शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

लोणावळा अपघातात चौघांचा मृत्यू

By admin | Updated: September 11, 2016 03:52 IST

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मोटारीची कंटेनरला धडक बसून चार जण जागीच मृत्यूमुखी पडले. लोणावळ्यातील वलवण महाविद्यालयाजवळ शनिवारी मध्यरात्री

लोणावळा (पुणे ) : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मोटारीची कंटेनरला धडक बसून चार जण जागीच मृत्यूमुखी पडले. लोणावळ्यातील वलवण महाविद्यालयाजवळ शनिवारी मध्यरात्री एकच्या सुमारास हा अपघात झाला.मृतांमध्ये मुंबई काळाचौकीचे पोलीस हवालदार राजेंद्र विष्णू चव्हाण (वय ४७, मरोळ पोलीस मुख्यालय, बक्कल नं. ३२१८१), त्यांची पत्नी साक्षी उर्फ वनिता राजेंद्र चव्हाण (वय ४२, दोघेही रा. ४०३ मारुती अपार्टमेंट, दत्तपाडा, बोरीवली (पू.) मुंबई), शंकर मारोती वनगुले (वय ३३) व त्यांची पत्नी पूजा शंकर वनगुले (वय २६, दोघेही रा. सोनघर, ता. महाड, जि. रायगड) याचा समावेश आहे.खंडाळा महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटार मुंबईहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात येत होती. चालक राजेंद्र चव्हाण यांचे नियंत्रण सुटल्याने ती कंटेनरला मागून जोरात धडकली. ही धडक एवढी भीषण होती की, मोटार जवळपास ४ फूट कंटेनरच्या खाली घुसली. त्यामुळे मोटारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला. पनवेल विभागाचे महामार्ग पोलीस निरीक्षक अजित बारटक्के विशेष कारवाई मोहिमेची पाहणी करण्यासाठी जात असताना त्यांनी हा अपघात पाहिला. त्यांनी तातडीने खंडाळा महामार्ग पोलिसांना घटनास्थळी बोलावून मदतकार्य केले. अपघाताबाबत संभ्रमावस्थाराजेंद्र चव्हाण हे गणपती उत्सवाकरिता त्यांच्या गावी दापोलीला गेले होते. शुक्रवारी गौरीपूजनानंतर सायंकाळी ६.३० वाजता ते सपत्नीक मुंबईला परत निघाले होते. ते एक्स्प्रेस हायवेवर लोणावळ्याकडे कसे आले? तसेच वनगुले दाम्पत्य त्यांच्या गाडीत कसे आले, याबाबत नातेवाईक, तसेच पोलीस अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम असून, त्याचा तपास सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.वाहनांचा अतिवेग जीवघेणा ठरत आहे. खबरदारी घेतल्यास हे मानवनिर्मित अपघात टाळता येऊ शकतात, असे मत महामार्ग पोलीस अधीक्षक अजित तांबे यांनी व्यक्त केले.गणपतीचे दर्शन घेऊन निघालेल्या पोलिसासह पत्नीचा मृत्यूगावच्या गणपतीचे दर्शन घेऊन मुंबईकडे बंदोबस्ताला हजर राहण्यासाठी निघालेल्या पोलिसाच्या कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात त्याच्यासह पत्नीचा मृत्यू झाल्याने पोलीस दलात शोककळा पसरली आहे. मुळचे दापोलीचे असलेले राजेंद्र विष्णू चव्हाण (४७) हे पत्नीसोबत बोरीवली दत्त पाडा येथे राहायचे. ते मरोळ मुख्यालयात पोलीस नाईक म्हणून कार्यरत होते. ते गणपतीसाठी गावी गेले होते. शनिवारी माऊंट मेरीच्या बंदोबस्तासाठी हजर राहण्यासाठी त्यांना फोन आला. ते पत्नी वनीतासोबत निघाले. वाटेतच त्यांनी शंकर मारुती वेणगुळे, पूजा वेणगुळे यांना लिफ्ट दिली. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर कंटेनरच्या धडकेत त्यांच्या कारचा अपघात झाला. ही धडक ऐवढी भिषण होती की सँट्रो गाडी जवळपास ४ फुट कंटेनरच्या खाली घुसल्याने आतमध्ये बसलेल्या चारही जणांचा जागीच मृत्यू झाला.