शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
3
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
4
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
5
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
6
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
7
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
8
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
9
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
10
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
11
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
12
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
13
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
14
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
15
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
16
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
17
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
18
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
19
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
20
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका

पाणी जिरवण्यासाठी मोकळ्या जागेचे बंधन

By admin | Updated: May 26, 2016 01:27 IST

पाणीटंचाईमुळे बोअरवेल खणण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये वाढले आहे़ परिणामी समुद्राने वेढलेल्या या शहरातील भूजल पातळी खालावण्याचा धोका आहे़ त्या जागी खाऱ्या पाण्याचे प्रमाण

मुंबई : पाणीटंचाईमुळे बोअरवेल खणण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये वाढले आहे़ परिणामी समुद्राने वेढलेल्या या शहरातील भूजल पातळी खालावण्याचा धोका आहे़ त्या जागी खाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढणे इमारतींच्या पायासाठी धोकादायक ठरू शकते़ त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्यासाठी इमारतींसमोर असलेल्या अंगणाच्या काही भागात कोणत्याही बांधकामास प्रतिबंध करण्याची तरतूद विकास नियंत्रण नियमावलीत प्रस्तावित आहे़मुंबईत काँक्रिटचे जंगल तयार झाल्याने पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी जागा शिल्लक नाही़ त्यातच पाणीटंचाईमुळे बोअरवेल खणण्याचे प्रमाणही वाढले आहे़ मात्र हे शहर समुद्राने वेढलेले असल्याने भूजलाची पातळी यामुळे खालावण्याचा धोका निर्माण झाला आहे़ भूजलात समुद्राचे खारे पाणी शिरल्यास इमारतींचा पाया कमकुवत होऊ शकतो, अशी धोक्याची घंटा एका सर्वेक्षणातून यापूर्वीच देण्यात आली होती़त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी विकास नियोजन आराखड्यातच यासाठी तरतूद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे़ त्यानुसार विनाआच्छादित म्हणजे छप्पर नसलेले व जमिनीखाली कोणत्याही प्रकारचे बांधकाम नसावे, अशी मोकळी जागा सोसायटी व इमारतीसमोरच्या अंगणात असावी, अशी तरतूद विकास नियोजन आराखड्यात करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)बांधकामास प्रतिबंधया मनोरंजनात्मक खुल्या जागेपैकी किमान ३० टक्के एवढ्या जागेवर फरशी, पेव्हर ब्लॉक, दगड, कोबा, पत्र्याचे शेड आदी कोणत्याही प्रकारचे आच्छादन करण्यास मनाई असेल़ ही जागा पूर्ण खुली असावी़ त्याचबरोबर या जागेखाली कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यासही मज्जाव करण्यात आला आहे़मनोरंजनात्मक खुल्या जागेसाठी तरतूदइमारतीच्या समोर असलेली मोकळी जागा मनोरंजनात्मक खुल्या जागेसाठी राखून ठेवणे बंधनकारक असणार आहे़ त्यानुसार भूखंडाचा आकार एक हजार एक चौरस मीटर ते अडीच हजार चौरस मीटर इतका असल्यास त्यापैकी १५ टक्के, २५०१ चौरस मीटर ते दहा हजार चौरस मीटर जागा असल्यास त्यापैकी २० टक्के आणि दहा हजार चौरस मीटरपेक्षा अधिक जागा असल्यास त्यापैकी २५ टक्के जागा राखीव ठेवणे बंधनकारक असणार आहे़काय फायदा होणार ? या मोकळ्या जागेत पावसाचे पाणी जमिनीत अधिक प्रमाणात जिरावे हा उद्देश आहे़ याबाबतची तरतूद प्रस्ताविलेल्या सुधारित विकास नियंत्रण नियमावली अंतर्गत भाग चारमध्ये प्रस्तावित करण्यात येणार आहे़