शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
2
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
3
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
4
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
5
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
6
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
7
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
8
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
9
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
10
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
11
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
12
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
13
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
14
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
16
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
17
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
18
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
19
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
20
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वच्छ भारत मिशन’बाबतच्या तक्रारींसाठी लवकरच स्वतंत्र कक्ष!

By admin | Updated: July 21, 2016 23:26 IST

जिल्हास्तरावर स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष स्थापन केले जाणार; राज्यस्तरावर स्वंतत्र कक्ष होणार स्थापन.

संतोष वानखडे/वाशिम स्वच्छ भारत अभियानात लोकांचा सक्रीय सहभाग वाढविणे आणि तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष स्थापन केले जाणार आहेत. याचाच एक भाग म्हणून राज्यस्तरावर असा कक्ष स्थापन करण्यात आला आहे.स्वच्छ व सुंदर गावाची संकल्पना साकार करण्यासाठी स्वच्छता अभियान, निर्मल भारत अभियान राबविले जात आहे. निर्मल भारत अभियान हे २ ऑक्टोबर २0१४ पासून स्वच्छ भारत मिशन म्हणून नावलौकिकास आले आहे. या अभियानांतर्गत शौचालय बांधकाम करण्याला प्रथम प्राधान्य देण्याची अट घालण्यात आली आहे. ग्रामीण भागात घरोघरी शौचालय बांधकाम करणे आणि शौचालयाचा वापर करण्याचे आवाहन या अभियानांतर्गत केले जाते. शौचालय बांधकाम झाल्यानंतर संबंधित लाभार्थींना १२ हजार रुपयांचे अनुदानदेखील दिले जाते. अनुदान वितरणात मोठय़ा प्रमाणात विलंब होत असल्याच्या तक्रारी जिल्हा व राज्य स्तरावर प्राप्त झाल्याने या तक्रारींचा निपटारा ह्यऑन दी स्पॉटह्ण करण्यासाठी तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. या प्रयत्नाचा एक भाग म्हणून आणि लोकसहभाग वाढविणे व तक्रारींचे निराकरण करणे यासाठी २0 जुलै रोजी राज्यस्तरावर पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या कार्यालयात तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला.***लोकांच्या चांगल्या गोष्टींचे कौतुक करण्यासोबतच स्वच्छतेच्या या अभियानाशी संबंधित योग्य तक्रारीची दखल तत्काळ घेण्याचा प्रयत्न 'व्हॉट्स अप' क्रमांकाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. वाशिम जिल्ह्यात लोकांनी शौचालय बांधूनही प्रोत्साहन अनुदान मिळण्यास विलंब होत असल्यास त्यांनी मोबाइलमध्ये शौचालयासोबत सेल्फी फोटो काढून स्वच्छ भारत मिशन जिल्हा वाशिम येथील व्हॉट्स अप क्रमांकावर टाकल्यास त्याची जिल्हा स्तरावर तात्काळ दखल घेण्यात येईल.- गणेश पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद वाशिम.