शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
5
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
6
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
7
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
8
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
9
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
10
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
11
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
12
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
13
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
14
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
15
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
16
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
17
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
18
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले
19
मुंबईची राज्यात तिसऱ्या स्थानी झेप, गतवर्षीच्या तुलनेत एक टक्का वाढ
20
भाजप जिल्ह्याध्यक्षांची संभाव्य नावे प्रदेशाकडे ; नावांबाबत उत्सुकता; आठवडाभरात निर्णय

युतीला रोखण्यासाठी आघाडीचा निर्णय

By admin | Updated: January 18, 2017 06:55 IST

स्वतंत्रपणे निवडणुका लढून सत्तेसाठी एकत्र येण्याचा भाजपा-शिवसेनेचा पॅटर्न गेल्या १५ वर्षांपासून जळगाव जिल्हा परिषदेत सुरू आहे.

मिलिंद कुलकर्णी,

जळगाव- स्वतंत्रपणे निवडणुका लढून सत्तेसाठी एकत्र येण्याचा भाजपा-शिवसेनेचा पॅटर्न गेल्या १५ वर्षांपासून जळगाव जिल्हा परिषदेत सुरू आहे. ‘तुझे माझे जमेना, तुझ्यावाचून करमेना’ अशी दोघांची स्थिती असल्याने, या दोघांच्या भांडणात पडण्यापेक्षा पालिका निवडणुकीतील पराभवातून धडा घेत, दोन्ही काँग्रेसने आघाडीचा सुज्ञ निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या ६७ तर पंचायत समितीच्या १३४ जागांसाठी निवडणुका होत आहे. भाजपातर्फे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री एकनाथ खडसे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, शिवसेनेकडून सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर, सहसंपर्कप्रमुख के.पी.नाईक, माजी आमदार चिमणराव पाटील, काँग्रेसचे प्रभारी विनायक देशमुख, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.संदीप पाटील, राष्ट्रवादीचे प्रभारी दिलीप वळसे पाटील, अरुणभाई गुजराथी, जिल्हाध्यक्ष डॉ.सतीश पाटील हे नेतृत्व करीत आहेत. चारही पक्षांनी जिल्हा व तालुका मेळावे घेऊन निवडणुकीचे बिगुल वाजविले आहे. नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत भाजपाने घवघवीत यश मिळविले, त्यापाठोपाठ शिवसेनेने कामगिरी बजावली आहे. दोन्ही काँग्रेसने ज्याठिकाणी आघाडी करून निवडणूक लढविली तेथे यश मिळाले. १५ वर्षांच्या युतीच्या कार्यकाळात भाजपा-शिवसेना पदाधिकाऱ्यांमधील वाद, भाजपा आणि शिवसेना या दोन पक्षाच्या नेत्यांमधील अंतर्गत वाद गाजले होते. गैरव्यवहार, भ्रष्टाचाराचे आरोप झाले. चौकशादेखील झाल्या. चंद्रकांत गुडेवार यांच्यासारख्या अधिकाऱ्याने चौकशी करुन अहवाल दिला. पोषण आहार, गणवेशवाटप या योजनांमधील गैरव्यवहार उघडकीस आला.