शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

महाराष्ट्रातील चार जवानांना वीरमरण

By admin | Updated: September 20, 2016 06:11 IST

शहीद झालेल्या १८ जवानांपैकी चार महाराष्ट्रातील असून, त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १५ लाखांची मदत सरकार करणार

मुंबई/नवी दिल्ली : काश्मीरमधील उरी येथील लष्करी तळावर रविवारी करण्यात आलेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या १८ जवानांपैकी चार महाराष्ट्रातील असून, त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १५ लाखांची मदत देण्याचे तसेच त्यांच्यावर गावी शासकीय इतमातात मंगळवारी अंत्यसंस्कार करण्याचे राज्य सरकारने सोमवारी जाहीर केले. हे चारही जवान लष्करात ६ बिहार रेजिमेंटमध्ये होते. शहीद झालेल्या जवानांमध्ये अमरावतीचे विकास जानराव उईके (२७), यवतमाळचे विकास जनार्दन कुडमेथे (३१), नाशिकचे संदीप सोमनाथ ठोक (२५) व साताऱ्याचे चंद्रकांत शंकर गलंंडे (२९) यांचा समावेश आहे. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वरचे विकास उईके हे २००९मध्ये सैन्यात दाखल झाले होते. त्यांचे वडील जानराव उईके हेसुद्धा ३४ वर्षे सैन्यदलात होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, बहीण आहेत. ६ सप्टेंबरला कुटुंबीयांशी दूरध्वनीवरून केलेली चर्चा हाच त्यांचा शेवटचा संवाद ठरला. यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील पुरड गावातील विकास कुडमेथे २००८मध्ये लष्करात भरती झाले होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगी आहेत. त्यांची दहा महिन्यांची मुलगी जिज्ञासा ही सध्या आजारी आहे. नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील खडांगळी गावचे जवान संदीप ठोक हे २०१४मध्ये भरती झाले होते. त्यांच्या पश्चात आजी, आई-वडील, भाऊ, वहिणी, दोन बहिणी असा परिवार आहे. सोमवारी रात्री त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले.सातारा जिल्ह्यातील जाशी (ता. माण) येथील शहीद जवान चंद्रकांत गलंडे यांचे कुटुंब शेती करते. चंद्रकांत यांचा मोठा भाऊ मंज्याबापू आणि लहान भाऊ केशव हेसुद्धा सैन्यात आहेत. त्यांच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)>तीन शहीद जवानांचे पार्थिव आणले जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये रविवारी केलेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या महाराष्ट्रातील तीन जवानांचे पार्थिव हवाई दलाच्या खास विमानाने सोमवारी रात्री पुण्याला आणण्यात आले. तेथून ते मूळ गावी पाठवण्यात येणार असून, मंगळवारी त्यांच्यावर सरकारी इतमातात अंत्यसंस्कार करण्यात येतील.नाशिकमध्ये अंत्यसंस्कारसंदीप ठोक यांच्या पार्थिवावर सोमवारी रात्री खडांगळी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. त्यांचा विवाह करण्याचा कुटुंबीयांचा विचार होता. २८ सप्टेंबरला ते सुटीवर येणार होते. त्या वेळी मुलगी पाहण्यास जाणार होते. >पाकच्या उलट्या बोंबा : काश्मीरची दहशतवादी राज्य म्हणून झालेली ओळख लपविण्यासाठीच भारताकडून जगाची दिशाभूल सुरू आहे, अशी उलटी बोंब मारायला पाकिस्तानने सुरुवात केली आहे. उरी हल्ल्यानंतरच्या भारताच्या कडवट आणि निराधार आरोपातून हेच सिद्ध होते, असा जावईशोधही पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे विदेश विभागाचे सल्लागार सरताज अजीज यांनी लावला. भारताच्या आक्रमकतेमुळे आमच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाल्यास आम्ही अण्वस्त्रांचा वापर करण्यास मागेपुढे पाहणार नाही, अशी धमकी पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा असीफ यांनी सोमवारी दिली.