शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

मुक्त वसाहत योजनेला कोलदांडा

By admin | Updated: November 22, 2015 02:32 IST

भटक्यांची भटकंती सुरूच ; पाच वर्षात एकही घरकुल नाही.

सिध्दार्थ आराख / बुलडाणा : राज्यातील भटक्या विमुक्त घटकांसाठी राज्य शासनाने २0११ मध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना सुरू केली. दरवर्षी या योजनेवर अर्थसंकल्पात तरतूदही केली जाते; मात्र, मागील पाच वर्षात भटक्यांसाठी एकही घरकुल बांधल्या गेले नाही. उदासीन प्रशासन आणि सरकारच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे एका चांगल्या योजनेला कोलदांडा घालण्यात आला असून राज्यात भटक्यांची भटकंती सुरूच आहे. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने भटक्या विमुक्त घटकांसाठी सरकारने २0११ मध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना सुरू केली होती. दरवर्षी अर्थसंकल्पामध्ये योजनेसाठी आर्थीक तरतूदही केल्या जात होती. सतत सहा महिने स्थलांतर करणारे भटके कुटुंब हे या योजनेचे लाभार्थी आहेत. जे भटके कुटुंब तांड्या-पाड्यामध्ये पाल टाकून राहतात, त्यांच्यासाठी गावातच वसाहत स्थापन करून प्रत्येक कुटुंबाला २६९ चौरस फुटाचे घर बांधून देणे व उर्वरित जागेवर लाभार्थी कुटुंबांना विविध शासकीय योजनांद्वारे स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे; मात्र मागील पाच वर्षात राज्यातील केवळ यवतमाळ आणि लातुर या दोनच जिल्ह्यात या योजनेची घरे बांधण्यात आल्याची माहीती आहे. इतर जिल्ह्यात एकही घरकुल झाले नसून या योजनेवरील पैसा शासनाने दुसरीकडे वळविण्यात आला आहे. अशी आहे मुक्त वसाहत योजना राज्यातील ३३ जिल्ह्यांमध्ये विमुक्त भटक्यांची लोकसंख्या असलेली प्रत्येकी तीन गावांची निवड करून प्रत्येक गावातील २0 कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. विशेष म्हणजे या योजनेसाठी २0११-१२ या आर्थिक वर्षात २0 कोटींची तरतूद करण्यात आली होती. अडीच एकर जमिनीवर बनविण्यात येणार्‍या वसाहतीमध्ये २0 घरकुलाचा समावेश होता. यात पाणीपुरवठा, वीज, रस्ते आदी मूलभूत सेवा देण्यात येणार होत्या. तसेच रोजगाराच्या संधी, कम्युनिटी हॉल व पुनर्वसनाच्या योजना राबविण्यात येणार होत्या. दरवर्षी राज्यात भटक्यांसाठी ९९ वसाहती तयार कराव्यात असे निर्देश शासनाचे होते.तथापि एकही वसाहत तयार झाली नाही.