शहरं
Join us  
Trending Stories
1
पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच भाजपाने तीन ठिकाणी उधळला गुलाल
2
वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!
3
Video: मराठी तरुणाला २ तास डांबल्याचा आरोप, भाईंदर रेल्वेस्टेशनवरील प्रकार, नेमकं काय घडलं?
4
मुंबईत मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद, प्रभाग क्र. २११ आणि २१२ मध्ये काय घडलं?
5
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
6
सावधान! ChatGPT वर तुमची माहिती गुप्तपणे सेव्ह होते; टाळायचे असेल तर या ५ स्टेप्स फॉलो करा
7
अर्ज दाखल करताच अजित पवारांच्या उमेदवाराचा मृत्यू, ३ जणांना रात्री प्रवेश, सकाळी तिकीट; काँग्रेसचे २६ उमेदवार गेले कुठे...?
8
VHT 2025 : महाराष्ट्र संघासाठी 'संकटमोचक' ठरला ऋतुराज! शतकी खेळीसह टीम इंडियातील जागेवरही टाकला रुमाल
9
झटपट, पटापट! स्मार्टफोन, इंटरनेट नसेल तरी नो टेन्शन; 'हा' नंबर डायल, काही सेकंदात UPI पेमेंट
10
“राज ठाकरेंच्या जास्त जागा जिंकून याव्यात ही आमची इच्छा, आम्ही बहुमत मिळवू”: संजय राऊत
11
छ. संभाजीनगर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक थांबेना! मंत्र्यांच्या गाड्यांना काळं फासलं, घोषणाबाजी
12
नववर्षाच्या आदल्या दिवशीच गुड न्यूज; सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, पटापट चेक करा १८, २२, २४ कॅरेटचे दर
13
Nashik Municipal Corporation Election : आयारामांची चांदी! भाजपचे २२, शिंदेसेनेचे १९; निष्ठावंतांच्या नशिबी सतरंज्या उचलण्याचीच वेळ
14
'ताज'चे नाव आता 'जीव्हीके' हॉटेल्सवरून हटणार; टाटा समुहाने संपूर्ण हिस्सा विकला, कोण आहे खरेदीदार?
15
बाबा वेंगा किंवा नास्त्रेदेमस नाही... मायक्रोसॉफ्टची भविष्यवाणी! २०२६ मध्ये या ४० क्षेत्रांतील लोकांच्या नोकऱ्या जाणार...
16
जिभेचे चोचले की निसर्गाचा चमत्कार? जगातला असा एकमेव बेट, जिथे चक्क माती खातात लोक!
17
"आमदार मेहतांच्या घमेंडीमुळे मीरा भाईंदरमध्ये महायुती तुटली"; मंत्री प्रताप सरनाईकांचा घणाघात
18
एबी फॉर्म दिला, जल्लोष झाला अन् तासाभरात उमेदवारी रद्द
19
संप सुरू होण्यापूर्वी Swiggy, Zomato बॅकफुटवर; डिलिव्हरी बॉईजसाठी आली चांगली बातमी
20
पैशांची चणचण, कर्जाचा डोंगर... यूट्यूबवरुन शिकले अन् पती-पत्नीने घरातच छापल्या नकली नोटा
Daily Top 2Weekly Top 5

चौदा ग्रामपंचायत सदस्यांचा शौचालयाला ठेंगा

By admin | Updated: January 20, 2017 02:47 IST

केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियान सुरू करून स्वच्छ व सुंदर देश बनविण्याची संकल्पना पुढे आणली आहे

मयूर तांबडे,

पनवेल- केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियान सुरू करून स्वच्छ व सुंदर देश बनविण्याची संकल्पना पुढे आणली आहे. मात्र पनवेल तालुक्यातील १४ ग्रामपंचायत सदस्यांकडे शौचालय नसल्यामुळे या संकल्पनेला हरताळ फासला जात आहे. तालुक्यातील आपटा, न्हावे, साई, करंजाडे, केळवणे या ग्रामपंचायतीच्या १४ सदस्यांकडे शौचालय नाही. त्यामुळे हे सदस्य उघड्यावरच शौचास जात असल्याचे समजते. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून संबंधित सदस्यांवर कोणतीही कारवाई केली जात नसल्याने त्यांचे सदस्यत्व कायम आहे. तालुक्यातील ९२ ग्रामपंचायतींपैकी २३ गावांचा समावेश पनवेल महापालिकेत झाला आहे, तर उर्वरित ६९ ग्रामपंचायत राहिल्या आहेत. या ग्रामपंचायतीमध्ये सद्यस्थितीत ६९० सदस्य आहेत. यातील ६७६ सदस्यांकडे शौचालये आहेत तर १४ सदस्यांकडे शौचालये नाहीत. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार राज्यातील सर्व ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकाऱ्यांकडे शौचालय असणे बंधनकारक केले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी संभाव्य उमेदवारांनी झपाट्याने शौचालय बांधकाम केले. मात्र ग्रामपंचायत सदस्यांमध्ये शौचालय बांधकामाबाबत उदासीनता दिसून येत आहे. शौचालय नसलेल्या ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द होण्याची कायदेशीर तरतूद आहे. मात्र अशी कारवाई पनवेल तालुक्यात अद्याप करण्यात आली नाही.जिल्हा परिषद प्रशासनाने निर्मलग्राम योजनेंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांचे सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व ग्रामपंचायत सदस्यांना शौचालय बांधण्याच्या सूचना केल्या होत्या. त्या आवाहनाला जिल्ह्यात संथगतीने का होईना प्रतिसाद मिळाला. मात्र अद्याप पनवेल तालुक्यातील १४ सदस्य शौचालयापासून दूर आहेत. संपूर्ण राज्यात निर्मल भारत अभियानाअंतर्गत प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय असणे आवश्यक असून, त्याचा वापरही करणे बंधनकारक आहे. मात्र नागरिकांसह अनेक ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांकडे शौचालय नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे बहुतांश जण उघड्यावर शौचास जात आहेत. केंद्र व राज्य शासनामार्फत शौचालय बांधकामासाठी अनुदानसुद्धा दिले जाते, तरीही उघड्यावर शौचालयास जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. ज्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडे शौचालय नाही अशांवर सदस्यत्व अपात्रतेची कारवाई करण्याची शासनाने तरतूद केली आहे. ग्रामपंचायत पदाधिकारी म्हणून निवडून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांकडे शौचालय असणे आवश्यक आहे. याशिवाय ज्या सदस्यांकडे शौचालय आहे; मात्र ते वापरत नाही अशा दोन्ही बाबी सिद्ध झाल्यास ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवर अपात्रतेची कारवाईहोऊ शकते. असे असतानाही पनवेलमध्ये ग्रामपंचायतीतील १४ सदस्यांकडे शौचालये नाहीत. यावरून तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधी स्वच्छतेच्या बाबतीत किती गंभीर आहेत, हे दिसून येते. >हे सदस्य सार्वजनिक शौचालयाचा वापर करत आहेत त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करता येणार नाही. निवडणुकीच्या वेळी त्यांनी बाँड पेपरवर शौचालयाचा वापर करतो, असे लिहून दिलेले आहे. - धोंडू तेटगुरे, गटविकास अधिकारी, पनवेल पंचायत समितीसंपूर्ण राज्यात निर्मल भारत अभियानाअंतर्गत प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय असणे आवश्यक असून, त्याचा वापरही करणे बंधनकारक आहे. मात्र नागरिकांसह अनेक ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांकडे शौचालय नाही.