शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
2
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
3
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
4
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
5
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
6
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
7
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
8
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
9
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
10
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
11
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
12
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
13
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
14
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
15
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
16
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
17
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
18
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
19
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?

मुक्त वसाहत योजनेला कोलदांडा

By admin | Updated: November 22, 2015 02:32 IST

भटक्यांची भटकंती सुरूच ; पाच वर्षात एकही घरकुल नाही.

सिध्दार्थ आराख / बुलडाणा : राज्यातील भटक्या विमुक्त घटकांसाठी राज्य शासनाने २0११ मध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना सुरू केली. दरवर्षी या योजनेवर अर्थसंकल्पात तरतूदही केली जाते; मात्र, मागील पाच वर्षात भटक्यांसाठी एकही घरकुल बांधल्या गेले नाही. उदासीन प्रशासन आणि सरकारच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे एका चांगल्या योजनेला कोलदांडा घालण्यात आला असून राज्यात भटक्यांची भटकंती सुरूच आहे. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने भटक्या विमुक्त घटकांसाठी सरकारने २0११ मध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना सुरू केली होती. दरवर्षी अर्थसंकल्पामध्ये योजनेसाठी आर्थीक तरतूदही केल्या जात होती. सतत सहा महिने स्थलांतर करणारे भटके कुटुंब हे या योजनेचे लाभार्थी आहेत. जे भटके कुटुंब तांड्या-पाड्यामध्ये पाल टाकून राहतात, त्यांच्यासाठी गावातच वसाहत स्थापन करून प्रत्येक कुटुंबाला २६९ चौरस फुटाचे घर बांधून देणे व उर्वरित जागेवर लाभार्थी कुटुंबांना विविध शासकीय योजनांद्वारे स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे; मात्र मागील पाच वर्षात राज्यातील केवळ यवतमाळ आणि लातुर या दोनच जिल्ह्यात या योजनेची घरे बांधण्यात आल्याची माहीती आहे. इतर जिल्ह्यात एकही घरकुल झाले नसून या योजनेवरील पैसा शासनाने दुसरीकडे वळविण्यात आला आहे. अशी आहे मुक्त वसाहत योजना राज्यातील ३३ जिल्ह्यांमध्ये विमुक्त भटक्यांची लोकसंख्या असलेली प्रत्येकी तीन गावांची निवड करून प्रत्येक गावातील २0 कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. विशेष म्हणजे या योजनेसाठी २0११-१२ या आर्थिक वर्षात २0 कोटींची तरतूद करण्यात आली होती. अडीच एकर जमिनीवर बनविण्यात येणार्‍या वसाहतीमध्ये २0 घरकुलाचा समावेश होता. यात पाणीपुरवठा, वीज, रस्ते आदी मूलभूत सेवा देण्यात येणार होत्या. तसेच रोजगाराच्या संधी, कम्युनिटी हॉल व पुनर्वसनाच्या योजना राबविण्यात येणार होत्या. दरवर्षी राज्यात भटक्यांसाठी ९९ वसाहती तयार कराव्यात असे निर्देश शासनाचे होते.तथापि एकही वसाहत तयार झाली नाही.