शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

‘एफआरपी’चा कायदा शिथिल करावा लागेल

By admin | Updated: October 10, 2015 01:28 IST

‘रास्त आणि किफायतशीर किंमत (एफआरपी) एकरकमीच द्यायला हवी, असा कायदा आहे, परंतु साखर कारखानदारीही मोडून चालणार नाही. त्यामुळे या दोन्हींमध्ये

कोल्हापूर : ‘रास्त आणि किफायतशीर किंमत (एफआरपी) एकरकमीच द्यायला हवी, असा कायदा आहे, परंतु साखर कारखानदारीही मोडून चालणार नाही. त्यामुळे या दोन्हींमध्ये सुवर्णमध्य साधण्यासाठी कायदा थोडा शिथिल करावा लागेल,’ असे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. राज्यातील ५८ कारखान्यांनी गतहंगामातील १०० टक्के एफआरपी दिली असल्याचे त्यांनी सांगितले.येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘एफआरपी चौदा दिवसांत देणे कायद्याने बंधनकारक आहे. ती देण्यासाठी साखर कारखानदारीला जेवढी म्हणून मदत करता येईल, तेवढी मदत भाजपा सरकारने केली आहे. राज्यातील कारखान्यांकडून चार दिवसांपूर्वी १३०० कोटी रुपये एफआरपी थकीत होती. कारखान्यांची कर्जाची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे त्यातीलही रक्कम आता कमी झाली असेल. सुमारे ४०० कोटीच एफआरपीचे शिल्लक राहतील, असा अंदाज आहे. म्हणजे गत हंगामातील देय रकमेपैकी ९३ टक्के रक्कम शेतकऱ्यांना मिळाली आहे. ५८ कारखान्यांनी त्यांनी देय असलेली एफआरपीची १०० टक्के रक्कम दिली आहे. ज्या कारखान्यांनी एफआरपी दिलेली नाही, अशा आठ कारखान्यांवर गतहंगामात जप्तीची कारवाई केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. (प्रतिनिधी)साखर कारखान्यांकडून यंदाही पॅकेजची मागणी होऊ लागली आहे, परंतु वारंवार पॅकेज देणे शक्य होणार नाही. साखर कारखान्यांनाही काही जबाबदारी घ्यावी लागेल.- चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री