शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

खुनातील चौघे २८ वर्षांनी तुरुंगात!

By admin | Updated: December 1, 2015 01:01 IST

ब्राह्मणवाडी (तासगाव, ता. सातारा) येथे १९८७ मध्ये झालेल्या एका खुनातील चार आरोपींची तब्बल २८ वर्षांनी सोमवारी तुरुंगात रवानगी झाली. उच्च न्यायालयाने चौघांना जन्मठेप ठोठावली

सातारा : ब्राह्मणवाडी (तासगाव, ता. सातारा) येथे १९८७ मध्ये झालेल्या एका खुनातील चार आरोपींची तब्बल २८ वर्षांनी सोमवारी तुरुंगात रवानगी झाली. उच्च न्यायालयाने चौघांना जन्मठेप ठोठावली असून, ते शरण आल्यानंतरच त्यांच्या अपिलावर सुनावणी करण्यात येईल, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल्यानंतर सर्वजण सातारा न्यायालयासमोर शरण आले.लालासाहेब सावंत (रा. ब्राह्मणवाडी) यांचा १९८७ मध्ये जबर मारहाणीत मृत्यू झाला होता. या खटल्यात एकूण सात आरोपी होते. ३ मार्च १९९४ रोजी या सर्वांना जिल्हा न्यायालयाने निर्दोष मुक्त केले होते. या निर्णयाविरुद्ध सरकार पक्षातर्फे उच्च न्यायालयात अपील करण्यात आले होते. तेथे एक महिला आरोपी निर्दोष ठरली, तर दोन आरोपींचा मृत्यू झाला. तर, बबन डफळ, प्रकाश सावंत, सुरेश सावंत आणि सुभाष सावंत या चौघांना उच्च न्यायालयाने २५ आॅगस्ट २०१५ रोजी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. याविरुद्ध त्यांनी न्यायालयात दाद मागितली असून, प्रकरण प्रलंबित आहे.सुनावणीपूर्वी आरोपींनी शरण येणे आवश्यक असल्याचा आदेश न्यायालयाने दिला. त्यानुसार सोमवारी हजर झालेल्या चौघांना प्रॉसिक्यूशन स्कॉडचे अविनाश पवार व इतरांनी तिसरे सत्र न्यायाधीश ए. एन. पाटील यांच्यासमोर हजर केले. या चौघांची तुरुंगात रवानगी करण्यात आली.