 IST

पुढील वर्षी नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याकरिता गोदावरी नदी स्वच्छ करण्यासाठी राज्य शासनाने व येथील महापालिकेने मागणी केलेला निधी केंद्र शासनाने तात्काळ द्यावा

मुंबई : पुढील वर्षी नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याकरिता गोदावरी नदी स्वच्छ करण्यासाठी राज्य शासनाने व येथील महापालिकेने मागणी केलेला निधी केंद्र शासनाने तात्काळ द्यावा अन्यथा येथे येण्याऱ्या भाविकांना निर्बंध घालावे लागतील, असा इशारा शुक्रवारी उच्च न्यायालयाने दिला़दर १२ वर्षांनी येथे कुंभमेळा होतो़ २००३मध्ये येथे कुंभमेळा झाला होता व आता पुढील वर्षी येथे हा मेळा होणार आहे़ कुंभमेळ्याला देशभरातील भाविक या नदीत आंघोळ करतात व येथील पाणी तीर्थ म्हणून घेऊन जातात़ मात्र या नदीत सांडपाणी व औद्योगिक कंपन्यांचे प्रदूषित पाणी सोडले जाते़ यामुळे ही नदी प्रदूषित झाली आहे़ परिणामी पुढील वर्षीच्या कुंभमेळ्यासाठी येथे येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याला याने धोका होऊ शकतो़ तसेच याच नदीच्या पाण्यावर नाशिक जिल्ह्यातील शेती अवलंबून आहे़ तेव्हा या नदीत सांडपाणी व कंपन्यांचे पाणी सोडण्यास मज्जाव करावा व ही नदी स्वच्छ करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका राजेश मधुकर पंडित व इतरांनी अ‍ॅड़ प्रवर्तक पाठक यांच्यामार्फत दाखल केली आहे़तर कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून शासनाने या नदीजवळील भूखंड ताब्यात घेऊन तेथे पायाभूत सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी करणारी जनहित याचिका हिंदू जनजागृती समितीने अ‍ॅड़ वीरेंद्र इचलकरंजीकर यांच्यामार्फत दाखल केली आहे़या याचिकांवर न्या़ अभय ओक व न्या़ अजय गडकरी यांच्या खंडपीठासमोर एकत्रित सुनावणी झाली़ त्यात नाशिक महापालिका व राज्य शासनाने ही नदी स्वच्छ करण्यासाठी व येथे पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी केंद्राकडे सुमारे २ हजार कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे़ पण अजून हा निधी मिळाला नसल्याचे सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले़ (प्रतिनिधी)