शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
3
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
4
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
5
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
6
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
8
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
9
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
10
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
11
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
12
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
13
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
14
Lalbaugcha Raja 2025 First Look: 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
15
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
16
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
17
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
19
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
20
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक

मुक्त वसाहत योजनेला कोलदांडा

By admin | Updated: November 22, 2015 02:32 IST

भटक्यांची भटकंती सुरूच ; पाच वर्षात एकही घरकुल नाही.

सिध्दार्थ आराख / बुलडाणा : राज्यातील भटक्या विमुक्त घटकांसाठी राज्य शासनाने २0११ मध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना सुरू केली. दरवर्षी या योजनेवर अर्थसंकल्पात तरतूदही केली जाते; मात्र, मागील पाच वर्षात भटक्यांसाठी एकही घरकुल बांधल्या गेले नाही. उदासीन प्रशासन आणि सरकारच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे एका चांगल्या योजनेला कोलदांडा घालण्यात आला असून राज्यात भटक्यांची भटकंती सुरूच आहे. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने भटक्या विमुक्त घटकांसाठी सरकारने २0११ मध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना सुरू केली होती. दरवर्षी अर्थसंकल्पामध्ये योजनेसाठी आर्थीक तरतूदही केल्या जात होती. सतत सहा महिने स्थलांतर करणारे भटके कुटुंब हे या योजनेचे लाभार्थी आहेत. जे भटके कुटुंब तांड्या-पाड्यामध्ये पाल टाकून राहतात, त्यांच्यासाठी गावातच वसाहत स्थापन करून प्रत्येक कुटुंबाला २६९ चौरस फुटाचे घर बांधून देणे व उर्वरित जागेवर लाभार्थी कुटुंबांना विविध शासकीय योजनांद्वारे स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे; मात्र मागील पाच वर्षात राज्यातील केवळ यवतमाळ आणि लातुर या दोनच जिल्ह्यात या योजनेची घरे बांधण्यात आल्याची माहीती आहे. इतर जिल्ह्यात एकही घरकुल झाले नसून या योजनेवरील पैसा शासनाने दुसरीकडे वळविण्यात आला आहे. अशी आहे मुक्त वसाहत योजना राज्यातील ३३ जिल्ह्यांमध्ये विमुक्त भटक्यांची लोकसंख्या असलेली प्रत्येकी तीन गावांची निवड करून प्रत्येक गावातील २0 कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. विशेष म्हणजे या योजनेसाठी २0११-१२ या आर्थिक वर्षात २0 कोटींची तरतूद करण्यात आली होती. अडीच एकर जमिनीवर बनविण्यात येणार्‍या वसाहतीमध्ये २0 घरकुलाचा समावेश होता. यात पाणीपुरवठा, वीज, रस्ते आदी मूलभूत सेवा देण्यात येणार होत्या. तसेच रोजगाराच्या संधी, कम्युनिटी हॉल व पुनर्वसनाच्या योजना राबविण्यात येणार होत्या. दरवर्षी राज्यात भटक्यांसाठी ९९ वसाहती तयार कराव्यात असे निर्देश शासनाचे होते.तथापि एकही वसाहत तयार झाली नाही.