शहरं
Join us  
Trending Stories
1
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल
2
आजचे राशीभविष्य, ०३ सप्टेंबर २०२५: आज नवीन काम सुरू करू नका, स्वकीयांचे गैरसमज होतील
3
टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी अर्ज करा! BCCIने मागविल्या बोली; अंतिम तारीखही दिली
4
कळा वाढल्याने भररस्त्यात रुग्णवाहिकेतच केली प्रसूती; डॉक्टरांच्या निर्णयामुळे मायलेक सुखरूप
5
मोठी झेप! भारताने बनविली स्वदेशी ‘विक्रम’ चिप! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण
6
माझ्या आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना बिहारची जनता माफ करणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
7
एलिफंटा, न्हावा बेटावर पर्यटनासाठी मास्टर प्लॅनिंग; सिडको करणार विकास; ग्रामस्थ संभ्रमात
8
दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल
9
जम्मू काश्मीर: पूंछ जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला !
10
अफगाणिस्तानच्या पूर्व भागात रात्री ६ रिक्टर स्केल क्षमतेचा तीव्र भूकंप; ८०० लोकांचा मृत्यू
11
मराठा आरक्षण: सरकारचा मसुदा तयार; लवकरच निर्णय; मुख्यमंत्री अन् उपसमितीची संयुक्त बैठक
12
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
13
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
14
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
15
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
16
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
17
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
18
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
19
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
20
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला

सागरी सुरक्षेसाठी स्वतंत्र दल

By admin | Updated: June 17, 2016 03:14 IST

सागरी सुरक्षेसाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या धर्तीवर स्वतंत्र सागरी सुरक्षा दलाची स्थापना करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ही मागणी महत्त्वाची असून या

मुंबई : सागरी सुरक्षेसाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या धर्तीवर स्वतंत्र सागरी सुरक्षा दलाची स्थापना करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ही मागणी महत्त्वाची असून या बाबतचा धोरणात्मक निर्णय केंद्र सरकार लवकरच घेईल, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.देशाच्या सागरी किनारपट्टीवरील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी सह्याद्री अतिथीगृहात राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मासेमारी बोटींचे कलर कोडिंग, मासेमारांना बायोमेट्रिक कार्डस् आणि कम्युनिटी पोलिसिंगमध्ये स्थानिकांचा सहभाग याबाबत राज्य शासनाने केलेल्या प्रगतीचा आढावा सादर केला. सागरी किनाऱ्यांबरोबरच मच्छिमार बोटींचा वावर असणाऱ्या ठिकाणांवरही बारकाईने लक्ष द्यावे लागेल. त्यासाठी मानवी सुरक्षा तसेच ई-टेहळणी सारख्या सुरक्षा उपायांचा वापर करण्याची आवश्यकता आहे. किनाऱ्यावरील मच्छिमारांना बायोमेट्रिक कार्ड देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी शासन मदत करण्यास तयार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)टेहळणीसाठी ३८ रडारसागरी सुरक्षेसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याच्या सुचनेचे समर्थन करून राजनाथ सिंह यावेळी म्हणाले की, सद्यस्थितीत राज्य सागरी पोलीस दल, भारतीय तटरक्षक दल आणि भारतीय नौदल या तिघांनी संयुक्तणे सुरक्षेची जबाबदारी पार पाडली पाहिजे. तस्करी रोखण्यासाठी संयुक्त कक्ष स्थापन करावा. मच्छिमारांना बायोमॅट्रिक ओळखपत्र देण्याबरोबरच कार्ड रिडर देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी आणखी ३८रडार उभारण्यात येतील.