शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

‘स्वच्छ भारत मिशन’बाबतच्या तक्रारींसाठी लवकरच स्वतंत्र कक्ष!

By admin | Updated: July 21, 2016 23:26 IST

जिल्हास्तरावर स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष स्थापन केले जाणार; राज्यस्तरावर स्वंतत्र कक्ष होणार स्थापन.

संतोष वानखडे/वाशिम स्वच्छ भारत अभियानात लोकांचा सक्रीय सहभाग वाढविणे आणि तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष स्थापन केले जाणार आहेत. याचाच एक भाग म्हणून राज्यस्तरावर असा कक्ष स्थापन करण्यात आला आहे.स्वच्छ व सुंदर गावाची संकल्पना साकार करण्यासाठी स्वच्छता अभियान, निर्मल भारत अभियान राबविले जात आहे. निर्मल भारत अभियान हे २ ऑक्टोबर २0१४ पासून स्वच्छ भारत मिशन म्हणून नावलौकिकास आले आहे. या अभियानांतर्गत शौचालय बांधकाम करण्याला प्रथम प्राधान्य देण्याची अट घालण्यात आली आहे. ग्रामीण भागात घरोघरी शौचालय बांधकाम करणे आणि शौचालयाचा वापर करण्याचे आवाहन या अभियानांतर्गत केले जाते. शौचालय बांधकाम झाल्यानंतर संबंधित लाभार्थींना १२ हजार रुपयांचे अनुदानदेखील दिले जाते. अनुदान वितरणात मोठय़ा प्रमाणात विलंब होत असल्याच्या तक्रारी जिल्हा व राज्य स्तरावर प्राप्त झाल्याने या तक्रारींचा निपटारा ह्यऑन दी स्पॉटह्ण करण्यासाठी तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. या प्रयत्नाचा एक भाग म्हणून आणि लोकसहभाग वाढविणे व तक्रारींचे निराकरण करणे यासाठी २0 जुलै रोजी राज्यस्तरावर पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या कार्यालयात तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला.***लोकांच्या चांगल्या गोष्टींचे कौतुक करण्यासोबतच स्वच्छतेच्या या अभियानाशी संबंधित योग्य तक्रारीची दखल तत्काळ घेण्याचा प्रयत्न 'व्हॉट्स अप' क्रमांकाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. वाशिम जिल्ह्यात लोकांनी शौचालय बांधूनही प्रोत्साहन अनुदान मिळण्यास विलंब होत असल्यास त्यांनी मोबाइलमध्ये शौचालयासोबत सेल्फी फोटो काढून स्वच्छ भारत मिशन जिल्हा वाशिम येथील व्हॉट्स अप क्रमांकावर टाकल्यास त्याची जिल्हा स्तरावर तात्काळ दखल घेण्यात येईल.- गणेश पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद वाशिम.