शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
2
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
3
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
4
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
5
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
6
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
7
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
8
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
9
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
10
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
11
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
12
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
13
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
14
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
15
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
16
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
17
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
18
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
19
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
20
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार

महाराष्ट्रातील चार जवानांना वीरमरण

By admin | Updated: September 20, 2016 06:11 IST

शहीद झालेल्या १८ जवानांपैकी चार महाराष्ट्रातील असून, त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १५ लाखांची मदत सरकार करणार

मुंबई/नवी दिल्ली : काश्मीरमधील उरी येथील लष्करी तळावर रविवारी करण्यात आलेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या १८ जवानांपैकी चार महाराष्ट्रातील असून, त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १५ लाखांची मदत देण्याचे तसेच त्यांच्यावर गावी शासकीय इतमातात मंगळवारी अंत्यसंस्कार करण्याचे राज्य सरकारने सोमवारी जाहीर केले. हे चारही जवान लष्करात ६ बिहार रेजिमेंटमध्ये होते. शहीद झालेल्या जवानांमध्ये अमरावतीचे विकास जानराव उईके (२७), यवतमाळचे विकास जनार्दन कुडमेथे (३१), नाशिकचे संदीप सोमनाथ ठोक (२५) व साताऱ्याचे चंद्रकांत शंकर गलंंडे (२९) यांचा समावेश आहे. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वरचे विकास उईके हे २००९मध्ये सैन्यात दाखल झाले होते. त्यांचे वडील जानराव उईके हेसुद्धा ३४ वर्षे सैन्यदलात होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, बहीण आहेत. ६ सप्टेंबरला कुटुंबीयांशी दूरध्वनीवरून केलेली चर्चा हाच त्यांचा शेवटचा संवाद ठरला. यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील पुरड गावातील विकास कुडमेथे २००८मध्ये लष्करात भरती झाले होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगी आहेत. त्यांची दहा महिन्यांची मुलगी जिज्ञासा ही सध्या आजारी आहे. नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील खडांगळी गावचे जवान संदीप ठोक हे २०१४मध्ये भरती झाले होते. त्यांच्या पश्चात आजी, आई-वडील, भाऊ, वहिणी, दोन बहिणी असा परिवार आहे. सोमवारी रात्री त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले.सातारा जिल्ह्यातील जाशी (ता. माण) येथील शहीद जवान चंद्रकांत गलंडे यांचे कुटुंब शेती करते. चंद्रकांत यांचा मोठा भाऊ मंज्याबापू आणि लहान भाऊ केशव हेसुद्धा सैन्यात आहेत. त्यांच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)>तीन शहीद जवानांचे पार्थिव आणले जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये रविवारी केलेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या महाराष्ट्रातील तीन जवानांचे पार्थिव हवाई दलाच्या खास विमानाने सोमवारी रात्री पुण्याला आणण्यात आले. तेथून ते मूळ गावी पाठवण्यात येणार असून, मंगळवारी त्यांच्यावर सरकारी इतमातात अंत्यसंस्कार करण्यात येतील.नाशिकमध्ये अंत्यसंस्कारसंदीप ठोक यांच्या पार्थिवावर सोमवारी रात्री खडांगळी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. त्यांचा विवाह करण्याचा कुटुंबीयांचा विचार होता. २८ सप्टेंबरला ते सुटीवर येणार होते. त्या वेळी मुलगी पाहण्यास जाणार होते. >पाकच्या उलट्या बोंबा : काश्मीरची दहशतवादी राज्य म्हणून झालेली ओळख लपविण्यासाठीच भारताकडून जगाची दिशाभूल सुरू आहे, अशी उलटी बोंब मारायला पाकिस्तानने सुरुवात केली आहे. उरी हल्ल्यानंतरच्या भारताच्या कडवट आणि निराधार आरोपातून हेच सिद्ध होते, असा जावईशोधही पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे विदेश विभागाचे सल्लागार सरताज अजीज यांनी लावला. भारताच्या आक्रमकतेमुळे आमच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाल्यास आम्ही अण्वस्त्रांचा वापर करण्यास मागेपुढे पाहणार नाही, अशी धमकी पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा असीफ यांनी सोमवारी दिली.