शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

पाणी जिरवण्यासाठी मोकळ्या जागेचे बंधन

By admin | Updated: May 26, 2016 01:27 IST

पाणीटंचाईमुळे बोअरवेल खणण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये वाढले आहे़ परिणामी समुद्राने वेढलेल्या या शहरातील भूजल पातळी खालावण्याचा धोका आहे़ त्या जागी खाऱ्या पाण्याचे प्रमाण

मुंबई : पाणीटंचाईमुळे बोअरवेल खणण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये वाढले आहे़ परिणामी समुद्राने वेढलेल्या या शहरातील भूजल पातळी खालावण्याचा धोका आहे़ त्या जागी खाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढणे इमारतींच्या पायासाठी धोकादायक ठरू शकते़ त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्यासाठी इमारतींसमोर असलेल्या अंगणाच्या काही भागात कोणत्याही बांधकामास प्रतिबंध करण्याची तरतूद विकास नियंत्रण नियमावलीत प्रस्तावित आहे़मुंबईत काँक्रिटचे जंगल तयार झाल्याने पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी जागा शिल्लक नाही़ त्यातच पाणीटंचाईमुळे बोअरवेल खणण्याचे प्रमाणही वाढले आहे़ मात्र हे शहर समुद्राने वेढलेले असल्याने भूजलाची पातळी यामुळे खालावण्याचा धोका निर्माण झाला आहे़ भूजलात समुद्राचे खारे पाणी शिरल्यास इमारतींचा पाया कमकुवत होऊ शकतो, अशी धोक्याची घंटा एका सर्वेक्षणातून यापूर्वीच देण्यात आली होती़त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी विकास नियोजन आराखड्यातच यासाठी तरतूद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे़ त्यानुसार विनाआच्छादित म्हणजे छप्पर नसलेले व जमिनीखाली कोणत्याही प्रकारचे बांधकाम नसावे, अशी मोकळी जागा सोसायटी व इमारतीसमोरच्या अंगणात असावी, अशी तरतूद विकास नियोजन आराखड्यात करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)बांधकामास प्रतिबंधया मनोरंजनात्मक खुल्या जागेपैकी किमान ३० टक्के एवढ्या जागेवर फरशी, पेव्हर ब्लॉक, दगड, कोबा, पत्र्याचे शेड आदी कोणत्याही प्रकारचे आच्छादन करण्यास मनाई असेल़ ही जागा पूर्ण खुली असावी़ त्याचबरोबर या जागेखाली कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यासही मज्जाव करण्यात आला आहे़मनोरंजनात्मक खुल्या जागेसाठी तरतूदइमारतीच्या समोर असलेली मोकळी जागा मनोरंजनात्मक खुल्या जागेसाठी राखून ठेवणे बंधनकारक असणार आहे़ त्यानुसार भूखंडाचा आकार एक हजार एक चौरस मीटर ते अडीच हजार चौरस मीटर इतका असल्यास त्यापैकी १५ टक्के, २५०१ चौरस मीटर ते दहा हजार चौरस मीटर जागा असल्यास त्यापैकी २० टक्के आणि दहा हजार चौरस मीटरपेक्षा अधिक जागा असल्यास त्यापैकी २५ टक्के जागा राखीव ठेवणे बंधनकारक असणार आहे़काय फायदा होणार ? या मोकळ्या जागेत पावसाचे पाणी जमिनीत अधिक प्रमाणात जिरावे हा उद्देश आहे़ याबाबतची तरतूद प्रस्ताविलेल्या सुधारित विकास नियंत्रण नियमावली अंतर्गत भाग चारमध्ये प्रस्तावित करण्यात येणार आहे़